शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राजघराण्यानंतर आता पाटलांमध्येही मनोमिलन! :-- वेध निवडणूकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:01 IST

सख्ख्या भावाच्या विरोधात जावून त्यांनी हाती असलेल्या घड्याळाचे लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले होते. हे काम करताना त्यांनी स्वत:च्या भावावरही आरोप केले होते. आता ते एकत्र येताना दिसून आले.

ठळक मुद्देराजकारणात दुश्मनी विसरून सख्खे भाऊही आले एकत्र

सातारा : राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो असे म्हटले जाते. याचा प्रत्यय गुरूवारीच सातारकरांना आला. कारण, राजघराण्यातील उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे एकत्र आल्यानंतर हेच मनोमिलनाचं वारं पाटणच्या पाटलकांकडेही वळल्याचं दिसून आलं. राजघराण्यातील दोन भावांबरोबरच नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील यांनीही छायाचित्रकारांना एकत्र पोझ दिली आणि यातून ‘आॅल इज वेल’चा संदेश आपसुकच बाहेर पडला.

लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे उदयनराजे व शिवसेनेचे उमेदवार असणारे नरेंद्र पाटील यांच्यात लढत झाली. त्या निवडणुकीत परस्परांवर टोकाची टिकाही करण्यात आली होती. त्यापूर्वी राष्ट्रवादीत असणारे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजपात राहिलेले नरेंद्र पाटील यांच्या एकत्रित मिसळ खाण्याने अनेकांच्या भुवया ही उंचावलेल्या. मिसळ खातानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ठसकेबाज विश्लेषणही केलं होतं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे कोणाचं काम करणार आणि कोणाचं काम काढणार यावरही चर्चाही रंगलेली.

दरम्यान, नरेंद्र पाटील यांचे बंधू रमेश पाटील राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. सख्ख्या भावाच्या विरोधात जावून त्यांनी हाती असलेल्या घड्याळाचे लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले होते. हे काम करताना त्यांनी स्वत:च्या भावावरही आरोप केले होते. आता ते एकत्र येताना दिसून आले.दोन्ही भावाभावांमध्ये राजकीय वितुष्ट!नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील यांच्यात राजकीय कारणावरून विसंवाद निर्माण झाला होता. हीच परिस्थिती साताऱ्यातही होती. तीन वर्षांपूर्वी सातारा पालिका निवडणुकीत मनोमिलनाची चुल मोडून सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी यांच्यात लढत झाली. यात उदयनराजेंच्या गटाने नविआच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पत्नी वेदांतिकाराजेंचा पराभव केला होता.पूर्वीचे पक्के विरोधक आता झाले सख्खे प्रचारक!राष्ट्रवादीच्यावतीने उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांच्या विरोधात एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक लढवली होती. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणूकीत नरेंद्र पाटील यांनी तोडीस तोड प्रचार यंत्रणा कार्यान्वित करून जिल्ह्यात भयमुक्त वातावरणाची साद दिली. या सादला सातारकरांनी मतदानाच्या रूपात सकारात्मक प्रतिसादही दिला.आता अवघ्या चार महिन्यानंतर साताºयाच्या राजकीय पटलावर मोठी उलथापालथ झाली आहे. विकासाचा मुद्दा पुढं करून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कमळमार्ग स्विकारल्यानंतर लगेचच लोकसभेचा राजीनामा देत उदयनराजे यांनीही कमळाला जवळ केलं. दोन्ही राजे आता एकाच पक्षात आहेत. पूर्वीचे पक्के विरोधक आता सख्खे प्रचारक झाले आहेत.

सातारा येथे गुरूवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील असे एकत्र आले.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर