शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

अखेर ‘आदर्श’ वाटचाल सुरू!

By admin | Updated: September 22, 2015 23:52 IST

चार आमदार सरसावले : शिंदेंनंतर रामराजे, पृथ्वीराज, शंभूराज, आनंदरावांनी सादर केले प्रस्ताव--लोकमतचा प्रभाव

सागर गुजर -- सातारा  राज्य शासनाच्या आमदार आदर्श ग्राम योजनेकडे पाठ फिरविलेल्या जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी ‘लोकमत’च्या वृत्तानंतर या योजनेकडे धाव घेतली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शंभूराज देसाई, आ. आनंदराव पाटील यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन ई-मेल व फॅक्सद्वारे नियोजन विभागाला आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी निवडलेल्या प्रत्येकी चार गावांची यादी दिली आहे. ‘आदर्श ग्राम योजनेकडे बहुतांश आमदारांची पाठ’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने दि. १७ सप्टेंबर २0१५ च्या अंकात वृत्त प्रसिध्द केले होते. या तारखेआधी आमदार शशिकांत शिंदे यांनीच केवळ गावांचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर केला होता. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच त्याच दिवशी आमदार शंभूराज देसाई यांनी आपला प्रस्ताव नियोजन विभागाकडे दिला. त्यामध्ये वेखंडवाडी, सोनवडे (ता. पाटण) व आरेवाडी (ता. कऱ्हाड) ही त्यांच्या मतदारसंघातील तीन गावे योजनेसाठी निवडली आहेत. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दि. १८ सप्टेंबर रोजी भोगाव, गोळेश्वर, पोतले (ता. कऱ्हाड) या तीन गावांचा प्रस्ताव दिला. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्याच दिवशी गावांचा प्रस्ताव दिला. त्यांनी फलटण तालुक्यातील दुधेबावी, खंडाळा तालुक्यातील अहिरे व कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक ही गावे योजनेसाठी घेऊन ‘बॅलन्स’ साधण्याचा प्रयत्न केला आहे. आ. आनंदराव पाटील यांनी कऱ्हाड तालुक्यातील मुंढे, पाडळी (केसे), टाळगाव ही तीन गावे निवडून त्याचा प्रस्ताव दि. १९ सप्टेंबर रोजी दाखल केला आहे. जिल्ह्यातील इतर आमदारांनीही प्रस्ताव सादर करण्याच्या जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.महाराष्ट्रात ‘आमदार आदर्श ग्राम’ योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी या योजनेकडे जिल्ह्यातल्या आमदारांनी पाठ फिरविली होती. मे महिन्यात आदेश निघाल्यानंतर माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेत तीन गावांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सर्वात आधी सादर केला होता. त्यांनी आपल्या मतदारसंघातील चिंचणेर निंब (ता. सातारा), कटगुण (ता. खटाव) व देऊर (ता. कोरेगाव) ही तीन गावे रचनात्मक विकासासाठी निवडली आहेत. केंद्र सरकारच्या ‘सांसद आदर्श ग्राम’ योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम’ योजना राबविण्याचा निर्णय राज्यातील फडणवीस सरकारने घेतला आहे. शासनाने याबाबत २0 मे २0१५ ला अद्यादेश काढला आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराने गावे निवडण्याचे आवाहन केले होते. मात्र यानंतरही आमदारांचा थंडा प्रतिसाद होता. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द करताच आमदारांनी या योजनेतील सहभागासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली सुरु केल्या.शासनाच्या ‘आमदार आदर्श ग्राम’ योजनेबाबत जिल्ह्यातील बहुसंख्य आमदारमंडळी बॅकफूटवर आहेत. यामागची कारणमिमांसा शोधण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला असता संपूर्ण मतदारसंघातील तीन गावेच आदर्श करायची, तर मतदारसंघातील इतर गावांची नाराजी ओढवून घेण्याची शक्यता असते. तरीही टप्पाटप्प्याने गावे सुधारण्यासाठी ही योजना फायद्याची ठरेल. तसे एका गावाचा आदर्श घेऊन बाजूची गावे सुधारतील, असाही राज्य शासनाचा या योजनेमागचा कयास आहे. योजनेत घेण्यासाठी गावकरी सरसावले!आमदारांनी आपले गाव दत्तक घ्यावे, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक जण आमदारांची खासगीत भेट घेऊन त्यांच्याकडे गाव योजनेत घेण्याची विनंती करत आहेत. याउलट काही गावांचे असेही पदाधिकारी आहेत की त्यांना ही योजना काय रे भाऊ म्हणण्याची वेळ आली आहे.