शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

अखेर ‘आदर्श’ वाटचाल सुरू!

By admin | Updated: September 22, 2015 23:52 IST

चार आमदार सरसावले : शिंदेंनंतर रामराजे, पृथ्वीराज, शंभूराज, आनंदरावांनी सादर केले प्रस्ताव--लोकमतचा प्रभाव

सागर गुजर -- सातारा  राज्य शासनाच्या आमदार आदर्श ग्राम योजनेकडे पाठ फिरविलेल्या जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी ‘लोकमत’च्या वृत्तानंतर या योजनेकडे धाव घेतली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शंभूराज देसाई, आ. आनंदराव पाटील यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन ई-मेल व फॅक्सद्वारे नियोजन विभागाला आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी निवडलेल्या प्रत्येकी चार गावांची यादी दिली आहे. ‘आदर्श ग्राम योजनेकडे बहुतांश आमदारांची पाठ’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने दि. १७ सप्टेंबर २0१५ च्या अंकात वृत्त प्रसिध्द केले होते. या तारखेआधी आमदार शशिकांत शिंदे यांनीच केवळ गावांचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर केला होता. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच त्याच दिवशी आमदार शंभूराज देसाई यांनी आपला प्रस्ताव नियोजन विभागाकडे दिला. त्यामध्ये वेखंडवाडी, सोनवडे (ता. पाटण) व आरेवाडी (ता. कऱ्हाड) ही त्यांच्या मतदारसंघातील तीन गावे योजनेसाठी निवडली आहेत. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दि. १८ सप्टेंबर रोजी भोगाव, गोळेश्वर, पोतले (ता. कऱ्हाड) या तीन गावांचा प्रस्ताव दिला. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्याच दिवशी गावांचा प्रस्ताव दिला. त्यांनी फलटण तालुक्यातील दुधेबावी, खंडाळा तालुक्यातील अहिरे व कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक ही गावे योजनेसाठी घेऊन ‘बॅलन्स’ साधण्याचा प्रयत्न केला आहे. आ. आनंदराव पाटील यांनी कऱ्हाड तालुक्यातील मुंढे, पाडळी (केसे), टाळगाव ही तीन गावे निवडून त्याचा प्रस्ताव दि. १९ सप्टेंबर रोजी दाखल केला आहे. जिल्ह्यातील इतर आमदारांनीही प्रस्ताव सादर करण्याच्या जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.महाराष्ट्रात ‘आमदार आदर्श ग्राम’ योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी या योजनेकडे जिल्ह्यातल्या आमदारांनी पाठ फिरविली होती. मे महिन्यात आदेश निघाल्यानंतर माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेत तीन गावांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सर्वात आधी सादर केला होता. त्यांनी आपल्या मतदारसंघातील चिंचणेर निंब (ता. सातारा), कटगुण (ता. खटाव) व देऊर (ता. कोरेगाव) ही तीन गावे रचनात्मक विकासासाठी निवडली आहेत. केंद्र सरकारच्या ‘सांसद आदर्श ग्राम’ योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम’ योजना राबविण्याचा निर्णय राज्यातील फडणवीस सरकारने घेतला आहे. शासनाने याबाबत २0 मे २0१५ ला अद्यादेश काढला आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराने गावे निवडण्याचे आवाहन केले होते. मात्र यानंतरही आमदारांचा थंडा प्रतिसाद होता. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द करताच आमदारांनी या योजनेतील सहभागासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली सुरु केल्या.शासनाच्या ‘आमदार आदर्श ग्राम’ योजनेबाबत जिल्ह्यातील बहुसंख्य आमदारमंडळी बॅकफूटवर आहेत. यामागची कारणमिमांसा शोधण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला असता संपूर्ण मतदारसंघातील तीन गावेच आदर्श करायची, तर मतदारसंघातील इतर गावांची नाराजी ओढवून घेण्याची शक्यता असते. तरीही टप्पाटप्प्याने गावे सुधारण्यासाठी ही योजना फायद्याची ठरेल. तसे एका गावाचा आदर्श घेऊन बाजूची गावे सुधारतील, असाही राज्य शासनाचा या योजनेमागचा कयास आहे. योजनेत घेण्यासाठी गावकरी सरसावले!आमदारांनी आपले गाव दत्तक घ्यावे, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक जण आमदारांची खासगीत भेट घेऊन त्यांच्याकडे गाव योजनेत घेण्याची विनंती करत आहेत. याउलट काही गावांचे असेही पदाधिकारी आहेत की त्यांना ही योजना काय रे भाऊ म्हणण्याची वेळ आली आहे.