शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अखेर ‘आदर्श’ वाटचाल सुरू!

By admin | Updated: September 22, 2015 23:52 IST

चार आमदार सरसावले : शिंदेंनंतर रामराजे, पृथ्वीराज, शंभूराज, आनंदरावांनी सादर केले प्रस्ताव--लोकमतचा प्रभाव

सागर गुजर -- सातारा  राज्य शासनाच्या आमदार आदर्श ग्राम योजनेकडे पाठ फिरविलेल्या जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी ‘लोकमत’च्या वृत्तानंतर या योजनेकडे धाव घेतली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शंभूराज देसाई, आ. आनंदराव पाटील यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन ई-मेल व फॅक्सद्वारे नियोजन विभागाला आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी निवडलेल्या प्रत्येकी चार गावांची यादी दिली आहे. ‘आदर्श ग्राम योजनेकडे बहुतांश आमदारांची पाठ’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने दि. १७ सप्टेंबर २0१५ च्या अंकात वृत्त प्रसिध्द केले होते. या तारखेआधी आमदार शशिकांत शिंदे यांनीच केवळ गावांचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर केला होता. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच त्याच दिवशी आमदार शंभूराज देसाई यांनी आपला प्रस्ताव नियोजन विभागाकडे दिला. त्यामध्ये वेखंडवाडी, सोनवडे (ता. पाटण) व आरेवाडी (ता. कऱ्हाड) ही त्यांच्या मतदारसंघातील तीन गावे योजनेसाठी निवडली आहेत. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दि. १८ सप्टेंबर रोजी भोगाव, गोळेश्वर, पोतले (ता. कऱ्हाड) या तीन गावांचा प्रस्ताव दिला. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्याच दिवशी गावांचा प्रस्ताव दिला. त्यांनी फलटण तालुक्यातील दुधेबावी, खंडाळा तालुक्यातील अहिरे व कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक ही गावे योजनेसाठी घेऊन ‘बॅलन्स’ साधण्याचा प्रयत्न केला आहे. आ. आनंदराव पाटील यांनी कऱ्हाड तालुक्यातील मुंढे, पाडळी (केसे), टाळगाव ही तीन गावे निवडून त्याचा प्रस्ताव दि. १९ सप्टेंबर रोजी दाखल केला आहे. जिल्ह्यातील इतर आमदारांनीही प्रस्ताव सादर करण्याच्या जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.महाराष्ट्रात ‘आमदार आदर्श ग्राम’ योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी या योजनेकडे जिल्ह्यातल्या आमदारांनी पाठ फिरविली होती. मे महिन्यात आदेश निघाल्यानंतर माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेत तीन गावांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सर्वात आधी सादर केला होता. त्यांनी आपल्या मतदारसंघातील चिंचणेर निंब (ता. सातारा), कटगुण (ता. खटाव) व देऊर (ता. कोरेगाव) ही तीन गावे रचनात्मक विकासासाठी निवडली आहेत. केंद्र सरकारच्या ‘सांसद आदर्श ग्राम’ योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम’ योजना राबविण्याचा निर्णय राज्यातील फडणवीस सरकारने घेतला आहे. शासनाने याबाबत २0 मे २0१५ ला अद्यादेश काढला आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराने गावे निवडण्याचे आवाहन केले होते. मात्र यानंतरही आमदारांचा थंडा प्रतिसाद होता. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द करताच आमदारांनी या योजनेतील सहभागासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली सुरु केल्या.शासनाच्या ‘आमदार आदर्श ग्राम’ योजनेबाबत जिल्ह्यातील बहुसंख्य आमदारमंडळी बॅकफूटवर आहेत. यामागची कारणमिमांसा शोधण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला असता संपूर्ण मतदारसंघातील तीन गावेच आदर्श करायची, तर मतदारसंघातील इतर गावांची नाराजी ओढवून घेण्याची शक्यता असते. तरीही टप्पाटप्प्याने गावे सुधारण्यासाठी ही योजना फायद्याची ठरेल. तसे एका गावाचा आदर्श घेऊन बाजूची गावे सुधारतील, असाही राज्य शासनाचा या योजनेमागचा कयास आहे. योजनेत घेण्यासाठी गावकरी सरसावले!आमदारांनी आपले गाव दत्तक घ्यावे, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक जण आमदारांची खासगीत भेट घेऊन त्यांच्याकडे गाव योजनेत घेण्याची विनंती करत आहेत. याउलट काही गावांचे असेही पदाधिकारी आहेत की त्यांना ही योजना काय रे भाऊ म्हणण्याची वेळ आली आहे.