शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

वणवा लावणाऱ्यांवर आता कारवाई

By admin | Published: March 28, 2016 11:33 PM

प्रदीप बुधनवर : आंतरराष्ट्रीय वनदिनाच्या निमित्ताने प्रतिपादन

वाई : ‘वाईच्या पश्चिम भागात वणवा लावण्याचे प्रमाण अधिक असून, वनविभागाने संपूर्ण वर्षभरात जाहिराती, फ्लेक्स, नोटीस, जाळपट्टे तयार करून तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वणव्यामुळे पर्यावरणाचा कसा ऱ्हास होतो, याचे प्रबोधन करूनही वणवा लावणाऱ्यांची मुजोरी थांबली नाही. यापुढे वनविभागाच्या डोंगरांना वणवा लागल्यास शेजारी मालकीचा डोंगर असणाऱ्यांवर वणवा विरोधी कडक कारवाई करण्यात येणार आहे,’ असे प्रतिपादन वाई वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप बुधनवर यांनी केले.वाईच्या पश्चिम भागात बोरगाव येथील माध्यमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वाईच्या पश्चिम भागात वणवा लावणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याने वनविभागही पश्चिम भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून परिसरातील शेतकऱ्यांना वनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रबोधन करत आहे. त्या अनुषंगाने बोरगाव येथील माध्यमिक शाळेत नांदगणे, परतवडी, बलकवडी, उळुंब गावांचा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीकांत वाघ, वनपाल चंद्रकांत कांबळे, नांदगणेचे सरपंच पोपटराव मोरे, वनपाल प्रदीप शेवते, संभाजी दहिफळे, प्रकाश बाबर, वैभव शिंदे, सदानंद राजापुरे, रामचंद्र देसाई, संजय चव्हाण, भि. वा. खुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.वनक्षेत्रपाल बुधनवर म्हणाले, ‘वनविभागाच्या वनक्षेत्रात १५ फुटांपर्यंत जाळपट्टे तयार केले जातात. अशा पद्धतीने वनाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातात, तरीही या भागात स्वत:च्या मालकीचे डोंगर असणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने गैरसमजुतीतून वणवा लावल्याने शेजारीच असणाऱ्या वनविभागाच्या वनक्षेत्राला त्याची झळ पोहोचते. या भागातील ग्रामपंचायतीने व स्थानिक नागरिकांनी या समाज कंटकांना वणवा लावण्यापासून रोखण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे.’ कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोरगाव येथील माध्यमिक शाळेत फ्लेक्स चे उद्घाटन शाळेतील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी तसेच स्थानिक नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्रीकांत वाघ यांनी वनविभाग अधिकाऱ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या मार्फत या परिसरामध्ये वणवा विरोधी जास्तीत-जास्त प्रबोधन करण्याचे आश्वासन दिले. आंतरराष्ट्रीय वनदिन साजरा करण्यासाठी वनविभागाच्या सर्व विभागातील कर्मचारी व सेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे हरित सेनेच्या शिक्षिका रूपाली शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)सध्या डोंगराळ भागामध्ये गैरसमजुतीतून व समाज कंटाकांच्या सूड भावनेतून वाईच्या पश्चिम भागात अनेक डोंगर वणव्याच्या भक्षस्थानी पडून ओसाड झाले आहेत. वणव्यामुळे जनावरांचा चारा, सरपटणारे प्राणी, पशु-पक्षी, मोकाट जनावरे यांना मोठी झळ पोहोचते. तसेच त्यामुळे वनविभागाच्या वनक्षेत्राचे न भरून निघणारे नुकसान होत आहे.-चंद्रकांत कांबळे ( वनपाल, पश्चिम भाग)