शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई : ऊस मोजण्याचे वजनकाटे अचानकपणे तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 23:54 IST

या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके तयार केली आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी, साखर आयुक्त कार्यालयाचा एक प्रतिनिधी, वजनमापे विभागाचा एक अधिकारी, तसेच शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे ११ तालुक्यांत पथके तयार

सागर गुजर ।सातारा : साखर कारखान्यावर गाळपासाठी आणलेला ऊस कमी वजनाचा दाखवून काटामारी करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वजनकाटे तपासण्यासाठी अकरा पथके तयार केली आहेत. ही पथके अचानक जाऊन कारखान्यावरील वजनकाट्यांची तपासणी करणार आहेत, तसेच दोषी आढळणाºया कारखान्यांवर कारवाईदेखील केली जाणार आहे.

जिल्ह्यात ऊस गाळपाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी ऊसतोड आणि ऊस वाहतूक होताना पाहायला मिळते. कारखान्यापासून कमी अंतरातील ऊस हा बैलगाडीच्या माध्यमातून वाहून नेला जातो, तर जास्त अंतरातील ऊस हा ट्रॅक्टर-ट्रॉली अथवा ट्रकच्या माध्यमातून कारखान्यावर नेला जातो. कारखान्यावर ऊस गाळपाला निघण्याआधी या उसाची वाहने वजनकाट्यावर तपासली जातात. या वाहनांचे वजन वगळता त्यात असलेला ऊस जेवढ्या टनाचा आहे, त्याची नोंद होते. साहजिकच याठिकाणी नोंदवले गेलेले वजन हेच अंतिम असते. जितका ऊस आहे, त्याला टनाला जो दर दिला जातो, त्याचे गणित करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग केली जाते.

दरम्यान, साखर कारखान्यावर काटेमारी होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. शेतकरी संघटनांची व कारखाना व्यवस्थापनांची बैठक नुकतीच जिल्हा प्रशासनाने घेतली होती. या बैठकीमध्ये शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर कारखाने कशाप्रकारे काटेमारी करतात, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

तसेच जिल्हा प्रशासन नेहमीप्रमाणे वजनकाटे तपासणीचे पथक नेमते, मात्र हे पथक संबंधित कारखान्यांना आधीच सूचना करून त्याठिकाणी तपासणी करण्यासाठी जाते. साहजिकच साखर कारखान्यांना याची माहिती आधीच मिळत असल्याने जे योग्य प्रमाण आहे, असे वजन काटे दाखवले जातात आणि त्याची तपासणी योग्य असल्याचा रिपोर्ट संबंधित पथकाकडून प्रशासनाला दिला जातो. ही बाब शेतकºयांसाठी अन्यायकारक अशीच असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नेमलेली पथके अचानकपणे जर साखर कारखान्यांवर धाडली केली तर नेमकी बाब पुढे येऊ शकते, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके तयार केली आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी, साखर आयुक्त कार्यालयाचा एक प्रतिनिधी, वजनमापे विभागाचा एक अधिकारी, तसेच शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

ही पथके अचानकपणे कारखान्यांवर धाडी टाकतील. काट्यांची तपासणी केल्यानंतर जर ते अयोग्य अथवा त्यात बोगसगिरी आढळल्यास ते काटे सील केले जाणार आहेत.

 

  • ऊस वाहतुकीचा खर्च वेगळा

प्रत्येक साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र ठरलेले असते. त्या कार्यक्षेत्रामध्ये असलेला ऊस गाळप झाल्यानंतर गेट केनचा ऊस आणला जातो. मात्र प्रत्येक कारखान्याचा एकाच किलोमीटरमधील ऊस वाहतुकीचा खर्च वेगवेगळा दिसतो. हा खर्च शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून परस्पर वसूल केला जात असतो, त्यामुळे हा खºया खर्चाबाबत साखर कारखान्यांनी पारदर्शक पारदर्शकता ठेवायला हवी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या तहसीलदारांना वजनकाटे तपासण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. साखर कारखान्यांकडील वजनकाटे सुस्थितीत ठेवावेत, ही कारवाई कुठल्याही क्षणी होऊ शकते.- रामचंद्र शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी