शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वाग्दत्त वरासह चौघांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: April 6, 2015 01:30 IST

साखरपुड्यानंतर विवाह मोडला : बारा तोळे सोन्याची केली होती मागणी

कऱ्हाड : साखरपुडा झाल्यानंतर बारा तोळे सोन्याची मागणी करीत लग्नास नकार देणाऱ्या वाग्दत्त वरासह चौघांवर कऱ्हाड तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत वाग्दत्त वधूच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. वाग्दत्त वर सुनील गजानन कदम, त्याचे वडील गजानन परशुराम कदम, भाऊ संदीप गजानन कदम आणि चुलता किसन परशुराम कदम (सर्व रा. तारापूर, मुंबई) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारापूर येथील सुनीलचा विवाह उंडाळे परिसरातील एका युवतीशी ठरला होता. त्यानंतर साखरपुडाही झाला. मात्र, दि. २५ मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास युवतीच्या वडिलांना सुनीलच्या नातेवाइकांनी फोन करून तुमच्या मुलीच्या पायात दोष आहे, असे कारण सांगत लग्नात बारा तोळे सोने देण्याची मागणी केली. वराच्या नातेवाइकाकडून आलेला फोन ऐकल्यानंतर युवतीच्या वडिलांनी साखरपुड्यावेळी असे काही ठरले नव्हते, असे सांगितले. त्यावेळी लग्न मोडण्याची धमकी सुनीलच्या नातेवाइकांकडून मुलीच्या वडिलांना देण्यात आली. धमकी दिल्याप्रमाणे मुलाकडील मंडळींनी लग्न मोडल्यानंतर संबंधित युवतीच्या वडिलांनी कऱ्हाड तालुका पोलिसात सुनील कदम याच्यासह चौघांविरूद्ध तक्रार दिली. त्यानुसार त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार एस. के. फडतरे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)