शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वाग्दत्त वरासह चौघांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: April 6, 2015 01:30 IST

साखरपुड्यानंतर विवाह मोडला : बारा तोळे सोन्याची केली होती मागणी

कऱ्हाड : साखरपुडा झाल्यानंतर बारा तोळे सोन्याची मागणी करीत लग्नास नकार देणाऱ्या वाग्दत्त वरासह चौघांवर कऱ्हाड तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत वाग्दत्त वधूच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. वाग्दत्त वर सुनील गजानन कदम, त्याचे वडील गजानन परशुराम कदम, भाऊ संदीप गजानन कदम आणि चुलता किसन परशुराम कदम (सर्व रा. तारापूर, मुंबई) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारापूर येथील सुनीलचा विवाह उंडाळे परिसरातील एका युवतीशी ठरला होता. त्यानंतर साखरपुडाही झाला. मात्र, दि. २५ मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास युवतीच्या वडिलांना सुनीलच्या नातेवाइकांनी फोन करून तुमच्या मुलीच्या पायात दोष आहे, असे कारण सांगत लग्नात बारा तोळे सोने देण्याची मागणी केली. वराच्या नातेवाइकाकडून आलेला फोन ऐकल्यानंतर युवतीच्या वडिलांनी साखरपुड्यावेळी असे काही ठरले नव्हते, असे सांगितले. त्यावेळी लग्न मोडण्याची धमकी सुनीलच्या नातेवाइकांकडून मुलीच्या वडिलांना देण्यात आली. धमकी दिल्याप्रमाणे मुलाकडील मंडळींनी लग्न मोडल्यानंतर संबंधित युवतीच्या वडिलांनी कऱ्हाड तालुका पोलिसात सुनील कदम याच्यासह चौघांविरूद्ध तक्रार दिली. त्यानुसार त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार एस. के. फडतरे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)