शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

घर बांधणे आवाक्याबाहेर; वाळू पुन्हा महागणार

By दीपक देशमुख | Updated: February 27, 2024 12:18 IST

शासनाचे सुधारित वाळू धोरण : निविदेनुसार ठरणार दर

दीपक देशमुखसातारा : सरकारने गेल्या वर्षी नवीन वाळू धोरण आणून घरे बांधण्याची स्वप्न पाहत असलेल्या सर्वसामान्यांना आशेचा किरण दाखवला होता. मात्र, आता पुन्हा नवीन वाळू धोरण आणून गरिबांच्या या आशेवर पाणी फिरवले आहे. नवीन धोरणानुसार गोरगरिबांना वाळू आता सहाशे रुपयांना मिळणार नाही. वाळूच्या डेपोनिहाय निविदा काढण्यात येऊन निविदा दर, रॉयल्टी, जिल्हा खनिज प्रतिष्ठान रक्कम व इतर देय रकमा मिळून वाळूचा दर ठरणार असून, ही किंमत आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकते.

नदीपात्रातील गाळ, गाळमिश्रित वाळू काढणे, धरणातील गाळ काढला जाऊन राज्यातील पूर परिस्थितीचा धोका कमी करणे, नदीचा प्रवाह सुरळीत करणे आदी बाबींसाठी शासनाने २८ जानेवारी २०२२ रोजी नवीन सुधारित वाळू व रेती धोरण बनविले होते. यातून उपलब्ध झालेली वाळू नागरिकांना स्वस्त दराने उपलब्ध करून देणे व अनधिकृत उत्खननास आळा घालण्याच्या उद्देशाने उत्खनन, साठवणूक व्यवस्थापन व ऑनलाइन विक्री करण्याबाबतचे सर्वंकष धोरण शासन निर्णय १९ एप्रिल २०२३ पासून १ वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवले होते. त्याला सर्वसामान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.या प्रायोगिक धोरणाची मुदत एप्रिलमध्ये संपणार आहे. त्यानंतर ही वाळू पूर्वीप्रमाणे सहाशे रुपये प्रति ब्रास यानुसार असणार नाही. नवीन धोरणानुसार प्रत्येक निविदेच्या किमतीनुसार वाळूचा दर ठरणार आहे. सध्या साधारणपणे वाळूचा दर प्रतिटन ५०० रुपयांच्या आसपास म्हणजेच प्रति ब्रास २९०० ते ३००० पर्यंत होऊ शकतो. यामध्ये स्वामित्वधन (राॅयल्टी) आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीची रक्कम व इतर देय रकम मिळून हा खर्च तीन ते साडेतीन हजारांपर्यंत जाऊ शकतो. शिवाय वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यानेच करायचा आहे.असा ठरणार निविदेचा दरवाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, भराई व उतराईचा खर्च, डेपो निर्मिती व व्यवस्थापन या बाबींवरील होणारा खर्च गृहीत धरून प्रति मेट्रिक टन याप्रमाणे एकच निविदा काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

घर बांधणे आवाक्याबाहेरसध्या घर बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मुळात मोकळ्या जागा, प्लॉट यांच्या किमती गगनाला भिडू लागल्या आहेत. जमीन खरेदीसाठीच मोठी जमा पुंजी घालावी लागते. यानंतर घर बांधायला घेण्यासाठी खर्चाची जुळवाजुळव करेपर्यंत कित्येक वर्षे जमीन पडून असते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsandवाळू