शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

कोयना प्रकल्पग्रस्तांकडून अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

सातारा : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन गेल्या २८ दिवसांपासून सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाकडे डोळेझाक ...

सातारा : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन गेल्या २८ दिवसांपासून सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाकडे डोळेझाक केली असल्याने संतप्त आंदोलकांनी सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, मंगळवारी प्रधान सचिवांसोबत होणाऱ्या बैठकीनंतरही निर्णय झाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते चैतन्य दळवी यांनी सांगितले.

काेयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न ६४ वर्षे उलटून गेली तरी लोंबकळत पडला आहे. धरणग्रस्तांचे विकसनशील पुनर्वसन बाजूलाच पण साधे पुनर्वसनही होऊ शकले नाही, याविषयी प्रशासनाला कोणतेच सोयरसूतक नाही, उलट प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम प्रशासनाने केले आहे.

कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन रखडले आहे. २०१८ आणि २०१९ला तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या बैठकीत निर्णय झाले, तेव्हा महामारी, साथ किंवा कोरोना नव्हता. प्रशासनाने प्रामाणिकपणे या दहा वर्षांच्या विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त करणे सोडाच, त्याउलट प्रकल्पग्रस्तांचे संकलन रजिस्टर करून जमीन वाटप सुरु केलेले नाही.

दरम्यान, मंगळवार, दि. १५ रोजी प्रधान सचिवांच्या उपस्थितीत याप्रकरणी बैठक होणार आहे. या बैठकीला धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर उपस्थित राहणार असून, या बैठकीमधून प्रश्न सुटण्याची धरणग्रस्तांना अपेक्षा आहे.

गरिबांना आंदोलनाची हौस नाही...

कोणतीही गरीब माणसे ज्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो, ते सुखासुखी आंदोलनाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. कोयना प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेला लढा हा कोणताही पर्याय उरलेला नसल्यामुळेच सुरू केला आहे. त्यांना एवढेच ठरवायचे आहे की, महामारीने मरायचे, उपासमारीने मरायचे की लढून मरायचे. पहिल्या टप्प्यात एकवेळचे अन्नत्याग आता तर दोन्हीवेळेचे अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला असल्याने प्रशासनाने आतातरी निर्णय घ्यावा, अशी मागणी चैतन्य दळवी यांनी केली आहे.

फाेटो नेम : १५ कोयना

फोटो ओळ : कोयना भरे (ता. भिवंडी) येथे सोमवारपासून श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले आहे.