शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

नाराजांच्या तहकुबीला गैरहजेरीचं निमित्त!

By admin | Updated: March 2, 2016 23:56 IST

राष्ट्रवादीचा स्वतंत्र गट अस्वस्थच : अर्थसंकल्पीय सभेचा मुहूर्त साधत विरोधात बसण्याचा इशारा प्रत्यक्षात..

सातारा : ‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिली नाही, त्यामुळे पदाधिकारी राजीनामा देत नसतील तर स्वतंत्र गट करून विरोधात बसण्याची आमची तयारी आहे,’ अशी संतापजनक खंत व्यक्त करत ८ फेब्रुवारी २०१६ रोजी जिल्हा परिषदेतील २५ सदस्यांनी बंडाचा इशारा दिला होता. हाच इशारा राष्ट्रवादीच्या नाराज सदस्यांनी बुधवारी (दि. २ मार्च) अर्थसंकल्पाच्या सभेत खरा करून दाखविला. ‘लोकमत’ ने याबाबत ९ फेब्रुवारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय गेल्या दोन महिन्यांपासून ऐरणीवर आहे. संबंधितांनी राजीनामा देऊन नव्यांना संधी द्यावी, अशी सुप्त इच्छा असणारी राष्ट्रवादीमधील जिल्हा परिषद सदस्य अनेक दिवसांपासून चळवळीच्या भूमिकेमध्ये आहेत. ‘अजित पवार हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्यांच्या शब्दालाही पक्षात किंमत राहिलेली नाही. नेत्यांचे आदेश न मानता पदाधिकारी जर पदाला चिकटून बसतच असतील, तर आम्ही राजीनामा देतो, अथवा स्वतंत्र राहतो, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत आजच काय तो निर्णय घ्या. ज्यांनी राजीनामे दिले आहेत, ते तरी मंजूर करून घ्या,’ अशी मागणी अनेक सदस्यांनी यावेळी तावातावाने केली होती. स्वतंत्र गट तयार करण्याच्या पवित्र्यात २५ सदस्यांनी बंड करून बाहेर पडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना दिला होता.’अर्थसंकल्पीय सभेआधी राष्ट्रवादीची पार्टी मिटिंग पार पडली. मिटिंगमध्येच नाराज मंडळींनी आपली ‘योजना’ ठरविली होती. ही सभा तहकूब करण्यास आपल्याच पक्षाला भाग पाडायचे, असे ठरविण्यात आले होते. अर्थसंकल्पाच्या महत्त्वपूर्ण सभेला मुख्य कार्यकारी हजर राहत नाहीत, ही गंभीर बाब असल्याचे राष्ट्रवादीच्या अनिल देसाई, नितीन भरगुडे-पाटील व इतरांनी सांगितले. हे ‘आयतं कोलीत’ त्यांना मिळाले असल्याने सभा तहकुबीची मागणी त्यांनी केली. मात्र, विरोधकांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेण्याची मागणी केली होती. अध्यक्षांनी मात्र विरोधकांकडे दुर्लक्ष करून स्वपक्षातील नाराजांचीच बाजू घेऊन जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांत पडलेली ‘भेग’ मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर विरोधकांसह राष्ट्रवादीमधील काही सदस्य अध्यक्षांच्या दालनात दाखल झाले. ही सभा तहकूब करणे चुकीचे असल्याची नाराजी त्यांनी अध्यक्षांजवळ व्यक्त केली. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता असली तरीही नाराज मंडळींनी सभागृहाचे कामकाज होतेच कसे ते पाहू?, असा सज्जड इशारा तब्बल महिनाभरापूर्वी दिला होता. हा इशारा अमलात आणण्यासाठी नाराज मंडळींनी अर्थसंकल्पीय सभेचा मुहूर्त साधला हेच म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)राज्याचा अर्थसंकल्प झाल्याशिवाय जिल्हा परिषदेचा अंक मंजूर करून घेणे, हे चुकीचे ठरले असते, म्हणून आम्ही त्याची जाणीव करून दिली. राज्याचा अर्थसंकल्प २० मार्चच्या आसपास मंजूर होईल, त्यानंतर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर करणे सोयीचे होईल.- बाळासाहेब भिलारे, पक्षप्रतोद राष्ट्रवादीजिल्हा परिषदेचा २५ कोटी इतक्या स्वनिधीचा हा अर्थसंकल्प आहे. त्याला मंजुरी दिल्यानंतर पुरवणी अर्थसंकल्पात काही बाबी घेता आल्या असत्या, परंतु सदस्यांचे समाधान महत्त्वाचे होते. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार सभा तहकूब केली.- माणिकराव सोनवलकर, अध्यक्ष जिल्हा परिषदयशवंत विचारांची परंपरा सांगणाऱ्या काही मंडळींनी जाणीवपूर्वक सभा तहकूब करायला भाग पाडले आहे. त्यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी साधलेली वेळ चुकीची ठरली आहे. - शिवाजीराव शिंदे, कृषी सभापतीजिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. या अर्थसंकल्पीय सभेमध्ये या दुष्काळी उपाययोजनांबाबतीत चर्चा घडून येणे आवश्यक होते. परंतु सभा तहकूब करायला लावणाऱ्यांना त्याचे काही नव्हते. सभा तहकूब करून त्यांनी काय साधले?- अमित कदम, सभापती अर्थ व शिक्षण