शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

नाराजांच्या तहकुबीला गैरहजेरीचं निमित्त!

By admin | Updated: March 2, 2016 23:56 IST

राष्ट्रवादीचा स्वतंत्र गट अस्वस्थच : अर्थसंकल्पीय सभेचा मुहूर्त साधत विरोधात बसण्याचा इशारा प्रत्यक्षात..

सातारा : ‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिली नाही, त्यामुळे पदाधिकारी राजीनामा देत नसतील तर स्वतंत्र गट करून विरोधात बसण्याची आमची तयारी आहे,’ अशी संतापजनक खंत व्यक्त करत ८ फेब्रुवारी २०१६ रोजी जिल्हा परिषदेतील २५ सदस्यांनी बंडाचा इशारा दिला होता. हाच इशारा राष्ट्रवादीच्या नाराज सदस्यांनी बुधवारी (दि. २ मार्च) अर्थसंकल्पाच्या सभेत खरा करून दाखविला. ‘लोकमत’ ने याबाबत ९ फेब्रुवारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय गेल्या दोन महिन्यांपासून ऐरणीवर आहे. संबंधितांनी राजीनामा देऊन नव्यांना संधी द्यावी, अशी सुप्त इच्छा असणारी राष्ट्रवादीमधील जिल्हा परिषद सदस्य अनेक दिवसांपासून चळवळीच्या भूमिकेमध्ये आहेत. ‘अजित पवार हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्यांच्या शब्दालाही पक्षात किंमत राहिलेली नाही. नेत्यांचे आदेश न मानता पदाधिकारी जर पदाला चिकटून बसतच असतील, तर आम्ही राजीनामा देतो, अथवा स्वतंत्र राहतो, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत आजच काय तो निर्णय घ्या. ज्यांनी राजीनामे दिले आहेत, ते तरी मंजूर करून घ्या,’ अशी मागणी अनेक सदस्यांनी यावेळी तावातावाने केली होती. स्वतंत्र गट तयार करण्याच्या पवित्र्यात २५ सदस्यांनी बंड करून बाहेर पडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना दिला होता.’अर्थसंकल्पीय सभेआधी राष्ट्रवादीची पार्टी मिटिंग पार पडली. मिटिंगमध्येच नाराज मंडळींनी आपली ‘योजना’ ठरविली होती. ही सभा तहकूब करण्यास आपल्याच पक्षाला भाग पाडायचे, असे ठरविण्यात आले होते. अर्थसंकल्पाच्या महत्त्वपूर्ण सभेला मुख्य कार्यकारी हजर राहत नाहीत, ही गंभीर बाब असल्याचे राष्ट्रवादीच्या अनिल देसाई, नितीन भरगुडे-पाटील व इतरांनी सांगितले. हे ‘आयतं कोलीत’ त्यांना मिळाले असल्याने सभा तहकुबीची मागणी त्यांनी केली. मात्र, विरोधकांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेण्याची मागणी केली होती. अध्यक्षांनी मात्र विरोधकांकडे दुर्लक्ष करून स्वपक्षातील नाराजांचीच बाजू घेऊन जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांत पडलेली ‘भेग’ मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर विरोधकांसह राष्ट्रवादीमधील काही सदस्य अध्यक्षांच्या दालनात दाखल झाले. ही सभा तहकूब करणे चुकीचे असल्याची नाराजी त्यांनी अध्यक्षांजवळ व्यक्त केली. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता असली तरीही नाराज मंडळींनी सभागृहाचे कामकाज होतेच कसे ते पाहू?, असा सज्जड इशारा तब्बल महिनाभरापूर्वी दिला होता. हा इशारा अमलात आणण्यासाठी नाराज मंडळींनी अर्थसंकल्पीय सभेचा मुहूर्त साधला हेच म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)राज्याचा अर्थसंकल्प झाल्याशिवाय जिल्हा परिषदेचा अंक मंजूर करून घेणे, हे चुकीचे ठरले असते, म्हणून आम्ही त्याची जाणीव करून दिली. राज्याचा अर्थसंकल्प २० मार्चच्या आसपास मंजूर होईल, त्यानंतर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर करणे सोयीचे होईल.- बाळासाहेब भिलारे, पक्षप्रतोद राष्ट्रवादीजिल्हा परिषदेचा २५ कोटी इतक्या स्वनिधीचा हा अर्थसंकल्प आहे. त्याला मंजुरी दिल्यानंतर पुरवणी अर्थसंकल्पात काही बाबी घेता आल्या असत्या, परंतु सदस्यांचे समाधान महत्त्वाचे होते. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार सभा तहकूब केली.- माणिकराव सोनवलकर, अध्यक्ष जिल्हा परिषदयशवंत विचारांची परंपरा सांगणाऱ्या काही मंडळींनी जाणीवपूर्वक सभा तहकूब करायला भाग पाडले आहे. त्यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी साधलेली वेळ चुकीची ठरली आहे. - शिवाजीराव शिंदे, कृषी सभापतीजिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. या अर्थसंकल्पीय सभेमध्ये या दुष्काळी उपाययोजनांबाबतीत चर्चा घडून येणे आवश्यक होते. परंतु सभा तहकूब करायला लावणाऱ्यांना त्याचे काही नव्हते. सभा तहकूब करून त्यांनी काय साधले?- अमित कदम, सभापती अर्थ व शिक्षण