शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाण्याशिवाय ५ अन् अन्नाशिवाय ४० दिवस जगू शकते व्यक्ती!

By प्रगती पाटील | Updated: November 1, 2023 19:43 IST

२६ आॅक्टोबरपासून अन्न आणि जल त्याग करण्याची जरांगे पाटील यांच्या भूमिकेने अनेक समाजबांधवांच्या डोळ्यांतून अश्रु ओघळले

सातारा : निरोगी प्रौढ व्यक्ती अन्नाशिवाय काही आठवडे जगू शकते, परंतु सामान्यतः पाण्याशिवाय काही दिवस जगू शकते. सरासरी व्यक्ती पाण्याशिवाय सुमारे ४ ते ५ दिवस जगू शकते आणि अन्नाशिवाय सुमारे ४० दिवस जगू शकते. अनेक शारीरिक कार्यांसाठी पाणी आवश्यक आहे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे निर्जलीकरण होण्याची शक्यता असते.निर्जलीकरणाची ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. डिहायड्रेशनच्या लक्षणांमध्ये तहान, कोरडे तोंड, गडद रंगाची लघवी होणे आणि चक्कर येणे यांचा समावेश होतो. उच्च तापमान आणि शारीरिक श्रम यामुळे पाणी कमी होण्याचे प्रमाण आणि द्रव बदलण्याची गरज वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे पाण्याशिवाय जगणे आणखी कमी होऊ शकते.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. २६ आॅक्टोबरपासून अन्न आणि जल त्याग करण्याची जरांगे पाटील यांच्या भूमिकेने अनेक समाजबांधवांच्या डोळ्यांतून अश्रु ओघळले. वारंवार विणवण्या केल्यानंतर त्यांनी अन्न त्याग करण्याची भूमिका कायम ठेवत दिवसभरात अल्प जल घेण्यास सुरूवात केली. मानवी शरीरात ६० टक़्के पाणी आहे. त्याची कमतरता झाली तर त्याचे परिणाम त्वचा, मेंदु, किडनी आणि त्यानंतर संपूर्ण शरिरावर होतो. शरिरात पाण्याची पातळी राखली गेली नाही तर त्याचे गंभीर दुरगामी परिणाम शरिरावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जितकी जास्त चरबी तितके जगण्याची शक्यता जास्तपहिल्या चोवीस तासात शरिरातील ग्लुकोजचा साठा कमी होतो. त्यामुळे शरीर यकृत आणि स्नायुंमधील ग्लायकोजचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास सुरूवात करते. सलग दुसऱ्या दिवशीही शरीरात अन्न गेले नाहीतर शरिरात ग्लायकोज आणि ग्लुकोज तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे उर्जा मिळविण्यासाठी शरिरातील स्नायुंच्या उतीचे विघटन होते. या टप्प्यात तात्पुरती उर्जा मिळते यात शरिर उतींचे नुकसान टाळण्यासाठी चरबीचा वापर करते. जितकी जास्त चरबी तितके जगण्याची शक्यता जास्त असते. चरबी संपली की शरीर स्नायुंच्या विघटनाकडे वळते, कारण तेच त्यांच्या उर्जाचे स्त्रोत बनतात. अशा परिस्थितीत एकुण वजनाच्या १८ टक्के वजन कमी होण्याची शक्यता असते. 

उपासमार आणि निर्जलीकरण गंभीरमानवी शरीर ऊर्जेसाठी संचयित चरबी आणि स्नायूंच्या ऊतींचा वापर करून अन्नाशिवाय जगण्यास सक्षम आहे. तरीही एखादी व्यक्ती पाण्याशिवाय फक्त काही दिवस जगू शकते, कारण शरीराच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यांसाठी ते आवश्यक असते. शरीर त्याचे तापमान राखण्यासाठी, कचरा काढून टाकण्यासाठी आणि पोषक तत्वांची वाहतूक करण्यासाठी पाण्याचा वापर करते. पाण्याशिवाय, एखाद्या व्यक्तीचे निर्जलीकरण होऊन त्यांचे अवयव बंद होऊ लागतात. त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. जर हवामान उष्ण असेल आणि व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्रिय असेल तर जगण्याची वेळ खूपच कमी राहते. उपासमार आणि निर्जलीकरण गंभीर आरोग्य समस्यांचे कारण ठरू शकत असल्याने कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. 

शरिर निरोगी राहण्यासाठी पाण्याबरोबर रक्ताचे घटक यांचा समतोल राखला जातो. हे समतोल बिघडता तर त्याचा परिणाम मेंदु आणि हृदयावर होऊ शकतो. सोडीयम नसल्याने मेंदु आणि पोटॅशियमच्या अभावाने हृदयावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. शरिरात प्रथिनांची कमतरता भासु लागल्याने ग्लानी येणे, हात थरथरणे, अशक्तपणा जाणवण्याचे प्रकार घडतात. - डाॅ. प्रताप गोळे, पोटविकारतज्ज्ञ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी