शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याशिवाय ५ अन् अन्नाशिवाय ४० दिवस जगू शकते व्यक्ती!

By प्रगती पाटील | Updated: November 1, 2023 19:43 IST

२६ आॅक्टोबरपासून अन्न आणि जल त्याग करण्याची जरांगे पाटील यांच्या भूमिकेने अनेक समाजबांधवांच्या डोळ्यांतून अश्रु ओघळले

सातारा : निरोगी प्रौढ व्यक्ती अन्नाशिवाय काही आठवडे जगू शकते, परंतु सामान्यतः पाण्याशिवाय काही दिवस जगू शकते. सरासरी व्यक्ती पाण्याशिवाय सुमारे ४ ते ५ दिवस जगू शकते आणि अन्नाशिवाय सुमारे ४० दिवस जगू शकते. अनेक शारीरिक कार्यांसाठी पाणी आवश्यक आहे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे निर्जलीकरण होण्याची शक्यता असते.निर्जलीकरणाची ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. डिहायड्रेशनच्या लक्षणांमध्ये तहान, कोरडे तोंड, गडद रंगाची लघवी होणे आणि चक्कर येणे यांचा समावेश होतो. उच्च तापमान आणि शारीरिक श्रम यामुळे पाणी कमी होण्याचे प्रमाण आणि द्रव बदलण्याची गरज वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे पाण्याशिवाय जगणे आणखी कमी होऊ शकते.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. २६ आॅक्टोबरपासून अन्न आणि जल त्याग करण्याची जरांगे पाटील यांच्या भूमिकेने अनेक समाजबांधवांच्या डोळ्यांतून अश्रु ओघळले. वारंवार विणवण्या केल्यानंतर त्यांनी अन्न त्याग करण्याची भूमिका कायम ठेवत दिवसभरात अल्प जल घेण्यास सुरूवात केली. मानवी शरीरात ६० टक़्के पाणी आहे. त्याची कमतरता झाली तर त्याचे परिणाम त्वचा, मेंदु, किडनी आणि त्यानंतर संपूर्ण शरिरावर होतो. शरिरात पाण्याची पातळी राखली गेली नाही तर त्याचे गंभीर दुरगामी परिणाम शरिरावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जितकी जास्त चरबी तितके जगण्याची शक्यता जास्तपहिल्या चोवीस तासात शरिरातील ग्लुकोजचा साठा कमी होतो. त्यामुळे शरीर यकृत आणि स्नायुंमधील ग्लायकोजचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास सुरूवात करते. सलग दुसऱ्या दिवशीही शरीरात अन्न गेले नाहीतर शरिरात ग्लायकोज आणि ग्लुकोज तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे उर्जा मिळविण्यासाठी शरिरातील स्नायुंच्या उतीचे विघटन होते. या टप्प्यात तात्पुरती उर्जा मिळते यात शरिर उतींचे नुकसान टाळण्यासाठी चरबीचा वापर करते. जितकी जास्त चरबी तितके जगण्याची शक्यता जास्त असते. चरबी संपली की शरीर स्नायुंच्या विघटनाकडे वळते, कारण तेच त्यांच्या उर्जाचे स्त्रोत बनतात. अशा परिस्थितीत एकुण वजनाच्या १८ टक्के वजन कमी होण्याची शक्यता असते. 

उपासमार आणि निर्जलीकरण गंभीरमानवी शरीर ऊर्जेसाठी संचयित चरबी आणि स्नायूंच्या ऊतींचा वापर करून अन्नाशिवाय जगण्यास सक्षम आहे. तरीही एखादी व्यक्ती पाण्याशिवाय फक्त काही दिवस जगू शकते, कारण शरीराच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यांसाठी ते आवश्यक असते. शरीर त्याचे तापमान राखण्यासाठी, कचरा काढून टाकण्यासाठी आणि पोषक तत्वांची वाहतूक करण्यासाठी पाण्याचा वापर करते. पाण्याशिवाय, एखाद्या व्यक्तीचे निर्जलीकरण होऊन त्यांचे अवयव बंद होऊ लागतात. त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. जर हवामान उष्ण असेल आणि व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्रिय असेल तर जगण्याची वेळ खूपच कमी राहते. उपासमार आणि निर्जलीकरण गंभीर आरोग्य समस्यांचे कारण ठरू शकत असल्याने कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. 

शरिर निरोगी राहण्यासाठी पाण्याबरोबर रक्ताचे घटक यांचा समतोल राखला जातो. हे समतोल बिघडता तर त्याचा परिणाम मेंदु आणि हृदयावर होऊ शकतो. सोडीयम नसल्याने मेंदु आणि पोटॅशियमच्या अभावाने हृदयावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. शरिरात प्रथिनांची कमतरता भासु लागल्याने ग्लानी येणे, हात थरथरणे, अशक्तपणा जाणवण्याचे प्रकार घडतात. - डाॅ. प्रताप गोळे, पोटविकारतज्ज्ञ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी