शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पाण्याशिवाय ५ अन् अन्नाशिवाय ४० दिवस जगू शकते व्यक्ती!

By प्रगती पाटील | Updated: November 1, 2023 19:43 IST

२६ आॅक्टोबरपासून अन्न आणि जल त्याग करण्याची जरांगे पाटील यांच्या भूमिकेने अनेक समाजबांधवांच्या डोळ्यांतून अश्रु ओघळले

सातारा : निरोगी प्रौढ व्यक्ती अन्नाशिवाय काही आठवडे जगू शकते, परंतु सामान्यतः पाण्याशिवाय काही दिवस जगू शकते. सरासरी व्यक्ती पाण्याशिवाय सुमारे ४ ते ५ दिवस जगू शकते आणि अन्नाशिवाय सुमारे ४० दिवस जगू शकते. अनेक शारीरिक कार्यांसाठी पाणी आवश्यक आहे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे निर्जलीकरण होण्याची शक्यता असते.निर्जलीकरणाची ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. डिहायड्रेशनच्या लक्षणांमध्ये तहान, कोरडे तोंड, गडद रंगाची लघवी होणे आणि चक्कर येणे यांचा समावेश होतो. उच्च तापमान आणि शारीरिक श्रम यामुळे पाणी कमी होण्याचे प्रमाण आणि द्रव बदलण्याची गरज वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे पाण्याशिवाय जगणे आणखी कमी होऊ शकते.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. २६ आॅक्टोबरपासून अन्न आणि जल त्याग करण्याची जरांगे पाटील यांच्या भूमिकेने अनेक समाजबांधवांच्या डोळ्यांतून अश्रु ओघळले. वारंवार विणवण्या केल्यानंतर त्यांनी अन्न त्याग करण्याची भूमिका कायम ठेवत दिवसभरात अल्प जल घेण्यास सुरूवात केली. मानवी शरीरात ६० टक़्के पाणी आहे. त्याची कमतरता झाली तर त्याचे परिणाम त्वचा, मेंदु, किडनी आणि त्यानंतर संपूर्ण शरिरावर होतो. शरिरात पाण्याची पातळी राखली गेली नाही तर त्याचे गंभीर दुरगामी परिणाम शरिरावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जितकी जास्त चरबी तितके जगण्याची शक्यता जास्तपहिल्या चोवीस तासात शरिरातील ग्लुकोजचा साठा कमी होतो. त्यामुळे शरीर यकृत आणि स्नायुंमधील ग्लायकोजचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास सुरूवात करते. सलग दुसऱ्या दिवशीही शरीरात अन्न गेले नाहीतर शरिरात ग्लायकोज आणि ग्लुकोज तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे उर्जा मिळविण्यासाठी शरिरातील स्नायुंच्या उतीचे विघटन होते. या टप्प्यात तात्पुरती उर्जा मिळते यात शरिर उतींचे नुकसान टाळण्यासाठी चरबीचा वापर करते. जितकी जास्त चरबी तितके जगण्याची शक्यता जास्त असते. चरबी संपली की शरीर स्नायुंच्या विघटनाकडे वळते, कारण तेच त्यांच्या उर्जाचे स्त्रोत बनतात. अशा परिस्थितीत एकुण वजनाच्या १८ टक्के वजन कमी होण्याची शक्यता असते. 

उपासमार आणि निर्जलीकरण गंभीरमानवी शरीर ऊर्जेसाठी संचयित चरबी आणि स्नायूंच्या ऊतींचा वापर करून अन्नाशिवाय जगण्यास सक्षम आहे. तरीही एखादी व्यक्ती पाण्याशिवाय फक्त काही दिवस जगू शकते, कारण शरीराच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यांसाठी ते आवश्यक असते. शरीर त्याचे तापमान राखण्यासाठी, कचरा काढून टाकण्यासाठी आणि पोषक तत्वांची वाहतूक करण्यासाठी पाण्याचा वापर करते. पाण्याशिवाय, एखाद्या व्यक्तीचे निर्जलीकरण होऊन त्यांचे अवयव बंद होऊ लागतात. त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. जर हवामान उष्ण असेल आणि व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्रिय असेल तर जगण्याची वेळ खूपच कमी राहते. उपासमार आणि निर्जलीकरण गंभीर आरोग्य समस्यांचे कारण ठरू शकत असल्याने कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. 

शरिर निरोगी राहण्यासाठी पाण्याबरोबर रक्ताचे घटक यांचा समतोल राखला जातो. हे समतोल बिघडता तर त्याचा परिणाम मेंदु आणि हृदयावर होऊ शकतो. सोडीयम नसल्याने मेंदु आणि पोटॅशियमच्या अभावाने हृदयावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. शरिरात प्रथिनांची कमतरता भासु लागल्याने ग्लानी येणे, हात थरथरणे, अशक्तपणा जाणवण्याचे प्रकार घडतात. - डाॅ. प्रताप गोळे, पोटविकारतज्ज्ञ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी