शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याशिवाय ५ अन् अन्नाशिवाय ४० दिवस जगू शकते व्यक्ती!

By प्रगती पाटील | Updated: November 1, 2023 19:43 IST

२६ आॅक्टोबरपासून अन्न आणि जल त्याग करण्याची जरांगे पाटील यांच्या भूमिकेने अनेक समाजबांधवांच्या डोळ्यांतून अश्रु ओघळले

सातारा : निरोगी प्रौढ व्यक्ती अन्नाशिवाय काही आठवडे जगू शकते, परंतु सामान्यतः पाण्याशिवाय काही दिवस जगू शकते. सरासरी व्यक्ती पाण्याशिवाय सुमारे ४ ते ५ दिवस जगू शकते आणि अन्नाशिवाय सुमारे ४० दिवस जगू शकते. अनेक शारीरिक कार्यांसाठी पाणी आवश्यक आहे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे निर्जलीकरण होण्याची शक्यता असते.निर्जलीकरणाची ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. डिहायड्रेशनच्या लक्षणांमध्ये तहान, कोरडे तोंड, गडद रंगाची लघवी होणे आणि चक्कर येणे यांचा समावेश होतो. उच्च तापमान आणि शारीरिक श्रम यामुळे पाणी कमी होण्याचे प्रमाण आणि द्रव बदलण्याची गरज वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे पाण्याशिवाय जगणे आणखी कमी होऊ शकते.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. २६ आॅक्टोबरपासून अन्न आणि जल त्याग करण्याची जरांगे पाटील यांच्या भूमिकेने अनेक समाजबांधवांच्या डोळ्यांतून अश्रु ओघळले. वारंवार विणवण्या केल्यानंतर त्यांनी अन्न त्याग करण्याची भूमिका कायम ठेवत दिवसभरात अल्प जल घेण्यास सुरूवात केली. मानवी शरीरात ६० टक़्के पाणी आहे. त्याची कमतरता झाली तर त्याचे परिणाम त्वचा, मेंदु, किडनी आणि त्यानंतर संपूर्ण शरिरावर होतो. शरिरात पाण्याची पातळी राखली गेली नाही तर त्याचे गंभीर दुरगामी परिणाम शरिरावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जितकी जास्त चरबी तितके जगण्याची शक्यता जास्तपहिल्या चोवीस तासात शरिरातील ग्लुकोजचा साठा कमी होतो. त्यामुळे शरीर यकृत आणि स्नायुंमधील ग्लायकोजचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास सुरूवात करते. सलग दुसऱ्या दिवशीही शरीरात अन्न गेले नाहीतर शरिरात ग्लायकोज आणि ग्लुकोज तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे उर्जा मिळविण्यासाठी शरिरातील स्नायुंच्या उतीचे विघटन होते. या टप्प्यात तात्पुरती उर्जा मिळते यात शरिर उतींचे नुकसान टाळण्यासाठी चरबीचा वापर करते. जितकी जास्त चरबी तितके जगण्याची शक्यता जास्त असते. चरबी संपली की शरीर स्नायुंच्या विघटनाकडे वळते, कारण तेच त्यांच्या उर्जाचे स्त्रोत बनतात. अशा परिस्थितीत एकुण वजनाच्या १८ टक्के वजन कमी होण्याची शक्यता असते. 

उपासमार आणि निर्जलीकरण गंभीरमानवी शरीर ऊर्जेसाठी संचयित चरबी आणि स्नायूंच्या ऊतींचा वापर करून अन्नाशिवाय जगण्यास सक्षम आहे. तरीही एखादी व्यक्ती पाण्याशिवाय फक्त काही दिवस जगू शकते, कारण शरीराच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यांसाठी ते आवश्यक असते. शरीर त्याचे तापमान राखण्यासाठी, कचरा काढून टाकण्यासाठी आणि पोषक तत्वांची वाहतूक करण्यासाठी पाण्याचा वापर करते. पाण्याशिवाय, एखाद्या व्यक्तीचे निर्जलीकरण होऊन त्यांचे अवयव बंद होऊ लागतात. त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. जर हवामान उष्ण असेल आणि व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्रिय असेल तर जगण्याची वेळ खूपच कमी राहते. उपासमार आणि निर्जलीकरण गंभीर आरोग्य समस्यांचे कारण ठरू शकत असल्याने कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. 

शरिर निरोगी राहण्यासाठी पाण्याबरोबर रक्ताचे घटक यांचा समतोल राखला जातो. हे समतोल बिघडता तर त्याचा परिणाम मेंदु आणि हृदयावर होऊ शकतो. सोडीयम नसल्याने मेंदु आणि पोटॅशियमच्या अभावाने हृदयावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. शरिरात प्रथिनांची कमतरता भासु लागल्याने ग्लानी येणे, हात थरथरणे, अशक्तपणा जाणवण्याचे प्रकार घडतात. - डाॅ. प्रताप गोळे, पोटविकारतज्ज्ञ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी