शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

चुली विझल्या, गाव रडले अन् पेटविला क्रांतीचा वणवा; सातारा जेल फोडण्याच्या घटनेला ८१ वर्षे पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 19:00 IST

१८ फुटी भिंतीवरून पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या यज्ञासाठी घेतलेली ती उडी आजही अंगावर शहारे आणते

सातारा/वाळवा : १० सप्टेंबर १९४४ ची ती पहाट.. सातारा जेलमध्ये पहाटेचा उजेड पसरत असतानाच क्रांतीचा सूर्यही तेजाळत होता. १८ फुटी भिंतीवरून पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या यज्ञासाठी घेतलेली ती उडी आजही अंगावर शहारे आणते. सातारा जेल फोडण्याच्या घटनेला बुधवारी ८१ वर्षे पूर्ण होत आहेत.वाळव्यात (जि. सांगली) २८ जुलै रोजी झालेल्या सभेत नागनाथ अण्णांनी ‘स्वातंत्र्य दूर नाही, तयार राहा!’ असा जाज्वल्य संदेश दिला. या भाषणाने गावकऱ्यांच्या अंगात क्रांतीचे रक्त सळसळले; पण विश्वासघातकी खबऱ्यामुळे पोलिसांनी अण्णांना अटक केली. अण्णांना कैद झाल्याचे कळताच वाळव्याच्या जनतेने चुली विझवून आपले दु:ख व्यक्त केले. रडणाऱ्या लोकांना अण्णांनी ‘मी परत येतो’ असा दिलासा दिला आणि ते निर्धाराने तुरुंगात गेले. प्रथम इस्लामपूर जेलमध्ये ठेवले, तिथून पलायनाचा बेत आखला. मात्र, चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागून योजना उधळली. अखेर साताऱ्याच्या तटबंदी जेलमध्ये हलवण्यात आले. तिथे अण्णांनी कैद्यांत मिसळून धाडसी आराखडा आखला. ‘इथे जिवंत असून मेल्यासारखे वाटते, म्हणून तुरुंग फोडणारच!’ असा ठाम निर्धार करून प्रसंगी गोळी झेलण्याची मानसिकता करीत अण्णांनी नियोजन केले आणि अमलातही आणले. 

म्हणून १० सप्टेंबर शौर्य दिन..अण्णा सातारा जेलमधून बाहेर पडल्याने स्वातंत्र्यसैनिकांचा आत्मविश्वास उंचावला. ब्रिटिश सत्तेला मोठा धक्का बसला. या घटनेने संपूर्ण क्रांती चळवळीत नवीन ऊर्जा निर्माण झाली. आज त्या उडीला ८१ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी १० सप्टेंबर ‘शौर्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. सातारा जेलचा तट आजही उभा आहे आणि त्या निर्भय झेपेचा प्रसंग आजही काळजाला भिडतो. 

...अन् तो क्षण उजाडला 

  • रविवार, दि.१० सप्टेंबर १९४४ रोजी सातारा जेलमधील कैद्यांना पहाटे अंघोळीला नेण्यात आले. सहकाऱ्यांच्या खांद्याचा आधार घेत अण्णा तटावर चढले. 
  • पुढे १८ फूट खोल दरी, मागे बंदुकींचा दबा धरून असलेले शिपाई. तरीही त्यांनी क्षणार्धात उडी मारली! हाताला किरकोळ जखम झाली; पण चपळाईने ते दूर्वा उपटू लागले. गणेशोत्सवाचा काळ असल्याने जणू गणपतीसाठी हराळी घेत आहेत, असा भास त्यांनी निर्माण केला. 
  • गोंधळलेल्या पोलिसांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. बेधडक चालत अण्णा थेट सोमवार पेठेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घरी पोहोचले.