शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

८१ वर्षाच्या माजी सैनिकाने एका एकरात घेतले १० लाखाचे उच्चांकी उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 12:10 IST

यशकथा : वयाच्या ८१ व्या वषीर्ही त्यांची शेतात राबायची तयारी हे खरोखरच तरुणांना दिशादर्शकच आहे.

- साहील शहा  ( सातारा) 

कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न काढणारे अनेक जण असतात; पण वयाच्या ८१ व्या वर्षीही शेतीत तरुणांना लाजवेल असे काम  कोरेगाव तालुक्यातील धामणेरमधील माजी सैनिक नामदेव महादेव माने करीत आहेत. त्यांनी आपल्या एक एकरातील अद्रक शेतात उसाचे आंतरपीक घेऊन १४ महिन्यांत दहा लाखांहून अधिक उच्चांकी उत्पादन घेतले आहे, तसेच ३० टन आले पिकाचेही उत्पन्न मिळविले आहे. 

सैनिक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर नामदेव माने यांनी खासगी नोकरी सांभाळत शेती केली. शेतात विक्रमी उत्पन्न घेण्यासाठी त्यांनी पहिल्यापासूनच नियोजन करून पिकाची काळजी घेतली. जमिनीतील बुरशीचे प्रमाण पूर्णपणे कमी करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला रोटाव्हेटर फिरविले. नंतर तागाची लागवड केली. अडीच महिन्यांनी फुले लागल्यानंतर संपूर्ण ताग जमिनीत गाडून टाकला, तसेच दोन ट्रॉली शेणखत टाकले. यानंतर रान चांगले तापू दिले. पुन्हा जमिनीत रोटाव्हेटर फिरविला. नंतर सव्वाचार फुटी बेड तयार करून घेतला. जून २०१७ मध्ये औरंगाबादी जातीच्या अद्रकाची बियाण्यासाठी निवड केली. 

अद्रक उगवून आल्यानंतर पहिल्या महिन्यात तीन आळवण्या केल्या. योग्य प्रमाणात पाणी व खतांची मात्रा मिळण्यासाठी ड्रीपचा वापर केला. पावसाळ्यामध्ये एकदा बुरशीनाशक ड्रीपमधून दिले, तसेच किडीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पंपाला १५० मिली देशी गायीचे गोमूत्र फवारणी केली. पिकाच्या सरीमध्ये उसाची लागण केली. मार्च ते एप्रिलमध्ये आले काढणीयोग्य झाले. यामध्ये गुंठ्याला सव्वागाडी याप्रमाणे ६० गाड्या म्हणजे ३० टन, असे अद्रकाचे विक्रमी उत्पादन माने घेतले, तसेच उसाचे ८५ टन उत्पन्न मिळाले आहे.  

नामदेव माने यांनी उच्चांकी उत्पादन घेताना रासायनिक खतांचा अत्यल्प वापर केला आहे. जास्तीत जास्त जैविक व स्वत: तयार केलेल्या खतांचाच वापर करून त्यांनी उच्चांकी उत्पादन घेतले आहे, तसेच २५ लिटर जिवामृत तयार करण्यासाठी देशी गायीचे ५ किलो शेण, ५ लिटर गोमूत्र, १ लिटर तूप, अर्धा लिटर दही किंवा ताक, २ किलो खपली पेंड (शेंगाची, हरभरा डाळीचे पीठ २ किलो व केमिकल नसलेला गूळ २ किलो एवढे साहित्य लागते. हे साहित्य एकत्रित करून १० ते १५ दिवस हवाबंद बॅरल अथवा कॅनमध्ये ठेवले जाते. यानंतर हे जिवामृत पिकांना वापरण्यायोग्य होते. ड्रीपमधून एकरी ३ लिटर या प्रमाणात हे मिश्रण दिले जाते. याचाही पिकाच्या उत्पादन वाढीसाठी मोठा फायदा झाल्याचे माने यांनी स्पष्ट केले. 

वयाच्या ८१ व्या वषीर्ही त्यांची शेतात राबायची तयारी हे खरोखरच तरुणांना दिशादर्शकच आहे. परिसरातील अनेक शेतकरी आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करताना दिसत आहेत. एकूणच नामदेव माने यांची जिद्द, अविरत काम करण्याची सचोटी यामुळे विक्रमी उत्पादन घेण्यात ते अग्रेसर झाले आहेत. सैनिक बनून देशसेवेनंतर खासगी नोकरी करीत त्यांनी शेतीतही आपल्या यशस्वीतेचा झेंडा गाडला आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी