शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

खटाव तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींसाठी ७८.६० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:43 IST

वडूज : खटाव तालुक्यातील ९० पैकी ७६ ग्रामपंचायतींसाठी ७६.८० टक्के मतदान झाले. २६५ मतदान केंद्रांवर सर्वत्र शांततेत ...

वडूज : खटाव तालुक्यातील ९० पैकी ७६ ग्रामपंचायतींसाठी ७६.८० टक्के मतदान झाले. २६५ मतदान केंद्रांवर सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ५६३ सदस्य निवडीसाठी खटाव तालुक्यात १ हजार १८३ उमेदवारांचे नशीब मशीनमध्ये बंद झाले आहे.

खटाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यापूर्वीच १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ५६३ सदस्य निवडीसाठी तालुक्यात १ हजार १८३ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून २०५ सदस्य बिनविरोध झाले आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दीडपर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत होती. सायंकाळी साडेतीननंतर पुन्हा गर्दी झाली.

बहुतांशी ग्रामपंचायत निवडणूकीत आमने-सामने दुरंगी लढत पहावयास मिळाल्या. तर निमसोड, पुसेगावत अटीतटीच्या लढती झाल्या. ५१ हजार ५३८ महिला मतदार तर ५४ हजार ९४० पुरूष असे एक लाख ६ हजार ४७८ मतदारांनी हक्क बजावला. भुरकवडी, अंभेरी, शेनवडी, वांझोळी, कातळगेवाडी, गारूडी, गारवडी, गुंडेवाडी, हिवरवाडी, ढोकळवाडी, पुनवडी, अनफळे, दाळमोडी मानेवाडी-तुपेवाडी या १४ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.

पुसेसावळी, पुसेगाव, विसापूर, कलेढोण, पाचवड, धोंडेवाडी, अंबवडे, नागाचे कुमठे, चोराडे, जाखनगाव, चितळी, कातरखटाव, एनकूळ, येरळवाडी, बनपुरी, तडवळे, विखळे, निढळ व खातगूण या गावामध्ये दुरंगी लढत होत आहे.

खटाव तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठतेचा प्रश्न निर्माण झालेल्या पुसेगाव, निमसोड, एनकुळ, अंबवडे, पारगाव, कातरखटाव, येरळवाडी आदी ठिकाणी तुल्यबळ लढती झाल्याने तालुक्याचे लक्ष व राजकीय नेत्यांच्या लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे. शुक्रवार (दि. १५) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान झाले. तर सोमवारी (दि. १८) वडूज तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.