शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

जिल्ह्यात चार वर्षांत ७६ हजार महिलांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : प्रसूतीच्या वेळी महिला बाळालाच जन्म देत नाही तर ती सुद्धा पुनर्जन्म घेते. प्रसूती पहिल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : प्रसूतीच्या वेळी महिला बाळालाच जन्म देत नाही तर ती सुद्धा पुनर्जन्म घेते. प्रसूती पहिल्या वेळेची असेल तर अधिक गुंतागुतीची ठरू शकते. अशा मातांना वंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली असून मागील चार वर्षांत जिल्ह्यातील ७६ हजार महिलांना लाभ मिळालेला आहे. तर या अंतर्गत पाच हजारांची मदत दिली जात असून त्यासाठी १५० दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर २०१६ मध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली. या योजनेची घोषणा करण्यापूर्वी देशातील ५३ जिल्ह्यात इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना होती. महाराष्ट्रातील भंडारा आणि अमरावती या दोनच जिल्ह्यात ही योजना लागू होती. या योजनेचे महत्व ओळखून केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने संपूर्ण भारतात योजना लागू करण्याचे ठरविले. त्याला मान्यता मिळून आता प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अस्तित्वात आली. महाराष्ट्रात ८ डिसेंबर २०१७ ला ही योजना सुरू झाली.

योजना सुरू करण्याचा उद्देश म्हणजे दारिद्र्य रेषेखालील गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करावे लागते. तसेच प्रसूती नंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी कामावर जावे लागते. अशा महिला व माता कुपोषित राहून तिच्या नवजात बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे माता आणि बालमृत्यू दरात वाढ होते. या दोघांचेही आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन मृत्यूदर घटावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली.

केंद्रस्तर योजना महिला व बालकल्याण मंत्रालय राबवत असले तरी याची उपयोगिता व अनुषंगिक फायदे ओळखून महाराष्ट्रात ही योजना सार्वजनिक आरोग्य विभागाकडे देण्यात आलेली आहे. आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान पहिल्यापासूनच राबवत आहे. या अभियानाचे उद्दिष्टही माता आणि बालमृत्यू दर कमी करणे हेच आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे स्वरुप म्हणजे लाभार्थ्यांच्या त्यांच्या आधारकार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यात तीन टप्प्यात ५ हजार रुपये जमा करण्यात येतात. तसेच जननी सुरक्षा योजनेचा अतिरिक्त लाभ या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मिळतो. अशा प्रकारे ६ हजार रुपये लाभार्थ्यांना मिळत असतात. पहिला टप्पा १ हजार रुपयांचा प्राप्त करण्यासाठी लाभार्थींनी गर्भवती असताना म्हणजे १५० दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक असते. त्यामुळे पहिल्या तिमाहीमध्ये लाभार्थीची वैद्यकीय तपासणी होईल. तसेच वेळीच तपासणी झाल्यामुळे आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळतो.

लाभासाठी यांना संपर्क साधा...

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधून लाभ घेता येतो.

.........................

आवश्यक कागदपत्रे...

- लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड

- लाभार्थींचे आधार संलग्न बँक खाते

- गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवस आधी नोंद

- शासकीय संस्थेत गर्भवती काळात तपासणी

- बाळाचा नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण

या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर ३० दिवसांत लाभाची रक्कम अदा केली जाते.

पहिला टप्पा १०००

दुसरा टप्पा २०००

तिसरा टप्पा ३०००

.......................................

२०२०-२१ मध्ये जानेवारीअखेर प्रसूती झालेल्या महिलांची संख्या - ३२४१०

खासगी रुग्णालय - २२६८१. शासकीय रुग्णालय ९७२९

........................

२०१९-२० वर्षात प्रसूती झालेल्या महिलांची संख्या ४४६४५

खासगी रुग्णालये २९२५७ शासकीय रुग्णालये १५३८८

.......................................................

लाभ घेतलेल्या महिलांची संख्या

२०१७-१८ १९२४६

२०१८-१९ १९९५४

२०१९-२० २०८६८

२०२०-२१ १७१२८

....................................................................