शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

७ जनावरांचा मृत्यू: वीज पडून एक शेतकरीही ठार; शेतीचे कोटीत नुकसान

By नितीन काळेल | Updated: April 19, 2023 19:45 IST

वळवाने २१ कुटुंबांना केले बेघर..

सातारा : जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सतत जोरदार वाऱ्यासह वळवाचा पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेती पिके आणि फळबागांचे कोटीत नुकसान झाले. गेल्या १० दिवसांत तर जिल्ह्यातील २१ कुटुंबांना वळवाने बेघर केले. तसेच ७ जनावरांचा मृत्यू झाला असून वीज पडून एक शेतकरीही ठार झाला आहे.

जिल्ह्यात दरवर्षीच जानेवारी महिन्यानंतर अवकाळी आणि वळवाचा पाऊस पडतो. यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर अवकाळी पाऊस पडला. याचा फटका तीन तालुक्यातील शेतीला फटका बसला. यामध्ये ८५ लाख ७३ हजार रुपयांचे पीक आणि बागांचे नुकसान झालेले. यातून बळीराजा सावरत असतानाच एप्रिल महिन्यात वळवाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मागील ११ दिवसांत तर ८ वेळा जोरदार वाऱ्यासह वळीव जिल्ह्यात कोठे ना कोठे बरसला आहे. त्यातच गारपीट होत आहे. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होत आहे. तर वाऱ्यामुळे घरे, शाळांवरील पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या. तसेच वीज पडूनही नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात ८ एप्रिलपासून आतापर्यंत वळवाच्या पावसाने २१ घरांची पडझड झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील सर्वाधिक १० घरांचा समावेश आहे. तर वाई तालुक्यात ७, फलटण आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी दोन घरे बाधित झाली आहेत. त्याचबरोबर लहान ३ आणि मोठ्या चार जनावरांचा मृत्यू झालाय. यातील ५ जनावरांचा खटाव तालुक्यात तर वाई आणि फलटण तालुक्यात प्रत्येकी एक पशुधन दगावले आहे. त्याचबरोबर जावळी तालुक्यात पावसामुळे ७ कोंबड्यांचाही मृत्यू झालाय. तर कोरेगाव तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.यावर्षी अवकाळीपेक्षा आताच्या वळवाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यामध्ये पिके, फळबागा आणि पशुधनाचाही समावेश आहे. आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदत लवकर द्यावी, अशी मागणी केली आहे.

वळवात फळबागांचेच अधिक नुकसान...जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस होऊन दीड हजार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. यामध्ये रब्बी हंगामातील पिकांचा समावेश अधिक होता. कारण, त्याचवेळी शेतकऱ्यांची पीक काढणी आणि मळणी सुरु होती. त्यामुळे बाधित शेतकरी अधिक आणि नुकसान कमी राहिले. पण, आता वळवात पिकांपेक्षा फळबागांचे नुकसान अधिक झाले आहे. फळबागांचे नुकसान अधिक राहते. तसेच शासनाकडून मदतही पिकांपेक्षा जादा मिळत असते.

टॅग्स :satara-acसाताराFarmerशेतकरी