शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

७ जनावरांचा मृत्यू: वीज पडून एक शेतकरीही ठार; शेतीचे कोटीत नुकसान

By नितीन काळेल | Updated: April 19, 2023 19:45 IST

वळवाने २१ कुटुंबांना केले बेघर..

सातारा : जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सतत जोरदार वाऱ्यासह वळवाचा पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेती पिके आणि फळबागांचे कोटीत नुकसान झाले. गेल्या १० दिवसांत तर जिल्ह्यातील २१ कुटुंबांना वळवाने बेघर केले. तसेच ७ जनावरांचा मृत्यू झाला असून वीज पडून एक शेतकरीही ठार झाला आहे.

जिल्ह्यात दरवर्षीच जानेवारी महिन्यानंतर अवकाळी आणि वळवाचा पाऊस पडतो. यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर अवकाळी पाऊस पडला. याचा फटका तीन तालुक्यातील शेतीला फटका बसला. यामध्ये ८५ लाख ७३ हजार रुपयांचे पीक आणि बागांचे नुकसान झालेले. यातून बळीराजा सावरत असतानाच एप्रिल महिन्यात वळवाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मागील ११ दिवसांत तर ८ वेळा जोरदार वाऱ्यासह वळीव जिल्ह्यात कोठे ना कोठे बरसला आहे. त्यातच गारपीट होत आहे. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होत आहे. तर वाऱ्यामुळे घरे, शाळांवरील पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या. तसेच वीज पडूनही नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात ८ एप्रिलपासून आतापर्यंत वळवाच्या पावसाने २१ घरांची पडझड झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील सर्वाधिक १० घरांचा समावेश आहे. तर वाई तालुक्यात ७, फलटण आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी दोन घरे बाधित झाली आहेत. त्याचबरोबर लहान ३ आणि मोठ्या चार जनावरांचा मृत्यू झालाय. यातील ५ जनावरांचा खटाव तालुक्यात तर वाई आणि फलटण तालुक्यात प्रत्येकी एक पशुधन दगावले आहे. त्याचबरोबर जावळी तालुक्यात पावसामुळे ७ कोंबड्यांचाही मृत्यू झालाय. तर कोरेगाव तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.यावर्षी अवकाळीपेक्षा आताच्या वळवाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यामध्ये पिके, फळबागा आणि पशुधनाचाही समावेश आहे. आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदत लवकर द्यावी, अशी मागणी केली आहे.

वळवात फळबागांचेच अधिक नुकसान...जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस होऊन दीड हजार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. यामध्ये रब्बी हंगामातील पिकांचा समावेश अधिक होता. कारण, त्याचवेळी शेतकऱ्यांची पीक काढणी आणि मळणी सुरु होती. त्यामुळे बाधित शेतकरी अधिक आणि नुकसान कमी राहिले. पण, आता वळवात पिकांपेक्षा फळबागांचे नुकसान अधिक झाले आहे. फळबागांचे नुकसान अधिक राहते. तसेच शासनाकडून मदतही पिकांपेक्षा जादा मिळत असते.

टॅग्स :satara-acसाताराFarmerशेतकरी