शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या ६१ तक्रारी, कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 14:24 IST

राज्यात सोयाबीन बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातही ६१ तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. यामधील सर्वच शेतकऱ्यांच्या बांधावर तक्रार निवारण समितीने जाऊन पाहणी केली. यामधील १० शेतकऱ्यांना संबंधित दुकानदारांकडून बदलून बियाणे देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या ६१ तक्रारी, कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक १० जणांना बियाणे दिले बदलून; ५१ तक्रारधारकांना पैसे मिळण्याची शक्यता

सातारा : राज्यात सोयाबीन बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातही ६१ तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. यामधील सर्वच शेतकऱ्यांच्या बांधावर तक्रार निवारण समितीने जाऊन पाहणी केली. यामधील १० शेतकऱ्यांना संबंधित दुकानदारांकडून बदलून बियाणे देण्यात आले. उर्वरित ५१ तक्रारधारकांना पैसे मिळण्याची शक्यता असून, यात सर्वाधिक तक्रारी कऱ्हाड तालुक्यातील आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामातील क्षेत्र ३ लाख हेक्टरहून अधिक आहे. सोयाबीन, भात, बाजरी आणि ज्वारी ही पिके या हंगामात मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. तर खरिपात सोयाबीनचे क्षेत्र ५० हजार हेक्टरच्या आसपास आहे. बहुतांशी शेतकरी या खरीप हंगामावरच अवलंबून असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने हा हंगाम महत्त्वाचा ठरतो. खरिपात शेतकऱ्यांची बियाणे आणि खताबाबत फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. या अंतर्गत कृषी दुकानांची तपासणी करून कारवाईही करण्यात आली आहे.मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली होती. सोयाबीनचीही पेरणी सुरू आहे. पण, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या. आतापर्यंत ६१ तक्रारी आल्या असून, यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील सर्वाधिक ३३आहेत. साताऱ्यांतील १७ आहेत. तर वाई तालुक्यातून १० तक्रारी आल्या.

सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार येताच कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून माहिती घेतली. त्यातील १० जणांना बियाणे बदलून देण्यात आले आहेत. पूर्वी घेतलेल्या दुकानातूनच हे बियाणे कृषी विभागाने मिळवून दिले.

५१ तक्रारीबाबत सबंधित कंपनी कार्यालयाला प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना पैसे मिळतील. तर चार ठिकाणच्या केसेस कोर्टात सादर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.खोलीवर बियाणे...उन्हाळा झाल्यानंतर यावर्षी लवकर पाऊस झाला. शेतकऱ्यांनी आणखी पावसाची वाट न पाहता सोयाबीनची पेरणी केली. असे असलेतरी उष्णतेत सोयाबीन उगवत नाही. त्यामुळे उगवण नसल्याच्या तक्रारी सुरुवातीला आल्या. तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने पेरणी केलेल्या ठिकाणचे बियाणे खोलवर गेले. तेथील बियाणे उगवणीला मार बसला. पण, बैलांच्या साह्याने पेरणी झालेल्या ठिकाणी सोयाबीन उगवण चांगली झाल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत समोर आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर