शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी दुपारपर्यंत ५० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 14:53 IST

सातारा जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी दुपारपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. चुरशीने मतदान होत असल्याने सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांच्यावर जाईल, असे संकेत मिळत आहेत. तसेच मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देमतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार नसल्याची माहिती सातारा जिल्ह्यात २५६ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांच्यावर जाईल, असे संकेत संवेदनशील ग्रामपंचायतींच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

सातारा : जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी दुपारपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. चुरशीने मतदान होत असल्याने सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांच्यावर जाईल, असे संकेत मिळत आहेत. तसेच मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती देण्यात आली.

जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यामधील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर काही ठिकाणी एखाद्या-दुसऱ्या जागेसाठी निवडणूक होत आहे. तसेच आज २५६ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे.

सकाळपासून मतदानाला प्रारंभ झाला होता. अनेक ठिकाणी चुरशीने मतदान सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

सकाळी साडेअकरापर्यंत जिल्ह्यात ४०.४८ टक्के इतके मतदान झाले होते. तर दोन वाजेपर्यंत ५० टक्क्यांच्यावर मतदानाचा आकडा गेला होता. संवेदनशील असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच