शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी दुपारपर्यंत ५० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 14:53 IST

सातारा जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी दुपारपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. चुरशीने मतदान होत असल्याने सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांच्यावर जाईल, असे संकेत मिळत आहेत. तसेच मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देमतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार नसल्याची माहिती सातारा जिल्ह्यात २५६ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांच्यावर जाईल, असे संकेत संवेदनशील ग्रामपंचायतींच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

सातारा : जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी दुपारपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. चुरशीने मतदान होत असल्याने सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांच्यावर जाईल, असे संकेत मिळत आहेत. तसेच मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती देण्यात आली.

जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यामधील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर काही ठिकाणी एखाद्या-दुसऱ्या जागेसाठी निवडणूक होत आहे. तसेच आज २५६ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे.

सकाळपासून मतदानाला प्रारंभ झाला होता. अनेक ठिकाणी चुरशीने मतदान सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

सकाळी साडेअकरापर्यंत जिल्ह्यात ४०.४८ टक्के इतके मतदान झाले होते. तर दोन वाजेपर्यंत ५० टक्क्यांच्यावर मतदानाचा आकडा गेला होता. संवेदनशील असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच