शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

शेखर गोरेंसह ५ जणांना मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:32 IST

सातारा : माण तालुक्यातील गिरिराज रिन्यूएबल्स या सौरऊर्जा कंपनीचे नुकसान करून खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोरे यांच्यासह पाचजणांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माण तालुक्यातील वरकुटे मलवडी आणि शिरताव हद्दीत गिरिराज रिन्यूएबल्स या सौरऊर्जा कंपनीचे काम सुरू ...

सातारा : माण तालुक्यातील गिरिराज रिन्यूएबल्स या सौरऊर्जा कंपनीचे नुकसान करून खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोरे यांच्यासह पाचजणांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माण तालुक्यातील वरकुटे मलवडी आणि शिरताव हद्दीत गिरिराज रिन्यूएबल्स या सौरऊर्जा कंपनीचे काम सुरू आहे. आॅक्टोबर महिन्यात काहीजणांनी कार आणि जेसीबी नेऊन ‘तुम्ही तालुक्यात काम कसे करता,’ असे म्हणत तेथील इन्व्हर्टर रूम, सिमेंट काँक्रीट केलेल्या कॉलमचे जेसीबीच्या साह्याने नुकसान केले. तसेच कंपनीकडून खंडणी म्हणून काही रक्कम मागण्यात येऊन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात खंडणी मागणे, कंपनीचे नुकसान केल्यामुळे विशाल दिलीप पट्टेबहादूर (वय २७, मूळ रा. नाशिक, सध्या रा. दहिवडी) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे शेखर भगवान गोरे (रा. बोराटवाडी, ता. माण), नगरसेवक संग्राम अनिल शेटे (वय २३, रा. म्हसवड, ता. माण), विलास बाबूराव पाटोळे (३६) सतीश आनंदा धडांबे (३६) व सागर शंकर जाधव (३०, तिघेही रा. महिमानगड, ता. माण) यांच्यासह इतर १५ जणांवर गुन्हा दाखल झाला होता.गोरेंचा जामीन फेटाळला होतागिरिराज रिन्यूएबल कंपनीचे बांधकाम उकरून टाकून खंडणी मागितल्याप्रकरणात शेखर गोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज वडूज न्यायालयाने फेटाळून लावला होता.गेल्या आठवड्यात वडूज न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली होती. त्यावेळी सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने गोरे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला होता.१ टोळीच्या माध्यमातून खंडणीसाठी दहशत निर्माण करून आर्थिकफायदा करून घेणाºयांना आळा बसण्यासाठी अशा गुन्हेगारांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याची सूचना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकाºयांना केली होती.२ म्हसवड पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता. म्हसवडचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी यावर लक्ष ठेवले होते.३ त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठविला होता. पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा