शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

निरा खोऱ्यातील धरणात ४८ टीएमसी पाणीसाठा .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 15:47 IST

dam, rain, sataranews निरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा या वर्षी वाढला आहे . ऑक्टोबर अखेर असताना नीरा खोऱ्यातील चारही धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे . त्यामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो झालेले आहेत . नीरा खोऱ्यातील चार धरणात सुमारे ४८ टीएमसी पाणीसाठा झाल्याने साहजिकच यापुढील काळात शेती सिंचनात कोणतीही अडचण राहणार नाही . त्यामुळे शेतकरी वर्गासाठी समाधानाची बाब आहे .

ठळक मुद्देनिरा खोऱ्यातील धरणात ४८ टीएमसी पाणीसाठा ..... सरासरीपेक्षा जास्त पाऊस , यावर्षी शेतीसिंचनाच्या अडचणी होणार दूर

खंडाळा : निरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा या वर्षी वाढला आहे . ऑक्टोबर अखेर असताना नीरा खोऱ्यातील चारही धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे . त्यामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो झालेले आहेत . नीरा खोऱ्यातील चार धरणात सुमारे ४८ टीएमसी पाणीसाठा झाल्याने साहजिकच यापुढील काळात शेती सिंचनात कोणतीही अडचण राहणार नाही . त्यामुळे शेतकरी वर्गासाठी समाधानाची बाब आहे .नीरा खोर्‍यातील नीरा देवधर, भाटघर , वीर व गुंजवणी या चारही धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत शंभर टक्के आहे . यावर्षी नीरा खोर्‍यातील नीरा देवधर ११ .७२९ टीएमसी , भाटघर २३ .५०२ टीएमसी ,वीर धरणात ९ .४०८ टीएमसी व गुंजवणी धरणात ३ .६९० टीएमसी एवढा पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरला आहे. चारही धरणात मिळून एकूण ४८ .३२९ टीएमसी एवढा मुबलक पाणीसाठा झाला आहे .नीरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा भरमसाठ झाल्याने पुढील काळात शेतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे . नीरा खोऱ्यातील धरणाच्या पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील खंडाळा , फलटण तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तसेच पुणे जिल्हयातील पुरंदर , बारामती ते इंदापूरपर्यंत होत असतो .

येथील शेती याच पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पाणीसाठा मुबलक असल्याने धरणांच्या कालव्याला आवर्तने वेळेवर सोडणे शक्य होणार आहे . त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न उरणार नाही .

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर