शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

निरा खोऱ्यातील धरणात ४८ टीएमसी पाणीसाठा .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 15:47 IST

dam, rain, sataranews निरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा या वर्षी वाढला आहे . ऑक्टोबर अखेर असताना नीरा खोऱ्यातील चारही धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे . त्यामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो झालेले आहेत . नीरा खोऱ्यातील चार धरणात सुमारे ४८ टीएमसी पाणीसाठा झाल्याने साहजिकच यापुढील काळात शेती सिंचनात कोणतीही अडचण राहणार नाही . त्यामुळे शेतकरी वर्गासाठी समाधानाची बाब आहे .

ठळक मुद्देनिरा खोऱ्यातील धरणात ४८ टीएमसी पाणीसाठा ..... सरासरीपेक्षा जास्त पाऊस , यावर्षी शेतीसिंचनाच्या अडचणी होणार दूर

खंडाळा : निरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा या वर्षी वाढला आहे . ऑक्टोबर अखेर असताना नीरा खोऱ्यातील चारही धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे . त्यामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो झालेले आहेत . नीरा खोऱ्यातील चार धरणात सुमारे ४८ टीएमसी पाणीसाठा झाल्याने साहजिकच यापुढील काळात शेती सिंचनात कोणतीही अडचण राहणार नाही . त्यामुळे शेतकरी वर्गासाठी समाधानाची बाब आहे .नीरा खोर्‍यातील नीरा देवधर, भाटघर , वीर व गुंजवणी या चारही धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत शंभर टक्के आहे . यावर्षी नीरा खोर्‍यातील नीरा देवधर ११ .७२९ टीएमसी , भाटघर २३ .५०२ टीएमसी ,वीर धरणात ९ .४०८ टीएमसी व गुंजवणी धरणात ३ .६९० टीएमसी एवढा पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरला आहे. चारही धरणात मिळून एकूण ४८ .३२९ टीएमसी एवढा मुबलक पाणीसाठा झाला आहे .नीरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा भरमसाठ झाल्याने पुढील काळात शेतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे . नीरा खोऱ्यातील धरणाच्या पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील खंडाळा , फलटण तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तसेच पुणे जिल्हयातील पुरंदर , बारामती ते इंदापूरपर्यंत होत असतो .

येथील शेती याच पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पाणीसाठा मुबलक असल्याने धरणांच्या कालव्याला आवर्तने वेळेवर सोडणे शक्य होणार आहे . त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न उरणार नाही .

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर