शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

सातारा जिल्ह्यातील १६० गावांना टँकरच्या ४२५ खेपा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:23 IST

सातारा : जिल्ह्यात टंचाईची स्थिती अधिक गडद होत असताना सध्या १६० गावे आणि ७२३ वाड्यांसाठी १९१ टँकर सुरू आहेत. ...

सातारा : जिल्ह्यात टंचाईची स्थिती अधिक गडद होत असताना सध्या १६० गावे आणि ७२३ वाड्यांसाठी १९१ टँकर सुरू आहेत. त्या माध्यमातून ४२५ खेपा पुरवाव्या लागत आहेत, तर तीन लाख नागरिकांना टँकरचा आधार असून, माणमधील सर्वाधिक ६७ गावे अन् ५२८ वाड्या या टंचाईच्या तडाख्यात सापडल्या आहेत.माण तालुक्यातील मध्यम व लघु पाटबंधारेचे दहापैकी सहा तलाव पूर्णत: कोरडे पडले आहेत. सहा तलावांपैकी चारमध्ये मृतसाठा असल्याने तालुक्यातील जनतेला भीषण पाणीटंचाई भासत आहे. ९५ टँकरने १९७ टँकरच्या खेपाने ६७ गावे व ५२८ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे, तर तालुक्यातील ४७ विहिरींचे अधिग्रहण करून पुरवठा सुरू असला तरी अनेक वाड्या-वस्त्यांवर टँकरच्या नियमानुसार फेऱ्या होत नसल्याने अनेकवेळा ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.खटाव तालुक्यात शासनाने १४३ गावांपैकी १२७ गावांमध्ये टंचाई घोषित करून सर्व सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने ३९ गावांमध्ये ९५ खेपांद्वारे टँकर सुरू करून काही प्रमाणात ग्रामस्थांची तृष्णा भागविण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यात २०६ स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असून, ७८ लघू नळ पाणीपुरवठा योजना, १,५५९ विंधन विहिरी, हातपंप, ८९ विद्युतपंप व ७१ साध्या विहिरींवरून पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना व साधने उपलब्ध आहेत.कºहाड तालुक्यात लघुपाटबंधारे विभागाच्या लेखी ६१ पाझर तलाव आहेत. यामधील ४४ पाझर तलाव आटले आहेत. ४४ तलाव फेबु्रवारीच्या मध्यावरच कोरडे पडले असून, उर्वरित १७ तलावांत केवळ ५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.जावळी तालुक्यात यंदाही भीषण पाणीटंचाई सुरू आहे. मेढा-केळघर रस्त्यावरील व डोंगराळ भागात पाणीटंचाई सुरू आहे. तालुक्यातील ५६ गावांमध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. सुमारे २० गावांचे टंचाई प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले आहेत. यापैकी फक्त चार गावांमध्ये टँकर सुरू केले आहेत. जावळीतील चाकरमानी दरवर्षी उन्हाळ्यात सुटीवर गावी येतात; मात्र यावर्षी गावी पाणीच नसल्याने चाकरमान्यांनी गावाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी बाजारपेठेवर परिणाम जाणवत आहे.कोरेगाव तालुक्यात १३८ पैकी ८६ गावे प्रशासनाने टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. आॅगस्ट २०१८ पासून प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सध्या २८ गावांना ३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.माण तालुक्याची तहान भागवतोय ढाकणी तलाव..उरमोडीचे पाणी माण तालुक्यातील पिंगळी व ढाकणी तलावांमध्ये सोडल्याने काहीअंशी दुष्काळग्रस्तांची थोडी का होईना तहान भागू शकते. उरमोडीच्या पाण्याने गोंदवले खुर्द, लोधवडे, चव्हाणमामा व मणकर्णवाडीचा केटी वेअर भरण्यात आला आहे. सध्या तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून, संपूर्ण तालुक्याची तहान एकमेव ढाकणी तलावातून भागवली जात आहे. तालुक्यातील एकमेव असणाºया फिडिंग पॉर्इंटवर अनेक टँकर भरण्यासाठी उभे असतात.