शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

वीज कोसळून सातारा जिल्ह्यात वर्षभरात 'इतक्या' जणांचा गेला जीव, संरक्षणासाठी 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:55 IST

शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात वीज कोसळून गेल्या वर्षभरात चार जणांचा मृत्यू झाला. याशिवाय ६ जनावरे मृत्युमुखी पडली. वळीव, मान्सून पूर्व, तसेच परतीच्या पावसाच्या वेळी विजांचा कडकडाट होतो. मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी आडोशाला थांबलेले असतात. मात्र, वीज कोसळून दुर्घटना होण्याचा धोका असतो. दरवर्षी वीज कोसळून दुर्घटना घडत असतात. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.वीज पडून जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यूजिल्ह्यात गेल्या वर्षभरात वीज कोसळून चार जणांचा बळी गेला आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख अशी सोळा लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. शासनाने मदत दिली असली, तरी घरचा कर्ता पुरुष कुटुंबाने गमावला आहे. यामुळे विजा कोसळत असताना सुरक्षित ठिकाणी घरी अथवा इमारतीत थांबावे.सहा जनावरे दगावलीवर्षभरात वीज कोसळल्याने ६ जनावरे दगावली आहेत. अनेकदा शेतकरी गुरांना झाडाला बांधत असतात. वीज झाडावर कोसळण्याची शक्यता असते. यामुळे शेतकऱ्यांनी गुरांना इतर सुरक्षित ठिकाणी बांधावे.चार जणांच्या वारसांना मिळाले प्रत्येकी चार लाखगतवर्षात जिल्ह्यात चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख मदत शासनाकडून मिळाली आहे.किती मिळते मदत?

  • मृत व्यक्तीच्या चार वारसांना लाख
  • मृत जनावरे गाई, म्हशी मालकांना ३० हजार
  • वासरू असेल, तर १५ हजार रुपये.

विजेपासून संरक्षण करण्यासाठी ही घ्यावी काळजी

  • कोणत्याही परिस्थिती झाडाखाली आश्रय नको
  • पाण्यात असाल तर त्वरित बाहेर यावे
  • विद्युत उपकरणाचा वापर टाळावा
  • वीज खांबाजवळ उभे राहू नका.
  • गुरांना झाडाला न बांधता इतर सुरक्षित ठिकाणी बांधा.

अनेकदा झाडावर विजा कोसळतात. पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी झाडाखालीच थांबतात. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये, तसेच पाण्यात असाल, तर विजा चमकत असताना त्वरित पाण्याबाहेर यावे. - देवीदास ताम्हाणे, उपजिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर