शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

वीज कोसळून सातारा जिल्ह्यात वर्षभरात 'इतक्या' जणांचा गेला जीव, संरक्षणासाठी 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:55 IST

शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात वीज कोसळून गेल्या वर्षभरात चार जणांचा मृत्यू झाला. याशिवाय ६ जनावरे मृत्युमुखी पडली. वळीव, मान्सून पूर्व, तसेच परतीच्या पावसाच्या वेळी विजांचा कडकडाट होतो. मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी आडोशाला थांबलेले असतात. मात्र, वीज कोसळून दुर्घटना होण्याचा धोका असतो. दरवर्षी वीज कोसळून दुर्घटना घडत असतात. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.वीज पडून जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यूजिल्ह्यात गेल्या वर्षभरात वीज कोसळून चार जणांचा बळी गेला आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख अशी सोळा लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. शासनाने मदत दिली असली, तरी घरचा कर्ता पुरुष कुटुंबाने गमावला आहे. यामुळे विजा कोसळत असताना सुरक्षित ठिकाणी घरी अथवा इमारतीत थांबावे.सहा जनावरे दगावलीवर्षभरात वीज कोसळल्याने ६ जनावरे दगावली आहेत. अनेकदा शेतकरी गुरांना झाडाला बांधत असतात. वीज झाडावर कोसळण्याची शक्यता असते. यामुळे शेतकऱ्यांनी गुरांना इतर सुरक्षित ठिकाणी बांधावे.चार जणांच्या वारसांना मिळाले प्रत्येकी चार लाखगतवर्षात जिल्ह्यात चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख मदत शासनाकडून मिळाली आहे.किती मिळते मदत?

  • मृत व्यक्तीच्या चार वारसांना लाख
  • मृत जनावरे गाई, म्हशी मालकांना ३० हजार
  • वासरू असेल, तर १५ हजार रुपये.

विजेपासून संरक्षण करण्यासाठी ही घ्यावी काळजी

  • कोणत्याही परिस्थिती झाडाखाली आश्रय नको
  • पाण्यात असाल तर त्वरित बाहेर यावे
  • विद्युत उपकरणाचा वापर टाळावा
  • वीज खांबाजवळ उभे राहू नका.
  • गुरांना झाडाला न बांधता इतर सुरक्षित ठिकाणी बांधा.

अनेकदा झाडावर विजा कोसळतात. पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी झाडाखालीच थांबतात. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये, तसेच पाण्यात असाल, तर विजा चमकत असताना त्वरित पाण्याबाहेर यावे. - देवीदास ताम्हाणे, उपजिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर