शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
4
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
5
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
6
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
7
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
8
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
9
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
10
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
11
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
12
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
13
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
14
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
15
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
16
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
18
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
19
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
20
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून सातारा जिल्ह्यात वर्षभरात 'इतक्या' जणांचा गेला जीव, संरक्षणासाठी 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:55 IST

शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात वीज कोसळून गेल्या वर्षभरात चार जणांचा मृत्यू झाला. याशिवाय ६ जनावरे मृत्युमुखी पडली. वळीव, मान्सून पूर्व, तसेच परतीच्या पावसाच्या वेळी विजांचा कडकडाट होतो. मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी आडोशाला थांबलेले असतात. मात्र, वीज कोसळून दुर्घटना होण्याचा धोका असतो. दरवर्षी वीज कोसळून दुर्घटना घडत असतात. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.वीज पडून जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यूजिल्ह्यात गेल्या वर्षभरात वीज कोसळून चार जणांचा बळी गेला आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख अशी सोळा लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. शासनाने मदत दिली असली, तरी घरचा कर्ता पुरुष कुटुंबाने गमावला आहे. यामुळे विजा कोसळत असताना सुरक्षित ठिकाणी घरी अथवा इमारतीत थांबावे.सहा जनावरे दगावलीवर्षभरात वीज कोसळल्याने ६ जनावरे दगावली आहेत. अनेकदा शेतकरी गुरांना झाडाला बांधत असतात. वीज झाडावर कोसळण्याची शक्यता असते. यामुळे शेतकऱ्यांनी गुरांना इतर सुरक्षित ठिकाणी बांधावे.चार जणांच्या वारसांना मिळाले प्रत्येकी चार लाखगतवर्षात जिल्ह्यात चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख मदत शासनाकडून मिळाली आहे.किती मिळते मदत?

  • मृत व्यक्तीच्या चार वारसांना लाख
  • मृत जनावरे गाई, म्हशी मालकांना ३० हजार
  • वासरू असेल, तर १५ हजार रुपये.

विजेपासून संरक्षण करण्यासाठी ही घ्यावी काळजी

  • कोणत्याही परिस्थिती झाडाखाली आश्रय नको
  • पाण्यात असाल तर त्वरित बाहेर यावे
  • विद्युत उपकरणाचा वापर टाळावा
  • वीज खांबाजवळ उभे राहू नका.
  • गुरांना झाडाला न बांधता इतर सुरक्षित ठिकाणी बांधा.

अनेकदा झाडावर विजा कोसळतात. पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी झाडाखालीच थांबतात. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये, तसेच पाण्यात असाल, तर विजा चमकत असताना त्वरित पाण्याबाहेर यावे. - देवीदास ताम्हाणे, उपजिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर