शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
5
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
6
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
7
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
8
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
10
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
11
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
12
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
13
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
14
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
15
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
16
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
17
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
18
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
19
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
20
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

महाबळेश्वरात पर्यटकांना मिळणार ३५ रुपयांची सूट

By admin | Updated: September 16, 2016 23:45 IST

टोलनाक्यांचे एकत्रीकरण : वनव्यवस्थापन समिती आकारणार एकाच ठिकाणी १५ रुपये शुल्क

सातारा : ‘क्षेत्र महाबळेश्वर, अवकाळी, भेकवली, प्रतापगड व गुरेघर या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रतिव्यक्ती १० रुपये असे ५० रुपये शुल्क आकारणी होत होती. आता ही शुल्क आकारणी एकाच ठिकाणी करण्यात येणार असून, प्रतिव्यक्ती १५ रुपये अशी एकाच ठिकाणी शुल्क आकारणी होणार असल्याने पर्यटकांना ३५ रुपयांची सूट मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या वेळेचीही बचत होणार आहे,’ अशी माहिती उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली आहे.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक एल. डी. कुलकर्णी, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, महाबळेश्वर नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी आशा राऊत आदी उपस्थित होते.शासन निर्णयानुसार महाबळेश्वर वनक्षेत्रात क्षेत्र महाबळेश्वर, अवकाळी, भेकवली, प्रतापगड व गुरेघर या ठिकाणी संयुक्त व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीकडून महाबळेश्वर परिसरात व संबंधित वनहद्दीत असलेल्या दृष्य स्थानकांचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापनाचे काम करण्यात येत आहे.शासन निर्णयाच्या अनुषंगाने संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत या पाच ठिकाणी १० रुपये प्रतव्यक्ती या प्रमाणे उपद्रव शुल्क, स्वच्छता उपकर आकारण्यात आलेला आहे. परंतु महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना पाच ठिकाणी टोल देण्यासाठी थांबावे लागत होते. तसेच गिरिस्थान नगरपरिषद, महाबळेश्वर यांच्याकडूनही चार ठिकाणांवर प्रवासी करही व प्रदूषण कर वसूल करण्याकरिता जागोजागी शुल्क नाके उभारण्यात आले आहेत.या शुल्क नाक्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांचा महत्त्वाचा वेळ वाया जात होता. त्यामुळे एकाच ठिकाणी संयुक्त शुल्क नाके उभारून प्रवेश शुल्क वसूल करण्याबाबत पर्यटकांकडून वेळोवेळी सूचना प्राप्त झालेल्या होत्या. (प्रतिनिधी)वेळेची होणार बचत; आर्थिक नुकसानही टळणार‘संयुक्त वन व्यवस्थापन समित्यावरील पाच ठिकाणी १० रुपये प्रतिव्यक्ती असे पाच ठिकाणांचे ५० रुपये याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारत होते. शुल्क एकत्रीकरणानंतर महाबळेश्वरमधील वन हद्दीतील सर्व पॉइंट तसेच गुरेघर येथील त्रिवेणी पॉइंट व प्रतापगड या सर्व पॉइंटसाठी एकत्रितरीत्या १५ रुपये प्रतिव्यक्ती असे प्रवेश शुल्क एकाच ठिकाणी जमा केले जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा वेळ वाचून त्यांना पर्यटनासाठी जास्त वेळ देता येईल. तसेच आर्थिकदृष्ट्याही पर्यटकांचा फायदा होईल,’ असेही अंजनकर यांनी सांगितले.