शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ३२ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्यातील कोरोनाच्या हाहाकाराचे राैद्ररूप समोर आले असून एप्रिल महिन्यामध्ये रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तब्बल ३२ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची ...

सातारा : जिल्ह्यातील कोरोनाच्या हाहाकाराचे राैद्ररूप समोर आले असून एप्रिल महिन्यामध्ये रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तब्बल ३२ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केले असून वर्षभरात सर्वाधिक जीवितहानी एप्रिल महिन्यामध्ये झाली आहे. कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाऱ्याच्या वेगासारखी वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांसाठी बेड शिल्लक उरले नाहीत. त्याचबरोबर ऑक्सिजनचे बेडही रुग्णांना मिळेनासे झाले. जो तो रुग्णालयात आपल्या नातेवाईकांसाठी बेड मिळेल का, या विवंचनेत होता. जिल्ह्यातील रुग्णालयांची अशी गंभीर परिस्थिती असल्यामुळे अनेकजण घरामध्येच तात्पुरते उपचार घेत होते. मात्र, यातून बरेच रुग्ण सहीसलामत बाहेर पडले. परंतु काही जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ३२ रुग्णांची ब्राँड डेड म्हणून नोंद करण्यात आली आहे.

अनेकजण अंगावर आजार काढत आहेत. अचानक प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात धाव घेत आहेत. मात्र, तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. रुग्णालयात आणल्यानंतर संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर घोषित करतात. एप्रिल महिन्यामध्ये जे ३२ रुग्ण दगावले त्यांच्यावर उपचार करण्याची संधीही डॉक्टरांना मिळाली नाही. यातील काही जणांचा ऑक्सिजन अभावीही मृत्यू झाला असू शकतो. मात्र, तशी रुग्णालयात नोंद नाही.

जिल्ह्यात गतवर्षी ज्यावेळी कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यावेळी सुद्धा अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये त्यावेळी १३ रुग्णांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. परंतु यंदाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. केवळ एप्रिल महिन्यामध्ये ३२ रुग्णांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या रोखण्यासाठी प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. मात्र, अद्यापही अनेक लोकांनी पहिला डोस घेतला नाही, असे अनेक लोक आहेत. त्यामुळे अत्यंत वेगाने लसीकरण झाले तर हा ब्राँड डेडचा आकडाही कमी होऊ शकतो, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

चौकट: जिल्ह्यात ६२४ जणांचा मृत्यू

कोरोनाची महामारी एप्रिल महिन्यात बळावली गेली. अनेक लोक बाधित आढळून आले तर अनेकांचा बळी गेला. केवळ एप्रिल महिन्यामध्ये तब्बल ६२४ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. इतकी भयानक अवस्था एप्रिल महिन्यात झाली आहे.

कोट

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढलेला असून नागरिकांनी थोडी जरी लक्षणे आढळली तर डॉक्टरांकडे जाऊन चाचणी करावी. आजार अंगावर काढू नये. अनेकजण जुने पारंपरिक औषधोपचार घेत आहेत. अशावेळी मग रुग्ण गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात येतो. त्यावेळी मग डॉक्टरांचाही नाईलाज होतो. त्यामुळे नागरिकांनी अंगावर आजार न काढता तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे.

डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा