शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतून उद्या ३० हजार क्यूसेकने विसर्ग होणार

By नितीन काळेल | Updated: September 13, 2022 19:22 IST

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास धरणात १०२ टीएमसी साठा झालेला. त्यातच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून आणि दरवाजे दीड फुटांनी उचलून विसर्ग करण्यात येत आहे. तरीही धरणात आवक वाढत असल्याने बुधवारी सकाळी धरणाचे सहा दरवाजे साडे तीन फुटापर्यंत वर उचलण्यात येणार आहेत. त्यामुळे ३० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होणार आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरु असून आज, सकाळपर्यंत कोयनेला ११६, नवजा १४२ आणि महाबळेश्वरला १२२ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणक्षेत्रात पाऊस असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे यंदा दुसऱ्यांदा उघडून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.  दोन दिवसांत पावसाचा जोर वाढला असून पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा आणि महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडू लागला आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा येथे १४२ मिलीमीटर झाला. तर कोयना धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे.सकाळच्या सुमारास धरणात १०१.५७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात येणाºया पाण्याची आवक साडे आठ हजार क्यूसेकवर गेली होती. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारच्या सुमारास सहा दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले. त्यातून १२८९१ कुसेक तर पायथा वीजगृहातील १०५० असा एकूण १३९४१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणRainपाऊस