शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

जिल्ह्यात २९ गावे अन् ४५ वाड्या तहानल्या, पावसाळ्यातही टंचाई वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 15:05 IST

गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली असलीतरीही सध्या पावसाळ्याच्या काळात २९ गावे अन् ४५ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी २५ टँकर फिरत आहेत. यामध्ये माणमध्ये गावे आणि वाड्यांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्दे२९ गावे अन् ४५ वाड्या तहानल्या, पावसाळ्यातही टंचाई वाढली २५ हजार लोकांना २५ टँकरने पाणीपुरवठा

सातारा : गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली असलीतरीही सध्या पावसाळ्याच्या काळात २९ गावे अन् ४५ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी २५ टँकर फिरत आहेत. यामध्ये माणमध्ये गावे आणि वाड्यांची संख्या अधिक आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला. एकणूच पाच महिने पाऊस जिल्ह्यात होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव पूर्ण भरून वाहिले. दुष्काळी भागातही पावसामुळे दैना उडाली होती. त्यामुळे यावर्षी टंचाईला उशिरा सुरुवात झाली.

दरवर्षी जिल्ह्यात जानेवारीपासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असते. पण यावर्षी एप्रिलच्या मध्यापासून जिल्ह्यात टँकर झाले. सुरुवातीला खटाव तालुक्यात टँकर सुरू झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाटण, वाई आणि माण तालुक्यांत टँकर सुरू झाले. सध्या सर्वच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.माणमध्ये इतर तालुक्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या अधिक आहे. सध्या ४ गावे आणि १७ वाड्यांसाठी ३ टँकर सुरू आहेत. या टँकरवर ४ हजार ३०७ लोक अवलंबून आहेत. खटाव तालुक्यातील ३ गावे आणि ४ वाड्यांसाठी २ टँकर सुरू आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. सध्या या तालुक्यातील १ हजार ६७३ नागरिक आणि १ हजार ३५ पशुधन टँकरवर अवलंबून आहे.कोरेगाव तालुक्यातील ४ गावांनाही टंचाईची झळ बसत आहे. तसेच पशुधनासाठीही पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी २ टँकर सुरू आहेत. वाई तालुक्यातही ३ गावे व ३ वाड्यांसाठी २ टँकर सुरू आहेत. तसेच पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांतही टंचाई आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर