शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

जिल्ह्यात २९ गावे अन् ४५ वाड्या तहानल्या, पावसाळ्यातही टंचाई वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 15:05 IST

गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली असलीतरीही सध्या पावसाळ्याच्या काळात २९ गावे अन् ४५ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी २५ टँकर फिरत आहेत. यामध्ये माणमध्ये गावे आणि वाड्यांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्दे२९ गावे अन् ४५ वाड्या तहानल्या, पावसाळ्यातही टंचाई वाढली २५ हजार लोकांना २५ टँकरने पाणीपुरवठा

सातारा : गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली असलीतरीही सध्या पावसाळ्याच्या काळात २९ गावे अन् ४५ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी २५ टँकर फिरत आहेत. यामध्ये माणमध्ये गावे आणि वाड्यांची संख्या अधिक आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला. एकणूच पाच महिने पाऊस जिल्ह्यात होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव पूर्ण भरून वाहिले. दुष्काळी भागातही पावसामुळे दैना उडाली होती. त्यामुळे यावर्षी टंचाईला उशिरा सुरुवात झाली.

दरवर्षी जिल्ह्यात जानेवारीपासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असते. पण यावर्षी एप्रिलच्या मध्यापासून जिल्ह्यात टँकर झाले. सुरुवातीला खटाव तालुक्यात टँकर सुरू झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाटण, वाई आणि माण तालुक्यांत टँकर सुरू झाले. सध्या सर्वच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.माणमध्ये इतर तालुक्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या अधिक आहे. सध्या ४ गावे आणि १७ वाड्यांसाठी ३ टँकर सुरू आहेत. या टँकरवर ४ हजार ३०७ लोक अवलंबून आहेत. खटाव तालुक्यातील ३ गावे आणि ४ वाड्यांसाठी २ टँकर सुरू आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. सध्या या तालुक्यातील १ हजार ६७३ नागरिक आणि १ हजार ३५ पशुधन टँकरवर अवलंबून आहे.कोरेगाव तालुक्यातील ४ गावांनाही टंचाईची झळ बसत आहे. तसेच पशुधनासाठीही पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी २ टँकर सुरू आहेत. वाई तालुक्यातही ३ गावे व ३ वाड्यांसाठी २ टँकर सुरू आहेत. तसेच पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांतही टंचाई आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर