शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंत परिसरातून २५ पोती कचरा जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 11:08 IST

सह्याद्रीच्या कुशीत अन् अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंतीला ऐतिहासीक महत्त्व आहे. पण फिरायला येणाऱ्या काही तरुणांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या तसेच नागरिक खाद्यपदार्थांचे कागद टाकून विद्रूप झाला. येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवस परिसराची स्वच्छता करुन तब्बल २५ पोती कचरा जमा केला.

ठळक मुद्दे चार भिंती परिसरात दारूच्या बाटल्यांचाही खच ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाचा साताऱ्यात उपक्रम

सातारा : सह्याद्रीच्या कुशीत अन् अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंतीला ऐतिहासीक महत्त्व आहे. पण फिरायला येणाऱ्या काही तरुणांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या तसेच नागरिक खाद्यपदार्थांचे कागद टाकून विद्रूप झाला. येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवस परिसराची स्वच्छता करुन तब्बल २५ पोती कचरा जमा केला.ऐतिहासीक स्थळांची झालेली दयनिय अवस्था पाहावत नाही. तसेच त्याची निगा राखण्यासाठी पालिकेकडूनही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाने चार भिंत स्वच्छतेचा उपक्रम राबविला.मोहिमेच्या पहिल्या दिवशी सकाळी सात ते दहा या वेळेत पायथा, पार्किंगसह मुख्य प्रवेश कमानीपर्यंत स्वच्छता करण्यात आली. त्यात सुमारे चार पोती कचरा जमा केला. दुसऱ्या दिवशी मुख्य कमान ते भिंतीच्या मध्यापर्यंत स्वच्छता करण्यात आली.

सुमारे साडेतीन तास चाललेल्या मोहीमेत आठ पोती कचरा व दारूच्या बाटल्या जमा केल्या. तिसऱ्या दिवशी मध्यवर्ती भिंत ते मुख्य स्मारक संपूर्ण भागाची स्वच्छता केली. या मोहीमेत २५ पोती कचरा व दोन पोती दारूच्या बाटल्या जमा केल्या. दारू पिऊन फोडलेल्या बाटल्यांचा हिशोबच नव्हता....आता चारभिंती संवर्धनावर लक्षसलग तीन दिवसांच्या अथक परिश्रमाने चारभिंती चकाचक करण्यात मित्रमंडळाला यश आले आहे. आता संवर्धन करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. संवर्धनासाठी लवकरच शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती मित्रमंडळाचे सर्वेसर्वा शुभम मांडवेकर यांनी दिली.मोहीमेत सहभागी सदस्यया मोहीमेत शुभम मांडवेकर, उत्कर्ष शिंदे, रोहन शेलार, प्रज्योत वडेट्टीवार, शुभम आवळे, अमेय कुलकर्णी, ओमकार कदम, सुरज देशमुख, निलेश शिंगाडे, अक्षय ताटे, अभिजीत मुरकुटे, अक्षय शेलार, ओमकार शिंदे, ऋषीकेश गायकवाड, रोहित ताटपुजे, विशाल मोहिते, अनिकेत कर्णे, साहिल पटेल, शुभम निकम यांनी सहभाग घेतला.कचरा पेटींची नासधूस, मित्रमंडळातर्फे पुन्हा डागडुजी 

चारभिंतीवर येणारे नागरिक खाद्यपदार्थ घेऊन येतात. तेथे भेळ किंवा अन्य पदार्थ खाऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागदाचे गोळे टाकण्यासाठी पालिकेने कचराकुंडी ठेवलेली नाही. त्यामुळे मित्रमंडळातर्फे खोकी ठेवून कचरापेट्यांची व्यवस्था केली. पण काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यांची नासधूस केल्याचे दिसून आले. मित्रमंडळातर्फे त्यांची पुन्हा डागडुजी करण्यात आली.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर