शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जिल्ह्यातील २१ गावे अन् २८ वाड्या तहानल्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST

सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसेच जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठे टिकून राहत असल्याने यंदा मार्च महिन्याच्या ...

सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसेच जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठे टिकून राहत असल्याने यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात टँकर सुरू झाला. मात्र, सध्या टंचाई वाढू लागली असून, २१ गावे आणि २८ वाड्यांसाठी पाणीपुरवठा सुरू आहे, तर १८ हजार नागरिक आणि ५ हजारांवर पशुधन टँकरवर अवलंबून आहे.

जिल्ह्यात तीन-चार वर्षांतून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस होऊनही माण, खटावसारख्या तालुक्यांत डिसेंबर, जानेवारी महिना उजाडताच टँकर सुरू करावे लागायचे; पण गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. याला कारण म्हणजे जलसंधारणाची झालेली कामे. त्याचबरोबर वॉटर कप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचं तुफान आलेलं. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांत जलसंधारणाची मोठी कामे झाली आहेत. त्यामुळे पावसाचं पडलेलं पाणी अडून राहिलं व त्याचा फायदाही टंचाई निवारणासाठी झाला आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहणार असल्याचे समोर आले होते. याबाबत जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई आराखडा तयार केला होता. त्यानुसार ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील १६९ गावांना आणि २२६ वाड्यात टंचाई भासू शकते; पण यामधील १३८ गावांनाच टंचाईचा सामना करावा लागण्याचा अंदाज होता. त्यासाठी ४६ टँकर लागू शकतात, असे अनुमान होते. त्यासाठी जवळपास अडीच कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, उन्हाळा संपत आला तरी अजूनही मोठ्या प्रमाणात टँकर सुरू नाहीत. सध्या २१ गावे आणि २८ वाड्यांसाठीच टँकर सुरू आहेत. या टँकरवर १८१५३ नागरिक आणि ५४८९ पशुधन अवलंबून आहे, तर १७ टँकर सुरू आहेत. यामध्ये माण तालुक्यात टंचाईची स्थिती अधिक आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरू झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर तालुक्यांत टंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या. मात्र, यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत टँकर उशिरा सुरू झाला आहे. वाई तालुक्यात टँकर प्रथम सुरू झाला. आता सहा तालुक्यांत टँकर सुरू आहे. लवकरच आणखी काही गावांत टंचाई भासू शकते.

चौकट :

माणमध्ये ९ गावे अन् १६ वाड्यांसाठी टँकर...

माण तालुक्यात टंचाईग्रस्त गावे वाढू लागली आहेत. सध्या ९ गावे आणि १६ वाड्यांसाठी ५ टँकर सुरू आहेत. यावर ६८९४ नागरिक अवलंबून आहेत, तर वाई तालुक्यातील ३ गावे आणि ५ वाड्यांसाठी ३ टँकर सुरू आहेत. यावर ३६२६ नागरिक आणि १४८० पशुधन अवलंबून आहे. पाटण तालुक्यातील आंब्रूळकरवाडी (भोसगाव), चव्हाणवाडी, नाणेगाव येथे टँकर सुरू आहेत. येथे एका टँकरद्वारे १२१३ नागरिक व ४५७ पशुधनाला पाणीपुरवठा सुरू आहे. त्याचबरोबर कऱ्हाड तालुक्यात चार गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. वानरवाडी बामणवाडी, गोसावेवाडी, गायकवाडवाडीसाठी ३ टँकर सुरू आहेत. खटाव तालुक्यात २ गावे आणि एका वाडीसाठी एकच टँकर सुरू झालेला आहे. महाबळेश्वर तालुक्यातही २ गावांत टंचाई आहे.

...........................................................