शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

जिल्ह्यातील २१ गावे अन् २८ वाड्या तहानल्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST

सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसेच जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठे टिकून राहत असल्याने यंदा मार्च महिन्याच्या ...

सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसेच जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठे टिकून राहत असल्याने यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात टँकर सुरू झाला. मात्र, सध्या टंचाई वाढू लागली असून, २१ गावे आणि २८ वाड्यांसाठी पाणीपुरवठा सुरू आहे, तर १८ हजार नागरिक आणि ५ हजारांवर पशुधन टँकरवर अवलंबून आहे.

जिल्ह्यात तीन-चार वर्षांतून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस होऊनही माण, खटावसारख्या तालुक्यांत डिसेंबर, जानेवारी महिना उजाडताच टँकर सुरू करावे लागायचे; पण गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. याला कारण म्हणजे जलसंधारणाची झालेली कामे. त्याचबरोबर वॉटर कप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचं तुफान आलेलं. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांत जलसंधारणाची मोठी कामे झाली आहेत. त्यामुळे पावसाचं पडलेलं पाणी अडून राहिलं व त्याचा फायदाही टंचाई निवारणासाठी झाला आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहणार असल्याचे समोर आले होते. याबाबत जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई आराखडा तयार केला होता. त्यानुसार ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील १६९ गावांना आणि २२६ वाड्यात टंचाई भासू शकते; पण यामधील १३८ गावांनाच टंचाईचा सामना करावा लागण्याचा अंदाज होता. त्यासाठी ४६ टँकर लागू शकतात, असे अनुमान होते. त्यासाठी जवळपास अडीच कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, उन्हाळा संपत आला तरी अजूनही मोठ्या प्रमाणात टँकर सुरू नाहीत. सध्या २१ गावे आणि २८ वाड्यांसाठीच टँकर सुरू आहेत. या टँकरवर १८१५३ नागरिक आणि ५४८९ पशुधन अवलंबून आहे, तर १७ टँकर सुरू आहेत. यामध्ये माण तालुक्यात टंचाईची स्थिती अधिक आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरू झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर तालुक्यांत टंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या. मात्र, यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत टँकर उशिरा सुरू झाला आहे. वाई तालुक्यात टँकर प्रथम सुरू झाला. आता सहा तालुक्यांत टँकर सुरू आहे. लवकरच आणखी काही गावांत टंचाई भासू शकते.

चौकट :

माणमध्ये ९ गावे अन् १६ वाड्यांसाठी टँकर...

माण तालुक्यात टंचाईग्रस्त गावे वाढू लागली आहेत. सध्या ९ गावे आणि १६ वाड्यांसाठी ५ टँकर सुरू आहेत. यावर ६८९४ नागरिक अवलंबून आहेत, तर वाई तालुक्यातील ३ गावे आणि ५ वाड्यांसाठी ३ टँकर सुरू आहेत. यावर ३६२६ नागरिक आणि १४८० पशुधन अवलंबून आहे. पाटण तालुक्यातील आंब्रूळकरवाडी (भोसगाव), चव्हाणवाडी, नाणेगाव येथे टँकर सुरू आहेत. येथे एका टँकरद्वारे १२१३ नागरिक व ४५७ पशुधनाला पाणीपुरवठा सुरू आहे. त्याचबरोबर कऱ्हाड तालुक्यात चार गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. वानरवाडी बामणवाडी, गोसावेवाडी, गायकवाडवाडीसाठी ३ टँकर सुरू आहेत. खटाव तालुक्यात २ गावे आणि एका वाडीसाठी एकच टँकर सुरू झालेला आहे. महाबळेश्वर तालुक्यातही २ गावांत टंचाई आहे.

...........................................................