शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कृषीमंत्र्यांची घोषणा वाऱ्यावर; ‘प्रोत्साहन’ नाही खात्यावर; सातारा जिल्ह्यातील २० हजार शेतकरी प्रतिक्षेत

By नितीन काळेल | Updated: December 7, 2023 18:31 IST

१५ ऑगस्टपर्यंत लाभ देण्याची घोषणा केली होती

सातारा : नियमीत पीक कर्जफेडमधील राहिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्याची घोषणा कृषीमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात करुनही आतापर्यंत अनेक लाभाऱ्थींच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. सातारा जिल्ह्यातील अशा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे २० हजार आहे. आताच्या हिवाळी अधिवेशनातही यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे कृषीमंत्र्यांची घोषणा वाऱ्यावर, ‘प्रोत्साहन’ नाही खात्यावर अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.

राज्यात सुमारे चार वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी नियमित कर्जफेड आणि दोन लाखांवर पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही मदतीची घोषणा करण्यात आली होती. या योजनेला महात्मा फुले कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले होते. सुरुवातीच्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत थकित कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करुन प्रमाणिकरण केले. नंतरच रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली. त्यातच सत्ता बदलानंतर आताच्या राज्य शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास सुरुवात केली. पण, अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही.जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील यादी गेल्यावर्षी दिवाळीच्या अगोदर जाहीर झाली होती. तर दुसरी यादी गेल्यावर्षीच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केली. ही यादी सर्वांत मोठी होती. त्यानंतरही काही याद्या जाहीर झाल्या. त्यामुळे आतापर्यंत या प्रोत्साहन योजने अंतर्गत जिल्ह्यातील २ लाख १७ हजारांहून अधिक शेतकरी खातेधारकांना विशिष्ट क्रमांक मिळालेला आहे. त्यातील २ लाख १६ हजारांवर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर आतापर्यंत १ लाख ९५ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन लाभाची रक्कम जमा झालेली आहे. असे असलेतरी अजुनही जिल्ह्यातील २० हजारहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे बॅंकेतील हेलपाटे सुरूच आहेत. लाभ कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

१५ आॅगस्टपर्यंत मिळणार म्हणून अधिवेशनात घोषणा..विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत झाले होते. त्यावेळी विरोधी आमदारांनी प्रोत्साहन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रोत्साहनमधून राहिलेल्या शेतकऱ्यांना १५ आॅगस्टपर्यंत लाभ देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा होऊन तीन महिने होऊन गेलेतरी अनेकांना लाभच मिळालेला नाही.

प्रोत्साहनचा ५० हजारांपर्यंतचा यांना लाभ..राज्य शासनाच्या निर्णयामुळे नियमित पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळालाय. यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षातील तीनपैकी दोन वर्षे शेतकरी थकबाकीदार नसावा, अशी अट आहे. तरच ५० हजारांपर्यंत हा लाभ मिळणार आहे. एखाद्या शेतकऱ्याचे नियमित पीक कर्ज २५ हजार असेल तर त्याला तेवढीच रक्कम मिळणार आहे.

जिल्हा बॅंकेकडील शेतकऱ्यांना ६६७ कोटी..जिल्ह्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच ही बॅंक दरवर्षी १०० टक्क्यांहून अधिक उद्दिष्ठ गाठते. जिल्ह्यात दोन महिन्यापूर्वीपर्यंत प्रोत्साहन लाभाचे ६९२ कोटी ५८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले होते. त्यातील ६६६ कोटी ८८ लाख ९२ हजार रुपये हे जिल्हा बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी