शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

सातारा जिल्ह्यात १९३९ वनराई बंधारे बांधले; अवकाळीचे पाणी अडणार

By नितीन काळेल | Updated: November 30, 2023 19:35 IST

दोन दिवसांची मोहीम : ग्रामस्थांचा सहभाग अन् अधिकाऱ्यांचेही श्रमदान 

सातारा : दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर अवकाळीचे पाणी अडविण्यासाठी मृद व जल, पाणलोट क्षेत्र कृषी आयुक्तालयाच्या वतीने जिल्ह्यात ‘एक दिवस वनराई बंधाऱ्यासाठी’ संकल्पना राबविण्यात आली. यामधील दोन दिवसांत ग्रामस्थांचा मोठा सहभाग राहिला असून अधिकाऱ्यांनीही हाती पाटी घेऊन काम केले. त्यामुळे सर्वांच्याच प्रयत्नातून १ हजार ९३९ वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले. आता अवकाळी पाऊस झाल्यास पाणी अडून फायदाच होणार आहे.राज्यातच यावर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र जाणवत आहे. परिणामी अनेक गावांना टॅंकर सुरू आहेत. तर सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्नही भेडसावत आहे. त्यामुळे राज्य शासनाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केलेला आहे. तर त्यानंतर अनेक महसूल मंडलातही दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. त्यातच पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन पावसाचे पडलेले पाणी अडविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. या अंतर्गतच आता जिल्ह्यातही ‘एक दिवस वनराई बंधाऱ्यासाठी’ ही संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळाला.

या अनुषंगानेच राज्य शासनाच्या मृद, जल संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालयाच्या वतीने लोकसहभागातून वनराई बंधारे घेण्याची सूचना करण्यात आलेली होती. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत आणि कृषी विभागानेही तयारी केलेली. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २ हजार ८५० वनराई बंधारे निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यासाठी दि. २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात आली. पहिल्या दिवशी बुधवारी ३५५ वनराई बंधारे बांधून पूर्ण झालेले होते. तर दोन दिवसांत एेकूण १ हजार ९३९ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. सध्या अवकाळी पाऊस होत असून हे पाणी अडल्यास शेतीसाठी मोठा फायदाच होणार आहे.वनराई बंधारे निर्मिती..तालुका -पूर्ण कामे

जावळी १९७कऱ्हाड १८०खंडाळा ४०खटाव १४८कोरेगाव १०८महाबळेश्वर १५८माण  ९७पाटण ५२५फलटण १५७सातारा १०२वाई   २२७

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी