शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात १९३९ वनराई बंधारे बांधले; अवकाळीचे पाणी अडणार

By नितीन काळेल | Updated: November 30, 2023 19:35 IST

दोन दिवसांची मोहीम : ग्रामस्थांचा सहभाग अन् अधिकाऱ्यांचेही श्रमदान 

सातारा : दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर अवकाळीचे पाणी अडविण्यासाठी मृद व जल, पाणलोट क्षेत्र कृषी आयुक्तालयाच्या वतीने जिल्ह्यात ‘एक दिवस वनराई बंधाऱ्यासाठी’ संकल्पना राबविण्यात आली. यामधील दोन दिवसांत ग्रामस्थांचा मोठा सहभाग राहिला असून अधिकाऱ्यांनीही हाती पाटी घेऊन काम केले. त्यामुळे सर्वांच्याच प्रयत्नातून १ हजार ९३९ वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले. आता अवकाळी पाऊस झाल्यास पाणी अडून फायदाच होणार आहे.राज्यातच यावर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र जाणवत आहे. परिणामी अनेक गावांना टॅंकर सुरू आहेत. तर सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्नही भेडसावत आहे. त्यामुळे राज्य शासनाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केलेला आहे. तर त्यानंतर अनेक महसूल मंडलातही दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. त्यातच पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन पावसाचे पडलेले पाणी अडविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. या अंतर्गतच आता जिल्ह्यातही ‘एक दिवस वनराई बंधाऱ्यासाठी’ ही संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळाला.

या अनुषंगानेच राज्य शासनाच्या मृद, जल संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालयाच्या वतीने लोकसहभागातून वनराई बंधारे घेण्याची सूचना करण्यात आलेली होती. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत आणि कृषी विभागानेही तयारी केलेली. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २ हजार ८५० वनराई बंधारे निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यासाठी दि. २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात आली. पहिल्या दिवशी बुधवारी ३५५ वनराई बंधारे बांधून पूर्ण झालेले होते. तर दोन दिवसांत एेकूण १ हजार ९३९ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. सध्या अवकाळी पाऊस होत असून हे पाणी अडल्यास शेतीसाठी मोठा फायदाच होणार आहे.वनराई बंधारे निर्मिती..तालुका -पूर्ण कामे

जावळी १९७कऱ्हाड १८०खंडाळा ४०खटाव १४८कोरेगाव १०८महाबळेश्वर १५८माण  ९७पाटण ५२५फलटण १५७सातारा १०२वाई   २२७

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी