शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

महामार्गावरील १३० किलोमीटरमध्ये ३३९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:10 IST

दत्ता यादव। सातारा : जिल्ह्यातून १३० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग गेला असून, या मार्गावर २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत ...

दत्ता यादव।सातारा : जिल्ह्यातून १३० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग गेला असून, या मार्गावर २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत ३०१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये तब्बल ३३९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केवळ ही दोन वर्षांतील आकडेवारी मन सुन्न करणारी आहे. जिल्हा प्रशासनाने महामार्गावर नेमके अपघात कुठे होतात, त्याची कारणे काय? हे शोधून काढले आहे. आता फक्त तातडीच्या उपाययोजनेची गरज आहे.पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्यातून गेला आहे. शिरवळ (शिंदेवाडी) ते वाठार कºहाडपर्यंत हा महामार्ग तब्बल १३० किलोमीटरचा आहे. या मार्गावर सातत्याने अपघात होत असून, अनेकांचा नाहक जीव जात आहे. जिल्हा वाहतूक शाखेने महामार्गावरील अपघातांचा सर्व्हे केलाय. प्रत्येक स्पॉटवर जाऊन अपघातांचे बारकाईने अवलोकन केले आहे. नेमके अपघात कशामुळे झाले आहेत, या ठिकाणी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, याची इत्यंभूत माहिती जमा करून पोलिसांनी अहवाल तयार केलाय. २०१६-२०१८ मधील हा अहवाल असून, आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मृत्युमुखी पडत आहेत, याचा कोणाला विश्वासही बसणार नाही. एका वर्षातील आकडेवारी अपघातांच्या मालिकांची भीषणत: दाखवत आहे. एका यंत्रणेने अपघाताचे स्पॉट शोधले, आता दुसºया यंत्रणेने त्यावर तातडीची उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा हा आकडा पुढील काही वर्षांत वाढला तर नवल वाटायला नको. त्यामुळे आत्तापासूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने याची जबाबदारी आपल्यावर घेऊन भविष्यात जाणारे जीव वाचवावेत, एवढीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. कागदोपत्री अहवाल तयार करून तो एकमेकांना पाठविण्याचा शिष्टाचार शासकीय कार्यालयात आपल्याला अनेकदा पाहायला मिळतो; पण या लाल फितीच्या शिष्टाचारामुळे झटपट तोडगा निघत नाही. परिणामी केवळ आपल्यावरील जबाबदारी दुसºया विभागांवर ढकलण्याची पद्धत रुढ होत आहे. अशी ही पद्धत नागरिकांच्या जीवाशी तरी निगडित असणाºया गोष्टीत व्हायला नको, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने वाढत्या अपघातांविषयी सूचविलेल्या उपाययोजना यंदा तरी पूर्ण कराव्यात.सातारा जिल्ह्यातून जाणाºया महामार्गावर अपघातात कुठे अन् किती मयत झाले ?शिरवळ (शिंदेवाडी)-११, सातारा तालुक्यातील शेंद्रे कारखाना फाटा-१०, कºहाड तालुक्यातील पेरले फाटा-११, कोर्टी फाटा-१०, कºहाड तालुक्यातील मलकापूर फाटा-२३, वाई तालुक्यातील पाचवड नारायणवाडी फाटा-११, कºहाड तालुक्यातील वाठार फाटा (हॉटेल वैष्णवी)- १२ अशा प्रकारे महामार्गावर प्रवाशांचा जीव गेलाय. ही वारंवार अपघात होण्याची अत्यंत धोकादायक ठिकाणे आहेत. इतर ठिकाणीही अपघात होत आहेत. मात्र, त्या ठिकाणी वारंवार अपघात होत नाहीत, असे निदर्शनास आले आहे.महामार्गावर ११ पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन वर्षांत ३०१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये ३३९ जणांचा मृत्यू झालाय. तसेच सातारा जिल्ह्याला जोडलेल्या राज्यमार्गावरही अपघातांची मालिका सुरूच आहे. या राज्यमार्गावर एकूण ९ पोलीस ठाण्यांची हद्द येते. दोन वर्षांत या मार्गावर ४७ अपघात झाले असून, यामध्ये एकूण ४९ जणांचा जीव गेलाय. इतर अपघातांमध्ये शहरातील रस्त्यांचा समावेश आहे. मात्र, शहरात अपघातात बळी पडण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पाच अपघातात सहाजण मृत्यू पावले आहेत.