शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

महामार्गावरील १३० किलोमीटरमध्ये ३३९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:10 IST

दत्ता यादव। सातारा : जिल्ह्यातून १३० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग गेला असून, या मार्गावर २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत ...

दत्ता यादव।सातारा : जिल्ह्यातून १३० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग गेला असून, या मार्गावर २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत ३०१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये तब्बल ३३९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केवळ ही दोन वर्षांतील आकडेवारी मन सुन्न करणारी आहे. जिल्हा प्रशासनाने महामार्गावर नेमके अपघात कुठे होतात, त्याची कारणे काय? हे शोधून काढले आहे. आता फक्त तातडीच्या उपाययोजनेची गरज आहे.पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्यातून गेला आहे. शिरवळ (शिंदेवाडी) ते वाठार कºहाडपर्यंत हा महामार्ग तब्बल १३० किलोमीटरचा आहे. या मार्गावर सातत्याने अपघात होत असून, अनेकांचा नाहक जीव जात आहे. जिल्हा वाहतूक शाखेने महामार्गावरील अपघातांचा सर्व्हे केलाय. प्रत्येक स्पॉटवर जाऊन अपघातांचे बारकाईने अवलोकन केले आहे. नेमके अपघात कशामुळे झाले आहेत, या ठिकाणी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, याची इत्यंभूत माहिती जमा करून पोलिसांनी अहवाल तयार केलाय. २०१६-२०१८ मधील हा अहवाल असून, आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मृत्युमुखी पडत आहेत, याचा कोणाला विश्वासही बसणार नाही. एका वर्षातील आकडेवारी अपघातांच्या मालिकांची भीषणत: दाखवत आहे. एका यंत्रणेने अपघाताचे स्पॉट शोधले, आता दुसºया यंत्रणेने त्यावर तातडीची उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा हा आकडा पुढील काही वर्षांत वाढला तर नवल वाटायला नको. त्यामुळे आत्तापासूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने याची जबाबदारी आपल्यावर घेऊन भविष्यात जाणारे जीव वाचवावेत, एवढीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. कागदोपत्री अहवाल तयार करून तो एकमेकांना पाठविण्याचा शिष्टाचार शासकीय कार्यालयात आपल्याला अनेकदा पाहायला मिळतो; पण या लाल फितीच्या शिष्टाचारामुळे झटपट तोडगा निघत नाही. परिणामी केवळ आपल्यावरील जबाबदारी दुसºया विभागांवर ढकलण्याची पद्धत रुढ होत आहे. अशी ही पद्धत नागरिकांच्या जीवाशी तरी निगडित असणाºया गोष्टीत व्हायला नको, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने वाढत्या अपघातांविषयी सूचविलेल्या उपाययोजना यंदा तरी पूर्ण कराव्यात.सातारा जिल्ह्यातून जाणाºया महामार्गावर अपघातात कुठे अन् किती मयत झाले ?शिरवळ (शिंदेवाडी)-११, सातारा तालुक्यातील शेंद्रे कारखाना फाटा-१०, कºहाड तालुक्यातील पेरले फाटा-११, कोर्टी फाटा-१०, कºहाड तालुक्यातील मलकापूर फाटा-२३, वाई तालुक्यातील पाचवड नारायणवाडी फाटा-११, कºहाड तालुक्यातील वाठार फाटा (हॉटेल वैष्णवी)- १२ अशा प्रकारे महामार्गावर प्रवाशांचा जीव गेलाय. ही वारंवार अपघात होण्याची अत्यंत धोकादायक ठिकाणे आहेत. इतर ठिकाणीही अपघात होत आहेत. मात्र, त्या ठिकाणी वारंवार अपघात होत नाहीत, असे निदर्शनास आले आहे.महामार्गावर ११ पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन वर्षांत ३०१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये ३३९ जणांचा मृत्यू झालाय. तसेच सातारा जिल्ह्याला जोडलेल्या राज्यमार्गावरही अपघातांची मालिका सुरूच आहे. या राज्यमार्गावर एकूण ९ पोलीस ठाण्यांची हद्द येते. दोन वर्षांत या मार्गावर ४७ अपघात झाले असून, यामध्ये एकूण ४९ जणांचा जीव गेलाय. इतर अपघातांमध्ये शहरातील रस्त्यांचा समावेश आहे. मात्र, शहरात अपघातात बळी पडण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पाच अपघातात सहाजण मृत्यू पावले आहेत.