शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यात चार दिवसांत १८६ ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी, कोणत्या जिल्ह्यात प्रमाण अधिक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:35 IST

वणवे हे वन्यजीव आणि पशु - पक्ष्यांच्या जीवावर उठतात

दीपक शिंदेसातारा : उन्हाळा आला की डोंगराला वणवे लागतात. साधारणत: डिसेंबर महिन्यापासूनच हा प्रकार सुरू होतो. हे वणवे बंद व्हावेत यासाठी वनविभागाकडून खूप प्रयत्न केले जातात. मात्र, अनेक गैरसमजातून लागलेले वणवे हे वन्यजीव आणि पशु - पक्ष्यांच्या जीवावर उठतात. गेल्या चार दिवसांत राज्यात कोकणातील अलिबागपासून ते अगदी गडचिरोलीतील सिरोंचापर्यंत सुमारे १८६ ठिकाणी आग लागली आहे.

डोंगरांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाकडून वणवा लागण्यापूर्वीच प्रयत्न केले जातात. जाळरेषा काढून वणवा क्षेत्राबाहेर येणार नाही यासाठी खूप प्रयत्न केले जातात. तरीदेखील लागलेला वणवा बऱ्याचदा अटोक्यात आणता येत नाही.हा वणवा संपूर्ण जंगल उद्ध्वस्त करतो आणि पुढील सुमारे एक महिना प्राण्यांना आणि पशु-पक्ष्यांना अन्नाशिवाय दिवस काढावे लागतात. दरम्यानच्या काळात प्राणी मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळीही जंगली श्वापदे मानवी वस्तीत आल्याचा गवगवा होतो. यासाठी वणवा आणि आगीपासून बचाव करणे आणि वणवा लावणाऱ्यांना परावृत्त करण्याची आवश्यकता आहे.गेल्या चार दिवसांत मुंबईजवळ मँग्रोव्हच्या घाटकोपर परिसरात आग लागत आहे. बुधवारीही याठिकाणी आग लागल्याची नोंद झाली आहे. त्याबरोबरच मानखुर्द, ठाण्याच्या हिरेघर, अलिबागजवळ पाली, रोहा, पुण्याजवळ पिंपरकुंटे, भोर, आंबेगाव, जुन्नर, साताऱ्यातील मेढा, हुमगाव, पाटण जवळील भोसेगाव, नाशिकमधील सिन्नर जवळील बोरखिंड, कोल्हापुरातील कापशी, नंदुरबारमधील भुसा, चंद्रपूरमधील बाखर्डी आणि गडचिरोलीतील रेपोनल्ली, आंबेझरा याठिकाणी आगी आणि वणवे लागले होते.

वणव्याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत

रानाला वणवा लावला तर पुन्हा नवीन गवत येते आणि जनावरांना चारा मिळतो. असा लोकांमध्ये गैरसमज आहे. तो पहिल्यांदा दूर केला पाहिजे. जुने गवत त्याच्या वयोमर्यादेनुसार वाळून पडून जाते. त्याचे खतच तयार होते. त्यातूनच नवीन अंकुर फुटत असतो. पाऊस पडला की त्याला अधिक तरारी येते. त्यामुळे रान जाळल्यानंतरच नवीन गवत येते हा गैरसमज लोकांनी दूर करण्याची आवश्यकता आहे.

चार दिवसांतील आगी आणि वणवे

बुधवार ( दि. २ मार्च ) ६३ ठिकाणीमंगळवार ( दि. १ मार्च ) - ६० ठिकाणीसोमवार ( दि. २८ फेब्रुवारी ) ४२ ठिकाणीरविवार ( दि. २७ फेब्रुवारी ) २१ ठिकाणी

वन क्षेत्राशिवाय खासगी क्षेत्रातही काही आगी लागत असतात. वन क्षेत्र त्यांच्या जवळ येत असेल तर ती आग वनक्षेत्रातही पसरण्याची शक्यता असते. यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेत असतो. तरीही उन्हाळा आला की आगी वाढण्याचे प्रमाणा वाढते. जाळरेषा काढून आम्ही वणवे रोखण्यासाठी प्रयत्न करतो. पण, लोकसहभागही महत्त्वाचा आहे. - एल. एन. पोतदार, वनअधिकारी, पाटण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग