शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

राज्यात चार दिवसांत १८६ ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी, कोणत्या जिल्ह्यात प्रमाण अधिक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:35 IST

वणवे हे वन्यजीव आणि पशु - पक्ष्यांच्या जीवावर उठतात

दीपक शिंदेसातारा : उन्हाळा आला की डोंगराला वणवे लागतात. साधारणत: डिसेंबर महिन्यापासूनच हा प्रकार सुरू होतो. हे वणवे बंद व्हावेत यासाठी वनविभागाकडून खूप प्रयत्न केले जातात. मात्र, अनेक गैरसमजातून लागलेले वणवे हे वन्यजीव आणि पशु - पक्ष्यांच्या जीवावर उठतात. गेल्या चार दिवसांत राज्यात कोकणातील अलिबागपासून ते अगदी गडचिरोलीतील सिरोंचापर्यंत सुमारे १८६ ठिकाणी आग लागली आहे.

डोंगरांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाकडून वणवा लागण्यापूर्वीच प्रयत्न केले जातात. जाळरेषा काढून वणवा क्षेत्राबाहेर येणार नाही यासाठी खूप प्रयत्न केले जातात. तरीदेखील लागलेला वणवा बऱ्याचदा अटोक्यात आणता येत नाही.हा वणवा संपूर्ण जंगल उद्ध्वस्त करतो आणि पुढील सुमारे एक महिना प्राण्यांना आणि पशु-पक्ष्यांना अन्नाशिवाय दिवस काढावे लागतात. दरम्यानच्या काळात प्राणी मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळीही जंगली श्वापदे मानवी वस्तीत आल्याचा गवगवा होतो. यासाठी वणवा आणि आगीपासून बचाव करणे आणि वणवा लावणाऱ्यांना परावृत्त करण्याची आवश्यकता आहे.गेल्या चार दिवसांत मुंबईजवळ मँग्रोव्हच्या घाटकोपर परिसरात आग लागत आहे. बुधवारीही याठिकाणी आग लागल्याची नोंद झाली आहे. त्याबरोबरच मानखुर्द, ठाण्याच्या हिरेघर, अलिबागजवळ पाली, रोहा, पुण्याजवळ पिंपरकुंटे, भोर, आंबेगाव, जुन्नर, साताऱ्यातील मेढा, हुमगाव, पाटण जवळील भोसेगाव, नाशिकमधील सिन्नर जवळील बोरखिंड, कोल्हापुरातील कापशी, नंदुरबारमधील भुसा, चंद्रपूरमधील बाखर्डी आणि गडचिरोलीतील रेपोनल्ली, आंबेझरा याठिकाणी आगी आणि वणवे लागले होते.

वणव्याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत

रानाला वणवा लावला तर पुन्हा नवीन गवत येते आणि जनावरांना चारा मिळतो. असा लोकांमध्ये गैरसमज आहे. तो पहिल्यांदा दूर केला पाहिजे. जुने गवत त्याच्या वयोमर्यादेनुसार वाळून पडून जाते. त्याचे खतच तयार होते. त्यातूनच नवीन अंकुर फुटत असतो. पाऊस पडला की त्याला अधिक तरारी येते. त्यामुळे रान जाळल्यानंतरच नवीन गवत येते हा गैरसमज लोकांनी दूर करण्याची आवश्यकता आहे.

चार दिवसांतील आगी आणि वणवे

बुधवार ( दि. २ मार्च ) ६३ ठिकाणीमंगळवार ( दि. १ मार्च ) - ६० ठिकाणीसोमवार ( दि. २८ फेब्रुवारी ) ४२ ठिकाणीरविवार ( दि. २७ फेब्रुवारी ) २१ ठिकाणी

वन क्षेत्राशिवाय खासगी क्षेत्रातही काही आगी लागत असतात. वन क्षेत्र त्यांच्या जवळ येत असेल तर ती आग वनक्षेत्रातही पसरण्याची शक्यता असते. यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेत असतो. तरीही उन्हाळा आला की आगी वाढण्याचे प्रमाणा वाढते. जाळरेषा काढून आम्ही वणवे रोखण्यासाठी प्रयत्न करतो. पण, लोकसहभागही महत्त्वाचा आहे. - एल. एन. पोतदार, वनअधिकारी, पाटण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग