शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

राज्यात चार दिवसांत १८६ ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी, कोणत्या जिल्ह्यात प्रमाण अधिक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:35 IST

वणवे हे वन्यजीव आणि पशु - पक्ष्यांच्या जीवावर उठतात

दीपक शिंदेसातारा : उन्हाळा आला की डोंगराला वणवे लागतात. साधारणत: डिसेंबर महिन्यापासूनच हा प्रकार सुरू होतो. हे वणवे बंद व्हावेत यासाठी वनविभागाकडून खूप प्रयत्न केले जातात. मात्र, अनेक गैरसमजातून लागलेले वणवे हे वन्यजीव आणि पशु - पक्ष्यांच्या जीवावर उठतात. गेल्या चार दिवसांत राज्यात कोकणातील अलिबागपासून ते अगदी गडचिरोलीतील सिरोंचापर्यंत सुमारे १८६ ठिकाणी आग लागली आहे.

डोंगरांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाकडून वणवा लागण्यापूर्वीच प्रयत्न केले जातात. जाळरेषा काढून वणवा क्षेत्राबाहेर येणार नाही यासाठी खूप प्रयत्न केले जातात. तरीदेखील लागलेला वणवा बऱ्याचदा अटोक्यात आणता येत नाही.हा वणवा संपूर्ण जंगल उद्ध्वस्त करतो आणि पुढील सुमारे एक महिना प्राण्यांना आणि पशु-पक्ष्यांना अन्नाशिवाय दिवस काढावे लागतात. दरम्यानच्या काळात प्राणी मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळीही जंगली श्वापदे मानवी वस्तीत आल्याचा गवगवा होतो. यासाठी वणवा आणि आगीपासून बचाव करणे आणि वणवा लावणाऱ्यांना परावृत्त करण्याची आवश्यकता आहे.गेल्या चार दिवसांत मुंबईजवळ मँग्रोव्हच्या घाटकोपर परिसरात आग लागत आहे. बुधवारीही याठिकाणी आग लागल्याची नोंद झाली आहे. त्याबरोबरच मानखुर्द, ठाण्याच्या हिरेघर, अलिबागजवळ पाली, रोहा, पुण्याजवळ पिंपरकुंटे, भोर, आंबेगाव, जुन्नर, साताऱ्यातील मेढा, हुमगाव, पाटण जवळील भोसेगाव, नाशिकमधील सिन्नर जवळील बोरखिंड, कोल्हापुरातील कापशी, नंदुरबारमधील भुसा, चंद्रपूरमधील बाखर्डी आणि गडचिरोलीतील रेपोनल्ली, आंबेझरा याठिकाणी आगी आणि वणवे लागले होते.

वणव्याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत

रानाला वणवा लावला तर पुन्हा नवीन गवत येते आणि जनावरांना चारा मिळतो. असा लोकांमध्ये गैरसमज आहे. तो पहिल्यांदा दूर केला पाहिजे. जुने गवत त्याच्या वयोमर्यादेनुसार वाळून पडून जाते. त्याचे खतच तयार होते. त्यातूनच नवीन अंकुर फुटत असतो. पाऊस पडला की त्याला अधिक तरारी येते. त्यामुळे रान जाळल्यानंतरच नवीन गवत येते हा गैरसमज लोकांनी दूर करण्याची आवश्यकता आहे.

चार दिवसांतील आगी आणि वणवे

बुधवार ( दि. २ मार्च ) ६३ ठिकाणीमंगळवार ( दि. १ मार्च ) - ६० ठिकाणीसोमवार ( दि. २८ फेब्रुवारी ) ४२ ठिकाणीरविवार ( दि. २७ फेब्रुवारी ) २१ ठिकाणी

वन क्षेत्राशिवाय खासगी क्षेत्रातही काही आगी लागत असतात. वन क्षेत्र त्यांच्या जवळ येत असेल तर ती आग वनक्षेत्रातही पसरण्याची शक्यता असते. यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेत असतो. तरीही उन्हाळा आला की आगी वाढण्याचे प्रमाणा वाढते. जाळरेषा काढून आम्ही वणवे रोखण्यासाठी प्रयत्न करतो. पण, लोकसहभागही महत्त्वाचा आहे. - एल. एन. पोतदार, वनअधिकारी, पाटण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग