शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पूरप्रवण १७२, दरडची १२४ गावे निश्चित; धोकादायक गावात उपाययोजना सुरू

By नितीन काळेल | Updated: July 21, 2023 13:27 IST

इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क

सातारा : राज्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून धोकादायक गावात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत ३६९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेले. आतातर प्रशासनाने जिल्ह्यातील संभाव्य पूरप्रवण १७२ आणि दरडप्रवण १२४ यादीच स्पष्ट केली आहे. ९ तालुक्यांत असणाऱ्या या गावांवर प्रशासनाचे लक्ष असणार आहे. तसेच जिल्ह्यात दरडप्रवणची ४१ गावे आहेत.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दरवर्षी धुवांधार पाऊस पडतो. यामुळे ओढे, नद्यांना पूर येतो. तसेच रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जातात. त्यातच दोन वर्षांपूर्वी पाटण तालुक्यात दरड कोसळण्याची घटना घडली होती. यामध्ये काही लोकांना जीव गमवावा लागलेला. तर नुकतीच रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांचा जीव गेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातूच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दरडप्रवण गावातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची सूचना केली. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही पाटण तालुक्यात भेटी देऊन स्थलांतरित लोकांची माहिती घेतली.सातारा जिल्ह्यात प्रशासनाने नदीकाठची संभाव्य १७२ पूरप्रवण गावे निश्चित केली आहेत. यामध्ये सातारा तालुक्यात ३३ असून कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ५५, पाटणमध्ये ३१, कोरेगाव ११, वाई १७, खंडाळा तालुक्यात ९ आणि फलटण तालुक्यात १६ गावे आहेत. त्याचबरोबर संभाव्य दरडप्रवण गावांची संख्या १२४ इतकी आहे. यामध्ये सातारा आणि जावळी तालुक्यात प्रत्येकी १०, वाई १८, महाबळेश्वरमध्ये ३६ आणि पाटण तालुक्यात सर्वाधिक ५० गावे संभाव्य दरडप्रवण आहेत. या गावांवर प्रशासनाचे लक्ष असणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलन