शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

सातारा जिल्ह्यात पूरप्रवण १७२, दरडची १२४ गावे निश्चित; धोकादायक गावात उपाययोजना सुरू

By नितीन काळेल | Updated: July 21, 2023 13:27 IST

इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क

सातारा : राज्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून धोकादायक गावात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत ३६९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेले. आतातर प्रशासनाने जिल्ह्यातील संभाव्य पूरप्रवण १७२ आणि दरडप्रवण १२४ यादीच स्पष्ट केली आहे. ९ तालुक्यांत असणाऱ्या या गावांवर प्रशासनाचे लक्ष असणार आहे. तसेच जिल्ह्यात दरडप्रवणची ४१ गावे आहेत.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दरवर्षी धुवांधार पाऊस पडतो. यामुळे ओढे, नद्यांना पूर येतो. तसेच रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जातात. त्यातच दोन वर्षांपूर्वी पाटण तालुक्यात दरड कोसळण्याची घटना घडली होती. यामध्ये काही लोकांना जीव गमवावा लागलेला. तर नुकतीच रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांचा जीव गेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातूच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दरडप्रवण गावातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची सूचना केली. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही पाटण तालुक्यात भेटी देऊन स्थलांतरित लोकांची माहिती घेतली.सातारा जिल्ह्यात प्रशासनाने नदीकाठची संभाव्य १७२ पूरप्रवण गावे निश्चित केली आहेत. यामध्ये सातारा तालुक्यात ३३ असून कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ५५, पाटणमध्ये ३१, कोरेगाव ११, वाई १७, खंडाळा तालुक्यात ९ आणि फलटण तालुक्यात १६ गावे आहेत. त्याचबरोबर संभाव्य दरडप्रवण गावांची संख्या १२४ इतकी आहे. यामध्ये सातारा आणि जावळी तालुक्यात प्रत्येकी १०, वाई १८, महाबळेश्वरमध्ये ३६ आणि पाटण तालुक्यात सर्वाधिक ५० गावे संभाव्य दरडप्रवण आहेत. या गावांवर प्रशासनाचे लक्ष असणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलन