शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

१७० जवान आर्वीची शान; त्यांच्यासाठी कमान!; सातारा जिल्ह्याला शौर्याचा वारसा

By जगदीश कोष्टी | Updated: August 16, 2025 18:36 IST

आजी-माजी संघटनेचा उपक्रम

जगदीश कोष्टीसातारा : पानमळ्याचे गाव म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्यातील अवघ्या तीन हजार उंबऱ्याच्या आर्वी गावाने आतापर्यंत १७० जवान भारतमातेच्या सेवेसाठी दिले आहेत. हे जवान म्हणजे जणू या गावची शानच आहेत. यांच्या कार्याचा गौरव कायम स्मरणात राहावा, यासाठी आजी-माजी सैनिक संघटनेने स्वागत कमान उभारली आहे. या कमानीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी मेजर जनरल नंदकिशोर जाधव यांच्या हस्ते होत आहे.सातारा जिल्हा हा शूरवीरांचा, क्रांतिकारकांचा मानला जातो. मिलिटरी अपशिंगेसारख्या असंख्य गावांना शौर्याचा वारसा लाभलेला आहे. कोरेगाव तालुक्यातील आर्वी हे गावही त्यापैकीच एक. सर्वसाधारणपणे ९ हजार लोकसंख्येच्या या गावाने आतापर्यंत १७० नरवीरांना जन्म दिला. त्यांनी भारतमातेच्या संरक्षणासाठी सीमेवर जाणे पसंत केले. त्यातील दोघे जण शहीद झाले आहेत.

या गावातील शूरवीरांनी भारत-पाकिस्तान यांच्यात झालेले युद्ध, यामध्ये १९६५, १९७१ आणि १९९९ला झालेल्या कारगिल युद्धात सक्रिय सहभाग घेतला होता. या जवानांच्या स्मृती जतन करणे आणि भावी पिढीत देशसेवेची बीजं अंकुरण्यासाठी गावातील आजी-माजी सैनिक संघटनेने एक भव्य कमान उभारली आहे.तीन अधिकारी भावंडंया गावच्या जाधव कुटुंबातील तीन भावंडे सैन्यात अधिकारी होते. त्यातील मेजर जनरल नंदकिशोर जाधव, मेजर जनरल गुरूदत्त जाधव अन् निवृत्त कर्नल राजकुमार जाधव या अधिकारी भावंडांचा गावाला कायम अभिमान राहिला आहे. विशेष म्हणजे यांचे वडील साहेबराव जाधव हे मेजर होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले होते.

..अशी आहे फौज

  • सैन्यात कार्यरत : ७०
  • निवृत्त - १००
  • शहीद - २
  • अधिकारी - ३

सामाजिक भानहीगावातील आजी-माजी संघटना सामाजिक कार्यातही अग्रेसर असून, या संघटनेने जलजीवन मिशन अंतर्गत गावातील पाणीटंचाई निवारणार्थ मदतीसाठी सहकार्य केले आहे. गावात दारूबंदीसाठी ठराव घेतला आहे. तसेच गावातील हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांना आधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.