शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

१७० जवान आर्वीची शान; त्यांच्यासाठी कमान!; सातारा जिल्ह्याला शौर्याचा वारसा

By जगदीश कोष्टी | Updated: August 16, 2025 18:36 IST

आजी-माजी संघटनेचा उपक्रम

जगदीश कोष्टीसातारा : पानमळ्याचे गाव म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्यातील अवघ्या तीन हजार उंबऱ्याच्या आर्वी गावाने आतापर्यंत १७० जवान भारतमातेच्या सेवेसाठी दिले आहेत. हे जवान म्हणजे जणू या गावची शानच आहेत. यांच्या कार्याचा गौरव कायम स्मरणात राहावा, यासाठी आजी-माजी सैनिक संघटनेने स्वागत कमान उभारली आहे. या कमानीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी मेजर जनरल नंदकिशोर जाधव यांच्या हस्ते होत आहे.सातारा जिल्हा हा शूरवीरांचा, क्रांतिकारकांचा मानला जातो. मिलिटरी अपशिंगेसारख्या असंख्य गावांना शौर्याचा वारसा लाभलेला आहे. कोरेगाव तालुक्यातील आर्वी हे गावही त्यापैकीच एक. सर्वसाधारणपणे ९ हजार लोकसंख्येच्या या गावाने आतापर्यंत १७० नरवीरांना जन्म दिला. त्यांनी भारतमातेच्या संरक्षणासाठी सीमेवर जाणे पसंत केले. त्यातील दोघे जण शहीद झाले आहेत.

या गावातील शूरवीरांनी भारत-पाकिस्तान यांच्यात झालेले युद्ध, यामध्ये १९६५, १९७१ आणि १९९९ला झालेल्या कारगिल युद्धात सक्रिय सहभाग घेतला होता. या जवानांच्या स्मृती जतन करणे आणि भावी पिढीत देशसेवेची बीजं अंकुरण्यासाठी गावातील आजी-माजी सैनिक संघटनेने एक भव्य कमान उभारली आहे.तीन अधिकारी भावंडंया गावच्या जाधव कुटुंबातील तीन भावंडे सैन्यात अधिकारी होते. त्यातील मेजर जनरल नंदकिशोर जाधव, मेजर जनरल गुरूदत्त जाधव अन् निवृत्त कर्नल राजकुमार जाधव या अधिकारी भावंडांचा गावाला कायम अभिमान राहिला आहे. विशेष म्हणजे यांचे वडील साहेबराव जाधव हे मेजर होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले होते.

..अशी आहे फौज

  • सैन्यात कार्यरत : ७०
  • निवृत्त - १००
  • शहीद - २
  • अधिकारी - ३

सामाजिक भानहीगावातील आजी-माजी संघटना सामाजिक कार्यातही अग्रेसर असून, या संघटनेने जलजीवन मिशन अंतर्गत गावातील पाणीटंचाई निवारणार्थ मदतीसाठी सहकार्य केले आहे. गावात दारूबंदीसाठी ठराव घेतला आहे. तसेच गावातील हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांना आधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.