शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

१७० जवान आर्वीची शान; त्यांच्यासाठी कमान!; सातारा जिल्ह्याला शौर्याचा वारसा

By जगदीश कोष्टी | Updated: August 16, 2025 18:36 IST

आजी-माजी संघटनेचा उपक्रम

जगदीश कोष्टीसातारा : पानमळ्याचे गाव म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्यातील अवघ्या तीन हजार उंबऱ्याच्या आर्वी गावाने आतापर्यंत १७० जवान भारतमातेच्या सेवेसाठी दिले आहेत. हे जवान म्हणजे जणू या गावची शानच आहेत. यांच्या कार्याचा गौरव कायम स्मरणात राहावा, यासाठी आजी-माजी सैनिक संघटनेने स्वागत कमान उभारली आहे. या कमानीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी मेजर जनरल नंदकिशोर जाधव यांच्या हस्ते होत आहे.सातारा जिल्हा हा शूरवीरांचा, क्रांतिकारकांचा मानला जातो. मिलिटरी अपशिंगेसारख्या असंख्य गावांना शौर्याचा वारसा लाभलेला आहे. कोरेगाव तालुक्यातील आर्वी हे गावही त्यापैकीच एक. सर्वसाधारणपणे ९ हजार लोकसंख्येच्या या गावाने आतापर्यंत १७० नरवीरांना जन्म दिला. त्यांनी भारतमातेच्या संरक्षणासाठी सीमेवर जाणे पसंत केले. त्यातील दोघे जण शहीद झाले आहेत.

या गावातील शूरवीरांनी भारत-पाकिस्तान यांच्यात झालेले युद्ध, यामध्ये १९६५, १९७१ आणि १९९९ला झालेल्या कारगिल युद्धात सक्रिय सहभाग घेतला होता. या जवानांच्या स्मृती जतन करणे आणि भावी पिढीत देशसेवेची बीजं अंकुरण्यासाठी गावातील आजी-माजी सैनिक संघटनेने एक भव्य कमान उभारली आहे.तीन अधिकारी भावंडंया गावच्या जाधव कुटुंबातील तीन भावंडे सैन्यात अधिकारी होते. त्यातील मेजर जनरल नंदकिशोर जाधव, मेजर जनरल गुरूदत्त जाधव अन् निवृत्त कर्नल राजकुमार जाधव या अधिकारी भावंडांचा गावाला कायम अभिमान राहिला आहे. विशेष म्हणजे यांचे वडील साहेबराव जाधव हे मेजर होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले होते.

..अशी आहे फौज

  • सैन्यात कार्यरत : ७०
  • निवृत्त - १००
  • शहीद - २
  • अधिकारी - ३

सामाजिक भानहीगावातील आजी-माजी संघटना सामाजिक कार्यातही अग्रेसर असून, या संघटनेने जलजीवन मिशन अंतर्गत गावातील पाणीटंचाई निवारणार्थ मदतीसाठी सहकार्य केले आहे. गावात दारूबंदीसाठी ठराव घेतला आहे. तसेच गावातील हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांना आधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.