शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
2
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
3
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
4
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
5
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
7
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
8
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
9
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
10
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
11
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
12
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
13
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
14
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
15
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
16
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
18
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
19
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

फाशीच्या वडाला १६१ वर्षे; पाचजणांना दिली होती फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:32 IST

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ब्रिटिशांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या १८५७ च्या बंडात सहभागी झालेल्या १७ क्रांतिवीरांना लष्करी न्यायमंडळाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, क्रूर ब्रिटिशांनी पाचजणांना फाशी दिली. सहाजणांना तोफेच्या तोंडी दिले तर आणखी सहाजणांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. १६१ वर्षांपूर्वी ८ सप्टेंबर रोजी शाहूपुरी परिसरातील गेंडामाळावर क्रांतिकारकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले; ...

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ब्रिटिशांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या १८५७ च्या बंडात सहभागी झालेल्या १७ क्रांतिवीरांना लष्करी न्यायमंडळाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, क्रूर ब्रिटिशांनी पाचजणांना फाशी दिली. सहाजणांना तोफेच्या तोंडी दिले तर आणखी सहाजणांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. १६१ वर्षांपूर्वी ८ सप्टेंबर रोजी शाहूपुरी परिसरातील गेंडामाळावर क्रांतिकारकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हुतात्मा स्तंभाची आज दुरवस्था झाली आहे.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्यवादी धोरणामुळे देशातील अनेक संस्थाने खालसा करण्यात आला होता. त्यामुळे जनतेमुळे अंसतोष पसरला होता. दरम्यान, १८३८ मध्ये प्रतापसिंह महाराजांना ब्रिटिशांनी पदच्युत केल्यानंतर रंगो बापूजी गुप्ते यांनी अन्यायाविरुद्ध दादमागितली. मात्र निराश होऊन ते परत आले. त्यांनी तात्या टोपे व नानासाहेब पेशवे यांच्या मदतीने १८५७ च्या उठावासाठी माणसे, पैसे व साहित्य मिळविण्यासाठी फिरत होते. त्यांनी पोलिसांत व इंग्रजी सैन्यातफितुरी माजवणे, शस्त्रे गोळा करणे दारूगोळा तयार करणे असे नियोजन केले. मात्र, फितुरीमुळे हा उठाव अयशस्वी झाला.१८५८ च्या आॅगस्टमध्ये तीन जणांचे एक लष्करी न्यायाधीश मंडळ नेमून चौकशी सुरू झाली. रंगो बापूजी सापडले नाहीतच; पण त्यांचा मुलगा सीताराम गुप्तेला बोरगाव येथे पकडण्यात आले. ‘मी बंडात भाग घेतला होता,’ असे त्यांनी उघडपणे सांगितले. याचा खटला १५ मार्च ते २४ मार्च १८५८ पर्यंत चालला. ७ आॅगस्ट १८५८ रोजी पकडलेल्या क्रांतिकारकांची मालमत्ता जप्त करून सर्वांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. ८ सप्टेंबर १८५८ रोजी शिक्षेची अंमलबजावणी झाली.यामध्ये पाचजणांना फाशी, सहाजणांना गोळ्या घातल्या व इतर सहाजणांना तोफेच्या तोंडीदिले.इंग्रजांच्या निर्दयी कृत्यामुळे जेथे १७ क्रांतिवीरांना प्राणास मुकावेलागले. तीच ही हौताम्यभूमीआहे, त्याठिकाणी आज तो ऐतिहासिक फाशीचा वड नाही; पण येणाऱ्या पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देईल, असा हुतात्मास्तंभ आहे. मात्र, प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्था उपलब्ध न केल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. सातारकरांनी ८ सप्टेंबर हा दिवस हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मानावा, यासाठी सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सातारकरांची अपेक्षा आहे.यांना झाली शिक्षानारायण पावसकर सोनार, केशव चित्रे, शिवराम कुलकर्णी, विठ्ठल कोंडी, सीताराम गुप्ते यांना फाशी. मुनजी मंदिर्गे, सखाराम शेट्ये, बाबा गायकवाड, येशा गायकवाड, गणेश कारखानीस, नाना रामोशी यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. रामजी चव्हाण, बाबा कानगी रामोशी, नामा रामोशी, शिवाजी पोटाले (पाटोळे) पर्वती पोटाले (पाटोळे), पाटलू येशू यांना गोळ्या घालण्यात आल्या.