शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फाशीच्या वडाला १६१ वर्षे; पाचजणांना दिली होती फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:32 IST

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ब्रिटिशांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या १८५७ च्या बंडात सहभागी झालेल्या १७ क्रांतिवीरांना लष्करी न्यायमंडळाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, क्रूर ब्रिटिशांनी पाचजणांना फाशी दिली. सहाजणांना तोफेच्या तोंडी दिले तर आणखी सहाजणांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. १६१ वर्षांपूर्वी ८ सप्टेंबर रोजी शाहूपुरी परिसरातील गेंडामाळावर क्रांतिकारकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले; ...

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ब्रिटिशांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या १८५७ च्या बंडात सहभागी झालेल्या १७ क्रांतिवीरांना लष्करी न्यायमंडळाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, क्रूर ब्रिटिशांनी पाचजणांना फाशी दिली. सहाजणांना तोफेच्या तोंडी दिले तर आणखी सहाजणांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. १६१ वर्षांपूर्वी ८ सप्टेंबर रोजी शाहूपुरी परिसरातील गेंडामाळावर क्रांतिकारकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हुतात्मा स्तंभाची आज दुरवस्था झाली आहे.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्यवादी धोरणामुळे देशातील अनेक संस्थाने खालसा करण्यात आला होता. त्यामुळे जनतेमुळे अंसतोष पसरला होता. दरम्यान, १८३८ मध्ये प्रतापसिंह महाराजांना ब्रिटिशांनी पदच्युत केल्यानंतर रंगो बापूजी गुप्ते यांनी अन्यायाविरुद्ध दादमागितली. मात्र निराश होऊन ते परत आले. त्यांनी तात्या टोपे व नानासाहेब पेशवे यांच्या मदतीने १८५७ च्या उठावासाठी माणसे, पैसे व साहित्य मिळविण्यासाठी फिरत होते. त्यांनी पोलिसांत व इंग्रजी सैन्यातफितुरी माजवणे, शस्त्रे गोळा करणे दारूगोळा तयार करणे असे नियोजन केले. मात्र, फितुरीमुळे हा उठाव अयशस्वी झाला.१८५८ च्या आॅगस्टमध्ये तीन जणांचे एक लष्करी न्यायाधीश मंडळ नेमून चौकशी सुरू झाली. रंगो बापूजी सापडले नाहीतच; पण त्यांचा मुलगा सीताराम गुप्तेला बोरगाव येथे पकडण्यात आले. ‘मी बंडात भाग घेतला होता,’ असे त्यांनी उघडपणे सांगितले. याचा खटला १५ मार्च ते २४ मार्च १८५८ पर्यंत चालला. ७ आॅगस्ट १८५८ रोजी पकडलेल्या क्रांतिकारकांची मालमत्ता जप्त करून सर्वांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. ८ सप्टेंबर १८५८ रोजी शिक्षेची अंमलबजावणी झाली.यामध्ये पाचजणांना फाशी, सहाजणांना गोळ्या घातल्या व इतर सहाजणांना तोफेच्या तोंडीदिले.इंग्रजांच्या निर्दयी कृत्यामुळे जेथे १७ क्रांतिवीरांना प्राणास मुकावेलागले. तीच ही हौताम्यभूमीआहे, त्याठिकाणी आज तो ऐतिहासिक फाशीचा वड नाही; पण येणाऱ्या पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देईल, असा हुतात्मास्तंभ आहे. मात्र, प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्था उपलब्ध न केल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. सातारकरांनी ८ सप्टेंबर हा दिवस हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मानावा, यासाठी सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सातारकरांची अपेक्षा आहे.यांना झाली शिक्षानारायण पावसकर सोनार, केशव चित्रे, शिवराम कुलकर्णी, विठ्ठल कोंडी, सीताराम गुप्ते यांना फाशी. मुनजी मंदिर्गे, सखाराम शेट्ये, बाबा गायकवाड, येशा गायकवाड, गणेश कारखानीस, नाना रामोशी यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. रामजी चव्हाण, बाबा कानगी रामोशी, नामा रामोशी, शिवाजी पोटाले (पाटोळे) पर्वती पोटाले (पाटोळे), पाटलू येशू यांना गोळ्या घालण्यात आल्या.