शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

मुदत संपूनही १५ हजार जणांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST

सातारा : अलीकडे लसीकरण संथगतीने होऊ लागल्याने मुदत संपूनही तब्बल १५ हजार जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याचे समोर ...

सातारा : अलीकडे लसीकरण संथगतीने होऊ लागल्याने मुदत संपूनही तब्बल १५ हजार जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे. तिसरी लाट येण्यापूर्वीच कमीतकमी २१ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे नागरिक बिनधास्त आहेत. पण ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. परंतु, लसीचा वारंवार होणारा तुटवडा लसीकरणाला खीळ घालत आहे. अद्यापही दुसऱ्या डोसची मुदत संपूनही तब्बल १५ लाख लोकांनी लस घेतली नाही. त्यामुळे आरोग्य विभागही काळजीत पडला आहे.

चाैकट : दुसरा डोस घेणेही तितकेच आवश्यक

पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणेही आवश्यक आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रतिकारशक्ती वाढून मृत्यूचे प्रमाण घटू शकेल, यासाठी दोन्ही डोस घेणे महत्त्वाचे आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने मृतांची संख्या वाढत आहे. तब्बल सहा हजारांहून अधिकजणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ही मृत्यूची संख्या शून्यावर आणण्यासाठी लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे.

चाैकट : नेमकी अडचण काय

लसीकरण पूर्ण होण्यासाठी खरी अडचण आहे ती लसीच्या तुटवड्याची. तसं पाहिलं तर सातारा जिल्ह्याची लोकसंख्या ३२ लाख आहे. सध्या सुरू असलेले लसीकरण जर संथगतीने होत असेल, तर या सर्वांचे लसीकरण पूर्ण होण्यास अजून दोन वर्षे लागतील. त्यामुळे लसीकरणाचा वेग तर वाढविणे गरजेचेच आहे. शिवाय लसीचा साठाही तितक्याच पटीने प्रशासनाने देणे गरजेचे आहे.

कोट : लसीचा जादा पुरवठा होणार...

लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. मात्र, लसीचा वारंवार तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरणाने म्हणावा तसा वेग घेतला नाही. लसीची मागणी करण्यात आली आहे. जादा लसीचा साठा उपलब्ध होणार आहे.

- डाॅ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा

चाैकट : आकडेवारी

जिल्ह्यात झालेले लसीकरण

पहिला डोस - १३२६५३

दुसरा डोस - ५४२४१३