शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

स्वच्छ अन् टापटीप गणवेशात आले १०६ विद्यार्थी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:32 IST

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आंर्तबाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटावे. त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ असल्यास मनही प्रसन्न राहते, याचे बाळकडू मिळावेत, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने ‘स्वच्छ शाळा,

ठळक मुद्देअण्णासाहेब कल्याणी विद्यालय रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रम

सातारा : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आंर्तबाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटावे. त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ असल्यास मनही प्रसन्न राहते, याचे बाळकडू मिळावेत, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम आयोजित केला. पहिल्याच दिवशी सोमवारी पहिलीतील १०६ विद्यार्थी टापटीप गणवेशात वर्गात आले होते.

रयत शिक्षण संस्था यंदा शताब्दी वर्ष साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने वर्षभर विविध विधायक कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केला. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी, पालकांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे.मुख्याध्यापक प्रमोद वायदंडे म्हणाले, ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांमध्ये परिपूर्ण गणवेश, वर्ग सजावट, परिसर स्वच्छता, बागेची निगा राखणे यावर भर दिला जात आहे. यासाठी जून महिन्यापासूनच तयारी करण्यात आली. यासाठी वाक्यपट्ट्या, शब्दपट्ट्या तयार करण्यात आल्या. व्यसनामुळे आरोग्यावर होणारे परिणाम, होणार आजार याबाबत जनजागृती करणारे संदेश देण्यात आले.’

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागावी, त्यांना वेळेचे महत्त्व पटावे यासाठी पालकसभा घेऊन जनजागृती करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेत स्थापनेपासून आत्तापर्यंत झालेला बदल याची ध्वनीचित्रफीत दाखविली. पहिल्याच दिवशी सोमवार, दि. ८ रोजी पहिलीतील १०६ विद्यार्थी परिपूर्ण गणवेशात आली होती. त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रा. अजित पाटील, धैर्यशील पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक प्रमोद वायदंडे, पर्यवेक्षक संजय घाडगे, दीपक महापरळे, वर्गशिक्षिका वर्षा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठीगुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यालयाने आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात येणार आहे. यामध्ये मुलांना लसीकरण, डिसेंबर-जानेवारी महिन्यात आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना थेट बांधावर नेऊन शेतीविषयी माहिती देणे हे उपक्रम राबविले जात आहे. गेल्या वर्षी प्रदूषण मुक्त दिवाळी हा उपक्रम राबविला. तेव्हा फटाक्यातून पैसे वाचवून अनाथ मुलांना जीवनाश्यक वस्तू देण्यात आल्या होत्या. हाच उपक्रम यंदाही राबविला जाणार आहे. 

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी निमित्ताने हा उपक्रम आयोजित केला असला तरी तो कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस फायदा होणार आहे.- प्रमोद वायदंडे, मुख्याध्यापक

साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सोमवारी पहिलीतील विद्यार्थी परिपूर्ण गणवेशात आले होते.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीSatara areaसातारा परिसर