शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

स्वच्छ अन् टापटीप गणवेशात आले १०६ विद्यार्थी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:32 IST

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आंर्तबाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटावे. त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ असल्यास मनही प्रसन्न राहते, याचे बाळकडू मिळावेत, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने ‘स्वच्छ शाळा,

ठळक मुद्देअण्णासाहेब कल्याणी विद्यालय रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रम

सातारा : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आंर्तबाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटावे. त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ असल्यास मनही प्रसन्न राहते, याचे बाळकडू मिळावेत, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम आयोजित केला. पहिल्याच दिवशी सोमवारी पहिलीतील १०६ विद्यार्थी टापटीप गणवेशात वर्गात आले होते.

रयत शिक्षण संस्था यंदा शताब्दी वर्ष साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने वर्षभर विविध विधायक कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केला. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी, पालकांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे.मुख्याध्यापक प्रमोद वायदंडे म्हणाले, ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांमध्ये परिपूर्ण गणवेश, वर्ग सजावट, परिसर स्वच्छता, बागेची निगा राखणे यावर भर दिला जात आहे. यासाठी जून महिन्यापासूनच तयारी करण्यात आली. यासाठी वाक्यपट्ट्या, शब्दपट्ट्या तयार करण्यात आल्या. व्यसनामुळे आरोग्यावर होणारे परिणाम, होणार आजार याबाबत जनजागृती करणारे संदेश देण्यात आले.’

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागावी, त्यांना वेळेचे महत्त्व पटावे यासाठी पालकसभा घेऊन जनजागृती करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेत स्थापनेपासून आत्तापर्यंत झालेला बदल याची ध्वनीचित्रफीत दाखविली. पहिल्याच दिवशी सोमवार, दि. ८ रोजी पहिलीतील १०६ विद्यार्थी परिपूर्ण गणवेशात आली होती. त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रा. अजित पाटील, धैर्यशील पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक प्रमोद वायदंडे, पर्यवेक्षक संजय घाडगे, दीपक महापरळे, वर्गशिक्षिका वर्षा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठीगुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यालयाने आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात येणार आहे. यामध्ये मुलांना लसीकरण, डिसेंबर-जानेवारी महिन्यात आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना थेट बांधावर नेऊन शेतीविषयी माहिती देणे हे उपक्रम राबविले जात आहे. गेल्या वर्षी प्रदूषण मुक्त दिवाळी हा उपक्रम राबविला. तेव्हा फटाक्यातून पैसे वाचवून अनाथ मुलांना जीवनाश्यक वस्तू देण्यात आल्या होत्या. हाच उपक्रम यंदाही राबविला जाणार आहे. 

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी निमित्ताने हा उपक्रम आयोजित केला असला तरी तो कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस फायदा होणार आहे.- प्रमोद वायदंडे, मुख्याध्यापक

साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सोमवारी पहिलीतील विद्यार्थी परिपूर्ण गणवेशात आले होते.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीSatara areaसातारा परिसर