शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

तरुण वळला शेती, दुग्ध व्यवसायाकड

By admin | Updated: December 11, 2014 23:41 IST

म्हैसाळ परिसरातील चित्र : शिक्षणाचा आधुनिक शेतीसाठी उपयोगे

सुशांत घोरपडे- म्हैसाळ -शासकीय खात्यातील रिक्त जागा सुशिक्षित बेरोजगारांच्या तुलनेत कमी असल्याने आता सुशिक्षित बेरोजगार खासगी नोकरीपेक्षा शेती व दुग्ध व्यवसायाला पसंती देत असल्याचे चित्र म्हैसाळ, नरवाड, विजयनगर, ढवळी, वड्डी या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.पूर्वीच्या काळी मुलगा पदवीधर झाला की त्याला नोकरी मिळत होती. सरकारने सर्व शिक्षण अभियान सुरू केले व जास्तीत जास्त मुला-मुलींना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वीही झाला. पण त्यांना आवश्यक असणारे उद्योगधंदे व नोकऱ्या याकडे मात्र सरकारने पाठ फिरवली. मग ही जबाबदारी सरकार घेणार की नाही? हा खरा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. आज खासगी कंपनीत नोकरीला लागल्यावर त्याला तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागते. म्हणजे त्याचा पगार शेतात काम करणाऱ्या मजुरापेक्षाही कमी असतो व मानसिक संतुलन राहत नाही, असा समज या सुशिक्षित बेरोजगारांचा झाला आहे.या कारणामुळे अनेकजण शेती व दुग्ध व्यवसायाकडे वळल्याचे चित्र आहे. काही तरुण आपली शेती उत्तमरित्या करत आहेत, तर काहीजण शेतामध्ये रोजगार करणे पसंत करीत आहेत. शेतीमध्ये ऊस, द्राक्षे, केळी ही पिके या परिसरात मोठ्या प्रमाणावर येतात. या पिकांचे उत्पन्न जास्त असल्यामुळे मजुरांना शेतकऱ्यांकडून चांगला पगार दिला जातो. तसेच दुग्ध व्यवसाय हा शेती व मजुरी करीत करता येतो. यासाठी या तरुणांना सोसायट्या कर्जे उपलब्ध करून देतात व त्या सोसायट्यांमार्फत जनावरांना खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे शेती व मजुरी करत करता दुग्ध व्यवसाय करता येतो, असा ठाम विश्वास या युवकांच्या मनात ठसला आहे. उच्च शिक्षण घेऊनही मुलांना नोकरी मिळेल का? असा प्रश्न ग्रामीण भागातील पालक वर्गाला पडतो.सरकारी खात्यात रिक्त पदे कमी असतात. यामुळे अनेकांना शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागते. खासगी कंपनीत पगार कमी दिला जातो. त्याऐवजी शेतीमध्ये व दुग्ध व्यवसायामध्ये आपण जास्त पैसे कमवू शकतो. त्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज पुरवठाही उपलब्ध आहे.- प्रशांत घरबडेएमबीए, सुशिक्षित बेरोजगार