शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आपले सरकार सेवा केंद्राच्या परिचालकांचे मानधन रखडले उपासमारीची वेळ :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 21:14 IST

अतुल जाधव ।देवराष्ट्रे : ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या सुविधांचा लाभ सुलभरित्या व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू केले. मात्र ही सेवा देण्यासाठी येथे नेमण्यात आलेल्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे हे परिचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील संगणक ...

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने आर्थिक कोंडी

अतुल जाधव ।देवराष्ट्रे : ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या सुविधांचा लाभ सुलभरित्या व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू केले. मात्र ही सेवा देण्यासाठी येथे नेमण्यात आलेल्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे हे परिचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्राची निर्मिती करण्यात आली. हा ठेका एका कंपनीला दिला आहे. या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रावर एका संगणक परिचालकाची नेमणूक केली आहे. या संगणक परिचालकांच्या मानधनासाठी प्रत्येक ग्रामपंचायत ठराविक रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करीत असते व त्यातून कंपनी मानधन देत असते.

संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीची विविध कामे करावी लागत असतात. सर्व रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, शासकीय योजनांची माहिती घेणे, नागरिकांना सेवा पुरवणे यासह विविध कामे पार पाडावी लागतात.कडेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींचे कामकाज फक्त ४१ संगणक परिचालक करीत आहेत. यापैकी अनेकांना गेल्या वर्षभरापासून, तर काहींना सहा महिनयांपासून मानधन दिले गेलेले नाही. ग्रामपंचायतींनी मानधनाची रक्कम जिल्हा परिषदेला वर्ग करूनही हे मानधन मिळत नसल्यामुळे परिचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.वेगळी योजना करण्याची घोषणा हवेतच...मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री आणि ग्रामविकास सचिव यांच्यासोबत शासकीय बैठक ४ मार्चला वर्षा बंगल्यावर १२ प्रतिनिधींसह झाली. त्यानंतर ५ मार्चला ग्रामविकास मंत्रालयात बैठक होऊन निर्णय झाला. त्यात ज्या ग्रामपंचायतीने मानधनाचा धनादेश दिला नसेल त्यांचे मानधन १५ मेपर्यंत शासन वेगळी योजना तयार करून अदा करेल, असा विश्वास स्वत: मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री व ग्रामविकास सचिव यांनी दिला होता. पण दिलेला शब्द आणि लेखी आश्वासन पाळले नाही. यापेक्षा मोठे दुर्दैव काय?मानधन फक्त सहा हजारजिल्ह्यातील संगणक परिचालकांना कंपनीकडून महिन्याला फक्त सहा हजार मानधनावर काम करावे लागत आहे, तर काही परिचालकांना यापेक्षाही कमी मानधनावर काम करावे लागत आहे. हे मानधनही जिल्हा परिषद व कंपनी वेळेवर देत नाही.

टॅग्स :Sangliसांगलीonlineऑनलाइन