शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

आपले सरकार सेवा केंद्राच्या परिचालकांचे मानधन रखडले उपासमारीची वेळ :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 21:14 IST

अतुल जाधव ।देवराष्ट्रे : ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या सुविधांचा लाभ सुलभरित्या व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू केले. मात्र ही सेवा देण्यासाठी येथे नेमण्यात आलेल्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे हे परिचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील संगणक ...

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने आर्थिक कोंडी

अतुल जाधव ।देवराष्ट्रे : ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या सुविधांचा लाभ सुलभरित्या व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू केले. मात्र ही सेवा देण्यासाठी येथे नेमण्यात आलेल्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे हे परिचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्राची निर्मिती करण्यात आली. हा ठेका एका कंपनीला दिला आहे. या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रावर एका संगणक परिचालकाची नेमणूक केली आहे. या संगणक परिचालकांच्या मानधनासाठी प्रत्येक ग्रामपंचायत ठराविक रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करीत असते व त्यातून कंपनी मानधन देत असते.

संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीची विविध कामे करावी लागत असतात. सर्व रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, शासकीय योजनांची माहिती घेणे, नागरिकांना सेवा पुरवणे यासह विविध कामे पार पाडावी लागतात.कडेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींचे कामकाज फक्त ४१ संगणक परिचालक करीत आहेत. यापैकी अनेकांना गेल्या वर्षभरापासून, तर काहींना सहा महिनयांपासून मानधन दिले गेलेले नाही. ग्रामपंचायतींनी मानधनाची रक्कम जिल्हा परिषदेला वर्ग करूनही हे मानधन मिळत नसल्यामुळे परिचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.वेगळी योजना करण्याची घोषणा हवेतच...मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री आणि ग्रामविकास सचिव यांच्यासोबत शासकीय बैठक ४ मार्चला वर्षा बंगल्यावर १२ प्रतिनिधींसह झाली. त्यानंतर ५ मार्चला ग्रामविकास मंत्रालयात बैठक होऊन निर्णय झाला. त्यात ज्या ग्रामपंचायतीने मानधनाचा धनादेश दिला नसेल त्यांचे मानधन १५ मेपर्यंत शासन वेगळी योजना तयार करून अदा करेल, असा विश्वास स्वत: मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री व ग्रामविकास सचिव यांनी दिला होता. पण दिलेला शब्द आणि लेखी आश्वासन पाळले नाही. यापेक्षा मोठे दुर्दैव काय?मानधन फक्त सहा हजारजिल्ह्यातील संगणक परिचालकांना कंपनीकडून महिन्याला फक्त सहा हजार मानधनावर काम करावे लागत आहे, तर काही परिचालकांना यापेक्षाही कमी मानधनावर काम करावे लागत आहे. हे मानधनही जिल्हा परिषद व कंपनी वेळेवर देत नाही.

टॅग्स :Sangliसांगलीonlineऑनलाइन