शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत कारखाना भारती शुगर्सच्या ताब्यात, विक्री व्यवहार पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 23:22 IST

जिल्हा बँकेची पूर्ण थकबाकी भरली

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आता भारती शुगर्स अँण्ड फ्युअल्स कंपनीच्या ताब्यात गेला असून खासदार संजय पाटील यांच्या गणपती संघाने जिल्हा बँकेची थकबाकी भरून नंतर या कारखान्याचा विक्री व्यवहार भारती शुगर्सबरोबर केला आहे. त्यामुळे चालू हंगामातच हा कारखाना सुरू होणार आहे.

गत मार्च महिन्यात जिल्हा बँकेत यशवंत कारखान्याच्या ओटीएस योजनेवरून राजकारण पेटले होते. खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनी कारखान्याला एकरकमी परतफेड योजनेचा लाभ देण्यास विरोध दर्शविला होता. यशवंत कारखाना हा खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील गणपती संघाकडे होता. त्यामुळे बाबर यांच्या विरोधानंतर त्यांच्याशी बँकेने चर्चा केली होती. तांत्रिकदृष्ट्या एकरकमी परतफेड योजनेसाठी यशवंत साखर कारखाना पात्र ठरत असल्याने बँकेने कारखान्याला एकरकमी परतफेड योजनेतील सहभागाचे पत्र दिले होते. एकूण २२ कोटींच्या थकबाकीपैकी सुमारे १२ कोटींची थकबाकी कारखान्याला भरावी लागणार होती. ही थकबाकी भरून गणपती संघाने कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यातून सोडविला. त्यानंतर लगेचच भारती शुगर्सला तो विकला आहे.

वाढत्या थकबाकीमुळे यशवंत कारखाना बँकेने ताब्यात घेतला होता. कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता. दुसरीकडे आमदार बाबर यांनी कारखान्याच्या विक्रीविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. बड्या कर्जांच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने ओटीएस योजना सुरू केली आहे. यशवंत कारखान्याच्या थकबाकीसाठी या योजनेमध्ये खासदार पाटील यांनी सहभाग नोंदवला होता.

कारखाना बँकेच्या कर्जातून मुक्त झाल्यानंतर लगेचच तो भारती शुगर्सला देण्यात आला आहे. भारती शुगर्समार्फत येणाऱ्या हंगामातच तो सुरू करण्यात येणार आहे. याबाबत भारती शुगर्सचे संचालक महेंद्र लाड यांच्याकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

कंपनीकडून कर्मचारी भरती

भारती शुगर्सने कर्मचारी भरतीची तयारी केली आहे. येत्या १९ व २० मे रोजी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. मुख्य अभियंता पदापासून सुरक्षा रक्षकांपर्यंत एकूण ३१ पदांची भरती केली जाणार आहे.

हा कारखाना सुरू होत असल्याचा आनंद आहे. भारती शुगर्सच्या संचालकांनी कर्मचारी भरती करताना श्रमिक संघाच्या स्थानिक कामगार पदाधिकारी, सभासदांना विश्वासात घ्यावे. त्यांच्याशी संवाद साधावा. योग्य व पात्र कामगारांना संधी दिल्यास त्यात चालकांचाही फायदा आहे. -भाऊसाहेब यादव, सभासद, श्रमिक संघ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने