शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य उमेदवारांबाबत कार्यकर्त्यांचा गोेंधळ

By admin | Updated: September 7, 2014 23:26 IST

नेत्यांची तयारी : कोणाच्या मागे जायचे, याबाबत संभ्रम

सांगली : आघाडी व महायुतीच्या जागावाटपाचा गोंधळ अजून संपलेला नसल्याने यातील घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ वाढला आहे. पक्षीय पातळीवरून कार्यकर्त्यांना ‘कामाला लागा’, असे आदेश मिळाले असले तरी, अधिकृत उमेदवार कोण, याबाबतच निर्णय न झाल्याने कार्यकर्त्यांनी कोणत्या आधारावर कामाला लागायचे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय लटकल्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयांमध्ये सध्या शांतता आहे. कार्यालयातील प्रमुखांना आता पक्षीय आदेशाची प्रतीक्षा लागली आहे. नेते व इच्छुकांचे लक्षही या आदेशाकडे लागले असले, तरी कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जागावाटपाची चर्चा सुरू आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीने इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पूर्ण केला आहे. मुलाखतींचा कार्यक्रम होऊन आता आठवडा झाला, तरी पक्षाकडून कोणतेही आदेश आले नाहीत. कॉँग्रेसने गत महिन्यात घेतलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत, पण आघाडीअभावी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. इच्छुकांनीही आता निवडणुकीची तयारी केली असली तरी, अधिकृत उमेदवार कोण, हेच समजत नसल्याने कार्यकर्ते गोंधळले आहेत. राष्ट्रवादीच्या मेळाव्यातही कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. ज्यांनी मुलाखती दिल्या त्या इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येकजण आपल्यालाच तिकीट मिळणार, असा दावा करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकाच पक्षात, एकाच मतदारसंघासाठी अनेक इच्छुक असल्याने, कोणाच्या प्रचाराची तयारी करायची, याचे कोडे कार्यकर्त्यांना उलगडलेले नाही. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये सर्वाधिक गोंधळ आहे. त्यांना जिल्ह्यातील कोणत्या जागा वाट्याला येणार, याची कल्पना नाही. त्याशिवाय पक्षातील अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. काहींनी दोन्ही डगरीवर पाय ठेवल्याने अधिक गोंधळ झाला आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता अन्य सर्व मतदारसंघात राष्ट्रवादी कार्यकर्ते गोंधळलेल्या स्थितीत आहेत. नेत्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीप्रमाणेच महायुतीतही अशीच अवस्था आहे. भाजप व शिवसेनेला जागांबाबतची पुसटशीही कल्पना नसल्याने पक्षीय पातळीवर वातावरण थंड आहे. ज्या जागा भाजपच्या हक्काच्या आहेत, त्याठिकाणच्या उमेदवारीबाबतही आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सांगलीची जागा भाजपची असली तरी, तिकीट कोणाला मिळणार, यावरून वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. (प्रतिनिधी)ज्या ठिकाणी नेते पक्ष सोडतील, त्या ठिकाणी पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिले जाईल, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर पाटील यांनी केल्यामुळे जिल्ह्यातील काही मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये नेतेगिरी वाढली आहे. एकसंधपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता तिकिटाच्या स्वप्नास्तव पळावे लागत आहे. ऐनवेळी जर प्रामाणिक कार्यकर्त्याला तिकीट मिळालेच नाही, तर पुन्हा पक्षाला नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. सांगलीत सध्या उमेदवारीच्या दावेदारीवरून भाजपमध्ये तीन गट पडले आहेत. सुधीर गाडगीळ, आ. संभाजी पवार व नीता केळकर या तिन्ही इच्छुकांना मानणारे कार्यकर्ते विभागले गेले आहेत. उमेदवारी निश्चित झाल्यानंतरही ही गटबाजी अशीच जिवंत राहण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. शिवसेनेला काही ठिकाणच्या जागांची खात्री असली तरी, प्रत्यक्षात उमेदवार कोण असणार, याची कल्पना शिवसैनिकांना नाही. त्यामुळे शिवसेना सध्या थंड आहे.