शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

राज्यात ‘बायोमेट्रिक’मुळे गैरव्यवहाराला आळा, समन्वयाने काम करा : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:41 IST

सांगली : राज्यात ५२ हजारपैकी ५१ हजारावर रास्त भाव दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअधिकारी, ठेकेदार, पुरवठादार यांना समन्वयाने काम करण्याच्या सूचनाथेट कंपनीला अलर्ट करणारी यंत्रणा विकसित केली. सर्व पेट्रोल पंपांना ती बसविण्याची मोहीम कंपन्यांनी चालू केली

सांगली : राज्यात ५२ हजारपैकी ५१ हजारावर रास्त भाव दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा, औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी सांगलीत व्यक्त केला. अधिकारी, ठेकेदार आणि पुरवठादार यांनी समन्वयाने काम करावे. मात्र, यामध्ये गैरव्यवहार, अपहार, दलाली होत असेल, तर जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्ह्णातील सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार यांच्या आढावा बैठकीत मंत्री बापट बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड आदी उपस्थित होते.

बापट म्हणाले की, सांगली जिल्ह्णातील गावे आणि विशेषत: नगरपरिषदा केरोसिनमुक्त करणे आणि आधार जोडणी या बाबींना सर्वच अधिकाºयांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. बोगस शिधापत्रिकांप्रकरणी सर्वच अधिकाºयांनी गांभीर्याने तपासणी करावी. उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी नियमितपणे रास्त भाव दुकाने, गोदामे, पेट्रोलपंप यांना अचानक भेटी द्याव्यात. त्यामध्ये नोंदवही, टँकरला जीपीएस प्रणाली, पेट्रोल पंपांचे आॅडिट रिपोर्ट यांची तपासणी करावी.

बायोमेट्रिक व आधार जोडणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातील तांत्रिक त्रुटी दूर करून ही यंत्रणा १०० टक्के कार्यान्वित होण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी लागेल. रास्त भाव दुकानामध्ये द्वारपोच योजना सुरू करत आहोत. या माध्यमातून धान्य ठेकेदाराकडून थेट दुकानदारांच्या दारात पोहोचवले जात आहे. या योजनेत सांगली जिल्ह्णाचाही समावेश पुढील महिन्यापासून करण्यात येणार आहे. एकाच व्यक्तीच्या दोन ठिकाणी शिधापत्रिका असणाºया राज्यातील १२ लाख कुटुंबीयांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत.औषध दुकानांचे स्पॉट रिपोर्टिंगऔषध दुकानांमधील गडबड रोखण्यासाठी अन्न औषधच्या ५५०० अधिकाºयांना टॅब देणार आहे. अधिकाºयांनी औषध दुकानाला भेट दिल्यानंतर तेथील सर्व माहिती भरून स्पॉटचे छायाचित्र घेऊन ते तात्काळ आॅनलाईनला पाठविण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे चौकशीनंतर होणारे घोटाळे रोखण्यास मदत होणार आहे, असेही गिरीश बापट यांनी सांगितले.कायद्यात बदलकायद्यात दुरुस्ती करून आणि काही सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन दूध भेसळीला लगाम घालणार आहोत. त्यादृष्टीने सामाजिक संस्थांबरोबर बैठकाही झाल्या आहेत. पेट्रोल भेसळीला आणि वजनातील चोरीला शंभर टक्के रोखता येणार आहे. यासाठी पेट्रोल कंपन्यांशी चर्चा झाली आहे. पंपाच्या यंत्रणेमध्ये बदल करणार असून काचेचे माप तयार करणार आहे. पेट्रोल मापापेक्षा कमी दिले, तर त्याचा थेट कंपनीला अलर्ट करणारी यंत्रणा विकसित केली. सर्व पेट्रोल पंपांना ती बसविण्याची मोहीम कंपन्यांनी चालू केली आहे, असेही गिरीश बापट यांनी सांगितले.सांगलीत बुधवारी जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीgirish bapatगिरीष बापट