शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

..आता राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणार?, आमदार गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न

By श्रीनिवास नागे | Updated: April 3, 2023 16:28 IST

नवीन राष्ट्राच्या निर्मितीमध्ये सावरकर यांचे मोठे योगदान

आटपाडी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत मणीशंकर अय्यर यांनी खालच्या पातळीवर जाऊन विधान केले, तेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः हातामध्ये जोडा घेऊन त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. उद्धव ठाकरे आता राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोड्याने मारणार आहेत का, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान आमदार पडळकर यांनी येथे दिले. वीर सावरकर गौरव यात्रेत ते बोलत होते. पडळकर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार प्रखर राष्ट्रवादाचा होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या चुकीच्या रूढी, परंपरा होत्या, त्यांना बाजूला सारून नवीन राष्ट्राच्या निर्मितीमधील सावरकर यांचे मोठे योगदान आहे.

परंतु वर्षभरामध्ये काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिपणी करीत आहेत. मुळात काँग्रेस आणि राहुल गांधी यांना सावरकर समजणारच नाहीत. ते ज्या पद्धतीने सावरकर यांचा अपमान करत आहेत, ते महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही.यावेळी हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील, जयवंतराव सरगर, ब्रह्मानंद पडळकर, विलासराव काळेबाग, मोहन रणदिवे, जनार्दन झिंबल, विष्णुपंत अर्जुन, नारायणराव चवरे, दादासाहेब मरगळे, रूपेशकुमार पाटील, आबासाहेब पुजारी, अनिल सूर्यवंशी, यल्लाप्पा पवार, राजेंद्र खरात उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरRahul Gandhiराहुल गांधी