शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

सांगलीत ‘रेसिड्यू फ्री’ संशोधन संस्था होणार का?, विश्वजित कदम यांची विधानसभेत लक्षवेधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 18:43 IST

द्राक्षे व बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा

कडेगाव : नाशिकनंतर सांगली जिल्हा हा देशातील सर्वांत मोठ्या द्राक्ष उत्पादकांपैकी एक आहे. मात्र, हवामान बदल आणि रासायनिक अवशेषांचे (रेसिड्यू) संकट द्राक्ष उत्पादकांसमोर भीषण समस्या निर्माण करत आहे. याच पार्श्वभूमीवर, सांगलीत ‘रेसिड्यू फ्री’ संशोधन संस्था स्थापन करण्याची गरज अधोरेखित करत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत सरकारला थेट सवाल केला.द्राक्ष पिकाचे हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. नाशिकप्रमाणेच सांगलीतील शेतकऱ्यांनाही विज्ञानाधारित संशोधनाची आवश्यकता आहे. सरकार यासाठी कोणती ठोस पावले उचलणार आहे? असा रोखठोक प्रश्न करत डॉ. कदम यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने जोरदार भूमिका मांडली.याशिवाय, बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीचा मुद्दाही त्यांनी विधानसभेत लावून धरला. “शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे? बेदाण्याच्या दरात पारदर्शकता आणण्यासाठी ठोस नियमन होणार आहे का?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज दिला.

डॉ. कदम यांची विधानसभेतील ही आक्रमक भूमिका शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. आता सरकार यावर कोणते निर्णय घेते, याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संशोधन संस्थेचे महत्त्व

  • शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी वैज्ञानिक मदत मिळेल.
  • रेसिड्यू फ्री तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्षांचे निर्यातक्षम उत्पादन वाढेल.
  • हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाय मिळतील.
  • किंमत नियंत्रण आणि दरवाढीसाठी नियमावली लागू होईल.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळेल.
टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाVishwajeet Kadamविश्वजीत कदम