शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ‘रेसिड्यू फ्री’ संशोधन संस्था होणार का?, विश्वजित कदम यांची विधानसभेत लक्षवेधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 18:43 IST

द्राक्षे व बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा

कडेगाव : नाशिकनंतर सांगली जिल्हा हा देशातील सर्वांत मोठ्या द्राक्ष उत्पादकांपैकी एक आहे. मात्र, हवामान बदल आणि रासायनिक अवशेषांचे (रेसिड्यू) संकट द्राक्ष उत्पादकांसमोर भीषण समस्या निर्माण करत आहे. याच पार्श्वभूमीवर, सांगलीत ‘रेसिड्यू फ्री’ संशोधन संस्था स्थापन करण्याची गरज अधोरेखित करत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत सरकारला थेट सवाल केला.द्राक्ष पिकाचे हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. नाशिकप्रमाणेच सांगलीतील शेतकऱ्यांनाही विज्ञानाधारित संशोधनाची आवश्यकता आहे. सरकार यासाठी कोणती ठोस पावले उचलणार आहे? असा रोखठोक प्रश्न करत डॉ. कदम यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने जोरदार भूमिका मांडली.याशिवाय, बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीचा मुद्दाही त्यांनी विधानसभेत लावून धरला. “शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे? बेदाण्याच्या दरात पारदर्शकता आणण्यासाठी ठोस नियमन होणार आहे का?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज दिला.

डॉ. कदम यांची विधानसभेतील ही आक्रमक भूमिका शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. आता सरकार यावर कोणते निर्णय घेते, याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संशोधन संस्थेचे महत्त्व

  • शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी वैज्ञानिक मदत मिळेल.
  • रेसिड्यू फ्री तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्षांचे निर्यातक्षम उत्पादन वाढेल.
  • हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाय मिळतील.
  • किंमत नियंत्रण आणि दरवाढीसाठी नियमावली लागू होईल.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळेल.
टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाVishwajeet Kadamविश्वजीत कदम