शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार : वैभव नायकवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:22 IST

शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणी येईपर्यंत संघर्ष करावा लागणार आहे. येत्या २६ जून रोजी आटपाडीत २७ व्या पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. संघटित राहून आपली ताकद दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी केले.

ठळक मुद्देपाण्यासाठी संघर्ष करावा लागणार : वैभव नायकवडी आटपाडीत शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी संघटनेची बैठक

आटपाडी : शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणी येईपर्यंत संघर्ष करावा लागणार आहे. येत्या २६ जून रोजी आटपाडीत २७ व्या पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. संघटित राहून आपली ताकद दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी केले.आटपाडीतील तांबडा मारुती देवालयाच्या सभागृहात शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी संघटनेची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी बोलताना नायकवडी म्हणाले, पाण्याचे समान वाटप करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णांनी १३ दुष्काळी तालुक्यात पाणी येण्याचे स्वप्न पाहिले होते, हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढा तीव्र करण्यात येईल. शेतात पाणी बघणार आणि मगच चळवळ थांबणार आहे. पाणी परिषद यशस्वी होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.आमदार गणपतराव देशमुख म्हणाले, पावसाळ्यात पुराचे पाणी कृष्णा नदीतून वाहून जाते. त्यावेळीच नियोजन करून दुष्काळी भागाला हे वाहून जाणारे पाणी दिले पाहिजे. पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहिजे.माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, टेंभू योजनेची पाण्याची आवर्तने ठरली पाहिजेत. आटपाडी तालुक्यातील वगळलेल्या गावांचा समावेश टेंभू योजनेत केला गेला पाहिजे. राजेवाडी तलावात पाणी आले पाहिजे.बैठकीत प्रारंभी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. बाबूराव गुरव, प्रा. शिवाजीराव काळुंगे, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, प्रा. विश्वंभर बाबर, चंद्रकांत देशमुख, आर. एस. चोपडे, शिवाजीराव पाटील, बाळासाहेब नायकवडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगली