शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र आरळी पुन्हा भाजपत सक्रिय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेले डॉ. रवींद्र आरळी पुन्हा एकदा भाजप पक्षात सक्रिय होणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : जत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेले डॉ. रवींद्र आरळी पुन्हा एकदा भाजप पक्षात सक्रिय होणार असून, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची त्यांनी जत येथे भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये राजकीय खलबते झाल्याची चर्चा सुरु आहे.

डॉ. रवींद्र आरळी हे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून, गेली २५ वर्षे जत तालुक्यात भाजपच्या वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जत विधानसभा मतदारसंघात २००९मध्ये आमदार प्रकाश शेंडगे यांना भाजपने उमेदवारी दिली. प्रकाश शेंडगे यांना आमदार करण्यात डॉ. रवींद्र आरळी यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर २०१४मध्ये डॉ. आरळी हे विधानसभेसाठी इच्छुक होते. मात्र, त्यावेळी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले विलासराव जगताप यांना उमेदवारी दिली. त्यावेळी पक्षाचा आदेश मानून डॉ. रवींद्र आरळी यांनी विलासराव जगताप यांचा प्रचार केला आणि विजय खेचून आणला.

विलासराव जगताप आमदार झाल्यानंतर जत तालुक्यात भाजपमध्ये जगताप व आरळी असे दोन गट कार्यरत राहिले. या दोन्ही गटांमध्ये अखेरपर्यंत मनोमिलन झालेच नाही. २०१९च्या निवडणुकीत भाजपकडून डॉ. रवींद्र आरळी यांनी उमेदवारी मागितली. डॉ. रवींद्र आरळी यांना उमेदवारी मिळेल, असे संकेत मिळत असताना पक्षाने पुन्हा माजी आमदार विलासराव जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले डॉ. आरळी यांनी बंड पुकारत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवली. या विधानसभा निवडणुकीत त्यांना लक्षणीय मते मिळाली. डाॅ. आरळी यांच्या बंडखोरीचा फटका भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांना बसला. जगताप यांचा पराभव झाला. त्यानंतर डॉ. रवींद्र आरळी हे भाजप पक्षापासून चार हात लांबच राहिले.

चाैकट

बैठकीत होणार निर्णय

डॉ. आरळी यांनी मला पक्षात चांगली संधी द्या. यापुढे मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणार, असे सांगितल्याचे समजते. पृथ्वीराज देशमुख यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत आपल्याला पुन्हा एकदा पक्षात प्रवेश देऊन मोठी जबाबदारी देऊ, असे आश्वासन दिले आहे. पुन्हा एकदा डॉ. आरळी हे भाजपमध्ये सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू आहे.