शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रवींद्र आरळी पुन्हा भाजपत सक्रिय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेले डॉ. रवींद्र आरळी पुन्हा एकदा भाजप पक्षात सक्रिय होणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : जत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेले डॉ. रवींद्र आरळी पुन्हा एकदा भाजप पक्षात सक्रिय होणार असून, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची त्यांनी जत येथे भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये राजकीय खलबते झाल्याची चर्चा सुरु आहे.

डॉ. रवींद्र आरळी हे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून, गेली २५ वर्षे जत तालुक्यात भाजपच्या वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जत विधानसभा मतदारसंघात २००९मध्ये आमदार प्रकाश शेंडगे यांना भाजपने उमेदवारी दिली. प्रकाश शेंडगे यांना आमदार करण्यात डॉ. रवींद्र आरळी यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर २०१४मध्ये डॉ. आरळी हे विधानसभेसाठी इच्छुक होते. मात्र, त्यावेळी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले विलासराव जगताप यांना उमेदवारी दिली. त्यावेळी पक्षाचा आदेश मानून डॉ. रवींद्र आरळी यांनी विलासराव जगताप यांचा प्रचार केला आणि विजय खेचून आणला.

विलासराव जगताप आमदार झाल्यानंतर जत तालुक्यात भाजपमध्ये जगताप व आरळी असे दोन गट कार्यरत राहिले. या दोन्ही गटांमध्ये अखेरपर्यंत मनोमिलन झालेच नाही. २०१९च्या निवडणुकीत भाजपकडून डॉ. रवींद्र आरळी यांनी उमेदवारी मागितली. डॉ. रवींद्र आरळी यांना उमेदवारी मिळेल, असे संकेत मिळत असताना पक्षाने पुन्हा माजी आमदार विलासराव जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले डॉ. आरळी यांनी बंड पुकारत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवली. या विधानसभा निवडणुकीत त्यांना लक्षणीय मते मिळाली. डाॅ. आरळी यांच्या बंडखोरीचा फटका भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांना बसला. जगताप यांचा पराभव झाला. त्यानंतर डॉ. रवींद्र आरळी हे भाजप पक्षापासून चार हात लांबच राहिले.

चाैकट

बैठकीत होणार निर्णय

डॉ. आरळी यांनी मला पक्षात चांगली संधी द्या. यापुढे मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणार, असे सांगितल्याचे समजते. पृथ्वीराज देशमुख यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत आपल्याला पुन्हा एकदा पक्षात प्रवेश देऊन मोठी जबाबदारी देऊ, असे आश्वासन दिले आहे. पुन्हा एकदा डॉ. आरळी हे भाजपमध्ये सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू आहे.