शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

गुंडगिरी करणाऱ्यांना निवडून देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2015 23:30 IST

पतंगराव कदम : कवठेमहांकाळ येथील प्रचार सभेत सवाल; भाजप नेत्यांवर टीका

कवठेमहांकाळ : तासगावमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत गुन्हेगारांनी कहर केला आहे. ही लोकशाहीच्या इतिहासातील दुर्दैवी घटना आहे. मग अशा गुंडगिरी प्रवृत्तीला आपण पोसायचे का? त्यांना आपण संधी द्यायची का?, असा सवाल आ. पतंगराव कदम यांनी खासदार संजयकाका पाटील यांचे नाव न घेता केला. दरम्यान, अशा प्रवृत्तींना जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार करावे, असे आवाहनही त्यांनी केले.कवठेमहांकाळ येथे मंगळवारी शेतकरी दूध संघाच्या सभागृहात वसंतदादा रयत पॅनेलच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व मतदारांची सभा पार पडली. यावेळी कदम बोलत होते.कदम म्हणाले की, माझ्या आजवरच्या राजकीय जीवनात मी संस्था वाढविण्याचे व सुदृढ ठेवण्याचे काम केले. संस्था काढायच्या व मोडायच्या हा उद्योग कधीच केला नाही. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीत मिरज, कवठेमहांकाळ, जतच्या लोकांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचा वचक होता. परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणात ‘सांगली चिल्लर’ झाली आहे. वसंतदादांच्या पश्चात सांगलीचा दबदबा राहिला नाही. हा दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी जनतेने आपल्याला ताकद व आशीर्वाद द्यावेत.सांगलीच्या राजकारणात ‘सत्तापिपासू’ टोळ्या निर्माण झाल्या आहेत. टोळ्या करून सत्ता भोगायची अन् स्वार्थ साधायचा, असे उद्योग या टोळ्यांनी आजवर जिल्ह्यात केले आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी अशा टोळ्या मतदारांनी राजकारणातून हद्दपार कराव्यात. लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकारणाला गुंडगिरीचा वास येऊ लागला आहे. त्यामुळे अशा लोकांना संधी द्यायची का, याबाबतचा निर्णय मतदारांनी घ्यावा, असे ते म्हणाले. अजितराव घोरपडे म्हणाले, शेती व शेतकऱ्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून मतदारांनी काठावर विजयी करू नये, तर भरघोस मतांनी विजयी करावे. बाजार समितीचा निकाल भविष्यातील राजकारणाला कलाटणी देणारा असेल. शेतकऱ्यांसाठी भविष्यात बरेच काही करायचे आहे. त्यामुळे त्यादृष्टीने मतदारांनी कौल द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या सभेत माजी आमदार दिनकर पाटील, आप्पासाहेब शिंदे, शंकर गायकवाड यांचीही भाषणे झाली. सभेस आनंदराव मोहिते, राजवर्धन घोरपडे, बाळासाहेब गुरव, माणिकराव भोसले, उदयसिंह शिंदे, सुनील माळी, तानाजी यमगर उपस्थित होते. (वार्ताहर)उपायुक्तांची नियुक्तीऔषध गोदामामधील घोटाळ्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे उपायुक्त एस. बी. कोळी आणि सांगली जिल्ह्याचे प्रभारी उपायुक्त बी. ए. शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर डॉ. विश्वासराव मोरे आणि अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी होणारपशुसंवर्धन विभागाकडे तीन लाखांची औषधाची मागणी केली होती. प्रत्यक्षात औषधाचा पुरवठा न होताच सर्व तालुक्यांकडून पोच घेऊन संबंधित कंपनीला तीन लाखांचा धनादेश दिला होता. प्रत्यक्षात दोन वर्षात औषधेच मिळाली नाहीत. या घोटाळ्याबद्दल जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी आवाज उठविल्यानंतर मे २०१५ रोजी रोखीने तीन लाख रुपये भरल्याचे चलन फाईलला लावल्याचे आढळून आले आहे. या औषध खरेदीचा सर्व गोंधळ पाहिल्यास हा घोटाळाच असल्याने संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी दोषींवर फौजदारी कारवाईसाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे. येत्या आठ दिवसांत औषध खरेदी घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होईल, असे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.