शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

विरोधकांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातच दंगली कशा?, जयंत पाटलांचा सवाल

By अविनाश कोळी | Updated: June 13, 2023 16:59 IST

राज्यातील दंगलींचा घटनाक्रम पाहिला तर संशय यावा, अशी परिस्थिती

सांगली : राज्यातील दंगलींचा घटनाक्रम पाहिला तर संशय यावा, अशी परिस्थिती आहे. ज्या मतदारसंघात विरोधी पक्षांचे वर्चस्व आहे, तिथेच दंगली का होताहेत? का त्या घडविल्या जात आहेत, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.ते म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर दंगली होत असताना गृहखाते त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. आजवर ज्या शहरांमध्ये दंगली झाल्या त्या शहरांत कुठेही भाजप किंवा शिंदे गटाचे वर्चस्व नाही. केवळ विरोधी पक्षांच्या मतदारसंघातच त्या घडताना दिसतात. त्यामुळे यात कोणाचा हात आहे, याची चौकशी झाली पाहिजे. गृहखात्याला या गोष्टीचे गांभीर्य असेल व त्यांनी एखादी बैठक बोलावली तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांना सर्व ते सहकार्य करु.

ब्रिटीश, मघुलांच्या काळातही वारीवर हल्ला झाला नाही

वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याबाबत ते म्हणाले की, गेल्या तिनशे वर्षात ब्रिटीश आणि मघुलांच्या काळातही वारीवर कधीही हल्ला झाला नाही. मात्र, या सरकारच्या काळात वारकऱ्यांवर हल्ला झाला. ज्यांच्यावर लाठी उगारली पाहिजे ते राहिले बाजूला आणि वारकऱ्यांवर लाठी उगारली जाते. असा प्रकार घडला नसल्याचा दावा सरकार करीत असले तरी प्रत्यक्षात ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. शांततेच्या मार्गांनी परंपरा जपणाऱ्यांवर असा हल्ला होणे ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता या घटनेने अस्वस्थ आहे....तर एकनाथ शिंदेंना नेतृत्व द्याभाजपने जाहिरातीत दिलेल्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना अधिक पसंती असेल, तर भाजपने त्यांचे ऐकावे आणि शिंदेंना पूर्ण नेतृत्व द्यावे. शिंदे गटाला जितक्या जागा हव्या आहेत, त्यांना तेवढ्या द्याव्यात, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.

सत्ताधाऱ्यांचा टिकाव लागणार नाही

सर्व्हेची गोष्ट बाजुला केली व वास्तव पाहिले तर पुढील निवडणुकांत महाविकास आघाडीसमोर भाजप किंवा शिंदे गटाचा निभाव लागणार नाही. महाविकास आघाडी एकसंध झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटील