शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

विरोधकांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातच दंगली कशा?, जयंत पाटलांचा सवाल

By अविनाश कोळी | Updated: June 13, 2023 16:59 IST

राज्यातील दंगलींचा घटनाक्रम पाहिला तर संशय यावा, अशी परिस्थिती

सांगली : राज्यातील दंगलींचा घटनाक्रम पाहिला तर संशय यावा, अशी परिस्थिती आहे. ज्या मतदारसंघात विरोधी पक्षांचे वर्चस्व आहे, तिथेच दंगली का होताहेत? का त्या घडविल्या जात आहेत, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.ते म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर दंगली होत असताना गृहखाते त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. आजवर ज्या शहरांमध्ये दंगली झाल्या त्या शहरांत कुठेही भाजप किंवा शिंदे गटाचे वर्चस्व नाही. केवळ विरोधी पक्षांच्या मतदारसंघातच त्या घडताना दिसतात. त्यामुळे यात कोणाचा हात आहे, याची चौकशी झाली पाहिजे. गृहखात्याला या गोष्टीचे गांभीर्य असेल व त्यांनी एखादी बैठक बोलावली तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांना सर्व ते सहकार्य करु.

ब्रिटीश, मघुलांच्या काळातही वारीवर हल्ला झाला नाही

वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याबाबत ते म्हणाले की, गेल्या तिनशे वर्षात ब्रिटीश आणि मघुलांच्या काळातही वारीवर कधीही हल्ला झाला नाही. मात्र, या सरकारच्या काळात वारकऱ्यांवर हल्ला झाला. ज्यांच्यावर लाठी उगारली पाहिजे ते राहिले बाजूला आणि वारकऱ्यांवर लाठी उगारली जाते. असा प्रकार घडला नसल्याचा दावा सरकार करीत असले तरी प्रत्यक्षात ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. शांततेच्या मार्गांनी परंपरा जपणाऱ्यांवर असा हल्ला होणे ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता या घटनेने अस्वस्थ आहे....तर एकनाथ शिंदेंना नेतृत्व द्याभाजपने जाहिरातीत दिलेल्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना अधिक पसंती असेल, तर भाजपने त्यांचे ऐकावे आणि शिंदेंना पूर्ण नेतृत्व द्यावे. शिंदे गटाला जितक्या जागा हव्या आहेत, त्यांना तेवढ्या द्याव्यात, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.

सत्ताधाऱ्यांचा टिकाव लागणार नाही

सर्व्हेची गोष्ट बाजुला केली व वास्तव पाहिले तर पुढील निवडणुकांत महाविकास आघाडीसमोर भाजप किंवा शिंदे गटाचा निभाव लागणार नाही. महाविकास आघाडी एकसंध झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटील