शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातच दंगली कशा?, जयंत पाटलांचा सवाल

By अविनाश कोळी | Updated: June 13, 2023 16:59 IST

राज्यातील दंगलींचा घटनाक्रम पाहिला तर संशय यावा, अशी परिस्थिती

सांगली : राज्यातील दंगलींचा घटनाक्रम पाहिला तर संशय यावा, अशी परिस्थिती आहे. ज्या मतदारसंघात विरोधी पक्षांचे वर्चस्व आहे, तिथेच दंगली का होताहेत? का त्या घडविल्या जात आहेत, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.ते म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर दंगली होत असताना गृहखाते त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. आजवर ज्या शहरांमध्ये दंगली झाल्या त्या शहरांत कुठेही भाजप किंवा शिंदे गटाचे वर्चस्व नाही. केवळ विरोधी पक्षांच्या मतदारसंघातच त्या घडताना दिसतात. त्यामुळे यात कोणाचा हात आहे, याची चौकशी झाली पाहिजे. गृहखात्याला या गोष्टीचे गांभीर्य असेल व त्यांनी एखादी बैठक बोलावली तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांना सर्व ते सहकार्य करु.

ब्रिटीश, मघुलांच्या काळातही वारीवर हल्ला झाला नाही

वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याबाबत ते म्हणाले की, गेल्या तिनशे वर्षात ब्रिटीश आणि मघुलांच्या काळातही वारीवर कधीही हल्ला झाला नाही. मात्र, या सरकारच्या काळात वारकऱ्यांवर हल्ला झाला. ज्यांच्यावर लाठी उगारली पाहिजे ते राहिले बाजूला आणि वारकऱ्यांवर लाठी उगारली जाते. असा प्रकार घडला नसल्याचा दावा सरकार करीत असले तरी प्रत्यक्षात ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. शांततेच्या मार्गांनी परंपरा जपणाऱ्यांवर असा हल्ला होणे ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता या घटनेने अस्वस्थ आहे....तर एकनाथ शिंदेंना नेतृत्व द्याभाजपने जाहिरातीत दिलेल्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना अधिक पसंती असेल, तर भाजपने त्यांचे ऐकावे आणि शिंदेंना पूर्ण नेतृत्व द्यावे. शिंदे गटाला जितक्या जागा हव्या आहेत, त्यांना तेवढ्या द्याव्यात, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.

सत्ताधाऱ्यांचा टिकाव लागणार नाही

सर्व्हेची गोष्ट बाजुला केली व वास्तव पाहिले तर पुढील निवडणुकांत महाविकास आघाडीसमोर भाजप किंवा शिंदे गटाचा निभाव लागणार नाही. महाविकास आघाडी एकसंध झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटील