शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पलूस, इस्लामपूर, तासगाव बाजार समित्यांना अभय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 15:40 IST

सांगली बाजार समिती संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यानंतर प्रभारी सहकारमंत्र्यांनी तात्काळ प्रशासकांची नियुक्ती केली. हीच तत्परता त्यांनी तासगाव, इस्लामपूर, पलूस बाजार समिती संचालकांची मुदत संपल्यानंतर का दाखविली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठळक मुद्देउपनिबंधकांच्या अहवालाकडे दुर्लक्ष सांगलीचे संचालक राजकारणाचा बळी

अशोक डोंबाळे सांगली : सांगली बाजार समिती संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यानंतर प्रभारी सहकारमंत्र्यांनी तात्काळ प्रशासकांची नियुक्ती केली. हीच तत्परता त्यांनी तासगाव, इस्लामपूर, पलूस बाजार समिती संचालकांची मुदत संपल्यानंतर का दाखविली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सांगलीला खमक्या राजकीय नेतृत्व नसल्याची पोकळी याला कारणीभूत आहे का, असा सवाल मदन पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.सांगली बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत दि. २६ आॅगस्टरोजी संपल्यानंतर दि. २७ रोजी लगेच प्रशासक नियुक्ती केली आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत यांनी प्रभारी सहकारमंत्री जयंत पाटील यांच्याकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तरीही ती त्यांनी फेटाळून लावली.

या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. पण, पलूस बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपून महिना झाला तरीही तेथे प्रशासक का नियुक्त केला नाही, अशी चर्चा आहे. तेथे विश्वजित कदम गटाची सत्ता आहे. पलूस बाजार समितीत कदम यांचा शब्द मानला जातो आणि सांगली बाजार समितीत का डावलले, असा सवाल मदन पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.तासगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २७ आॅगस्टलाच संपली आहे. तेथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. तेथील घोटाळ्याच्या चौकशीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी तासगाव बाजार समिती संचालक मंडळाला मुदतवाढ देऊ नये, अशी शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. तरीही त्यांना अभय दिले आहे. सांगली बाजार समितीबरोबरच मुदत संपली असतानाही, तासगाव बाजार समितीवर प्रशासक का नियुक्त केला नाही, असा प्रश्न सांगली बाजार समितीच्या संचालकांनी उपस्थित केला आहे.इस्लामपूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २५ आॅगस्टरोजी संपली आहे. तेथेही प्रशासक नियुक्त केला नाही. तेथे जयंत पाटील गटाची सत्ता आहे. त्यांनी प्रशासक नियुक्त करताना दुजाभाव केल्याचे बोलले जात आहे.पक्षप्रवेश न केल्याची शिक्षासांगली बाजार समितीमध्ये सभापतीपद काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्या गटाकडे होते. जयश्रीताई यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. पण, काँग्रेस नेत्यांनी नाराजी दूर केल्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश थांबला आहे. बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील आणि काही संचालकांनाही राष्ट्रवादीची आॅफर होती. परंतु पाटील व अन्य संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही. राष्ट्रवादीत प्रवेश न झाल्यामुळेच सांगली बाजार समितीवर प्रशासक नियुक्त झाल्याचा आरोप केला जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMarket Yardमार्केट यार्डSangliसांगली