शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तासगाव कारखाना कोणीही चालवावा !

By admin | Updated: September 3, 2014 00:06 IST

प्रमोद कर्नाड : राज्य बँकेचा शासनाकडे प्रस्ताव

सांगली : तासगाव साखर कारखाना एका वर्षाच्या मुदतीने चालविण्यास कोणी तयार असल्यास अवसायक मंडळाने राज्य बँकेकडे प्रस्ताव द्यावा, त्यांच्याकडे कारखाना दिला जाईल, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, राज्य बँकेच्या या भूमिकेमुळे अवसायक मंडळाची गोची झाली असून, कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम धोक्यात आला आहे.तासगाव कारखान्याच्या विक्री व्यवहाराबाबत अवसायकांनी डी. आर. ए. टी. (ऋण वसुली व अपिलीय प्राधिकरण) न्यायालयात दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. गणपती जिल्हा संघाशी झालेला विक्री व्यवहार रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल आहेत. हे कारण दाखवून कारखाना २०१४-१५ या गळीत हंगामाकरिता एका वर्षाच्या कालावधीसाठी भाडेकराराने देण्याबाबत निविदा काढण्यात आली होती. एका वर्षासाठी अडीच कोटी रुपये स्थिर भाडे व प्रतिटन शंभर रुपयेप्रमाणे गाळपावर भाडे आकारण्यात येणार होते. कारखाना सुरू करायचा झाल्यास यंत्रसामग्रीच्या नूतनीकरणासाठी सात कोटी खर्च अपेक्षित आहे. अडीच लाख टन गाळप ग्राह्य धरल्यास स्थिर भाड्यासह किमान पाच कोटी रुपये भाडे होणार आहे. त्यामुळे बारा कोटी गुंतवून एका वर्षात भाडेपट्ट्यावर कारखाना चालविणे परवडणारे नाही. त्यामुळे एकही कारखाना आणि सहकारी संस्था तासगाव कारखाना अल्प मुदतीत चालविण्यास तयार नव्हती़ एकही निविदा दाखल न झाल्यामुळे तासगाव कारखान्याचा गळीत हंगाम बंद राहण्याची शक्यता होती़ त्यामुळे सभासद आणि कारखाना बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री आऱ आऱ पाटील आणि पालकमंत्री डॉ़ पतंगराव कदम यांच्याकडे कारखाना अवसायक मंडळाकडे देण्याची मागणी केली होती़ त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवसायकांकडे कारखाना देण्याबाबत सूचना दिली होती़ मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्य बँकेच्या प्रशासक मंडळाने प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनाकडे आज, मंगळवारी सादर केला, असे कर्नाड यांनी सांगितले़ ते म्हणाले की, न्यायालयात दोन याचिका असल्यामुळे तेथील निर्णय झाल्याशिवाय कारखाना दीर्घ मुदतीने भाड्याने देता येत नाही़ त्यामुळे कारखाना एक वर्षाच्या मुदतीने चालविण्यास कोणी तयार असेल तर, अवसायक मंडळाने प्रस्ताव द्यावा़ प्रस्ताव योग्य असल्यास कारखाना वर्षाच्या मुदतीने भाड्याने चालविण्यास देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले़