शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव कारखाना कोणीही चालवावा !

By admin | Updated: September 3, 2014 00:06 IST

प्रमोद कर्नाड : राज्य बँकेचा शासनाकडे प्रस्ताव

सांगली : तासगाव साखर कारखाना एका वर्षाच्या मुदतीने चालविण्यास कोणी तयार असल्यास अवसायक मंडळाने राज्य बँकेकडे प्रस्ताव द्यावा, त्यांच्याकडे कारखाना दिला जाईल, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, राज्य बँकेच्या या भूमिकेमुळे अवसायक मंडळाची गोची झाली असून, कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम धोक्यात आला आहे.तासगाव कारखान्याच्या विक्री व्यवहाराबाबत अवसायकांनी डी. आर. ए. टी. (ऋण वसुली व अपिलीय प्राधिकरण) न्यायालयात दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. गणपती जिल्हा संघाशी झालेला विक्री व्यवहार रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल आहेत. हे कारण दाखवून कारखाना २०१४-१५ या गळीत हंगामाकरिता एका वर्षाच्या कालावधीसाठी भाडेकराराने देण्याबाबत निविदा काढण्यात आली होती. एका वर्षासाठी अडीच कोटी रुपये स्थिर भाडे व प्रतिटन शंभर रुपयेप्रमाणे गाळपावर भाडे आकारण्यात येणार होते. कारखाना सुरू करायचा झाल्यास यंत्रसामग्रीच्या नूतनीकरणासाठी सात कोटी खर्च अपेक्षित आहे. अडीच लाख टन गाळप ग्राह्य धरल्यास स्थिर भाड्यासह किमान पाच कोटी रुपये भाडे होणार आहे. त्यामुळे बारा कोटी गुंतवून एका वर्षात भाडेपट्ट्यावर कारखाना चालविणे परवडणारे नाही. त्यामुळे एकही कारखाना आणि सहकारी संस्था तासगाव कारखाना अल्प मुदतीत चालविण्यास तयार नव्हती़ एकही निविदा दाखल न झाल्यामुळे तासगाव कारखान्याचा गळीत हंगाम बंद राहण्याची शक्यता होती़ त्यामुळे सभासद आणि कारखाना बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री आऱ आऱ पाटील आणि पालकमंत्री डॉ़ पतंगराव कदम यांच्याकडे कारखाना अवसायक मंडळाकडे देण्याची मागणी केली होती़ त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवसायकांकडे कारखाना देण्याबाबत सूचना दिली होती़ मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्य बँकेच्या प्रशासक मंडळाने प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनाकडे आज, मंगळवारी सादर केला, असे कर्नाड यांनी सांगितले़ ते म्हणाले की, न्यायालयात दोन याचिका असल्यामुळे तेथील निर्णय झाल्याशिवाय कारखाना दीर्घ मुदतीने भाड्याने देता येत नाही़ त्यामुळे कारखाना एक वर्षाच्या मुदतीने चालविण्यास कोणी तयार असेल तर, अवसायक मंडळाने प्रस्ताव द्यावा़ प्रस्ताव योग्य असल्यास कारखाना वर्षाच्या मुदतीने भाड्याने चालविण्यास देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले़