शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

राजू शेट्टी-जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? : भाजपच्या झेंड्याला ‘रयत’ची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:55 IST

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि इस्लामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? यावर भाजप-शिवसेनेकडून कोणालाही हिरवा कंदील मिळालेला नाही.

ठळक मुद्दे निवडणुकीचे रंग ; दोन्ही पक्षांकडून ताकदीचे प्रदर्शन महाराष्ट्रात दौरा करताना आपले लक्ष आपल्या इस्लामपूर मतदारसंघावरही केंद्रित केले

अशोक पाटील ।इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि इस्लामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? यावर भाजप-शिवसेनेकडून कोणालाही हिरवा कंदील मिळालेला नाही. सध्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची नावे भाजपच्या श्रेष्ठींपुढे आहेत; तर व्यंकटेश्वरा शिक्षण संकुलाचे नेते राहुल महाडिक यांनी स्वबळावर शड्डू ठोकला आहे.

भाजपकडून वैभव नायकवडी यांनाही आमंत्रित करण्याचा डाव आखला जात आहे. एकूणच भाजपच्या झेंड्याला ‘रयत’ची किनार दिसत आहे.भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळणार, हे गृहीत धरूनच शिराळा मतदारसंघात भाजपची वाटचाल सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात ‘आमदार नाईक पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर’ या चर्चेला उधाण आले होते. यावर स्वत: शिवाजीराव नाईक यांनी पडदा टाकला आहे. आता तर त्यांनी हातकणंगलेतून भाजपचाच खासदार होणार, असे भाकीत करून भाजपवरील आपली निष्ठा दाखवून दिली आहे. परंतु खासदार शेट्टी यांच्याविरोधात कोण? यावर आमदार नाईक यांनी मौन पाळले आहे.

इस्लामपूर येथे महागाईविरोधात राष्ट्रवादीने काढलेला मोर्चा भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. इस्लामपूर नगरपालिकेत परिवर्तन झाले असले तरी, जयंत पाटील यांची ताकद आजही मतदारसंघात अभेद्य असल्याचे दिसते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपपुढे सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील यांची नावे असली तरी, महाडिक आणि हुतात्मा गटाची भूमिका आजही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार म्हणून एकमताने एकही नाव अद्याप पुढे आलेले नाही.

एकंदरीत जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात दौरा करताना आपले लक्ष आपल्या इस्लामपूर मतदारसंघावरही केंद्रित केले आहे. देशातील महागाईच्या विरोधातील पहिला मोर्चा इस्लामपूर येथे काढून राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली आहे. या मोर्चात सहभागी १० ते १२ हजार जनसमुदाय पाहून विरोधी भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे.यापूर्वी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर येथे कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून आपली ताकद तपासली आहे. आता राष्ट्रवादीच्या या मोर्चाला भाजप काय प्रत्युत्तर देणार, याकडेच इस्लामपूरकरांचे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Jayant Patilजयंत पाटील