शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कुठे घ्यावे उपचार? ‘खासगी’ची दारे बंद!; विमा योजना : २०० कोटी अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 08:14 IST

धोकादायक इमारती, असुविधा, सेवेतील दिरंगाई अशा अनेक कारणांनी राज्य कामगार विमा रुग्णालयांकडे जाणाऱ्या कामगारांची संख्या कमी होत आहे.

- अविनाश कोळीलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : केंद्र व राज्य शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या राज्य कामगार विमा योजनेच्या (ई.एस.आय.) अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. गेल्या दीड वर्षापासून ही योजना चालविणाऱ्या महाराष्ट्रातील १३३ रुग्णालयांचा परतावा शासनाने दिला नसल्याने खासगी रुग्णालयांनी आता या योजनेतील उपचाराबाबत असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे कामगारांसाठी मोठा आधार बनलेल्या खासगी रुग्णालयांचे दार कामगारांसाठी बंद होत आहे.

 धोकादायक इमारती, असुविधा, सेवेतील दिरंगाई अशा अनेक कारणांनी राज्य कामगार विमा रुग्णालयांकडे जाणाऱ्या कामगारांची संख्या कमी होत आहे. राज्यातील १३३ खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा ही योजना सुरू आहे. कामगारांना खासगी रुग्णालयेच बरी वाटतात. मात्र, दीड वर्षापासून शासनाने त्यांचा परतावाच दिला नाही. खासगी रुग्णालयांचे सुमारे २०० कोटी रुपये महामंडळाकडे अडकले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व सेवा ऑनलाइन झाल्या असताना कामगार विमा योजना आजही ऑफलाइन पद्धतीने चालविली जाते. 

दरवर्षी जमा होतात १३०० कोटी रुपयेराज्य कामगार विमा योजनेंतर्गत राज्यातून दरवर्षी सुमारे १ हजार ३०० कोटी रुपये जमा होतात. मालक व कामगार यांचा यासाठी संयुक्त हिस्सा जातो. राज्यभरात १४ कामगार विमा रुग्णालये व त्याठिकाणी तीन हजार खाटा राखीव आहेत. सद्य:स्थितीत २४ लाखांवर कामगारांची नोंदणी आहे.

बंदचे लागले फलक मिरजेतील एका मोठ्या रुग्णालयाने कामगार विमा योजना येत्या १८ ऑक्टोबरपासून बंद करणार असल्याचा फलक लावला आहे.

दोन रुग्णालयांचाच सात कोटी परतावा शासनाकडे अडकला. नाईलाने कामगार विमा योजनेची सेवा बंद करीत आहोत.    - डॉ. रविकांत पाटील, मिरज

ज्या रुग्णालयांचे पैसे थकीत आहेत त्यांनी आमच्याकडे यादी द्यावी. आम्ही ई.एस.आय.सी.कडून ते पैसे मागवून घेऊ. कामगारांसाठीची सेवा रुग्णालयांनी बंद करू नये.    - सुरेश खाडे, कामगारमंत्री